शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

नितेश राणेंना मंत्रीपद मिळणार? भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 20:11 IST

शरद पवार जे म्हणतात, ते कधीच होत नाही.

कणकवली : महाराष्ट्रात आता बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युतीचे सरकार आले आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकाच विचाराचे असल्याने विकासाच्या गाडीला आता डबल इंजिन लागलेले आहे. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचा उपयोग होईल. केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याशी चांगला संवाद आहे. त्यामुळे आमदार नितेश राणे यांच्या मंत्रीपदाबद्दल तेच सांगू शकतील असे मत भाजपा नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केलं. तर, सिंधुदुर्गचा पालकमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच ठरवतील असेही त्यांनी सांगितले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांला उत्तर देताना शेलार यांनी स्पष्ट भूमिका मांडली.आशिष शेलार हे आज, सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असता त्यांनी कणकवली येथे भाजप पदाधिकाऱ्यांसोबत लोकसभा मतदार संघाबाबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.आशिष शेलार म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची जागा जिंकण्यासाठी आतापासूनच पायाभरणी आढावा बैठकीच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. हा मतदार संघ भाजपला मिळविण्यासाठी नव्हे तर तो जिंकण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. असेही ते यावेळी म्हणाले. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होईल ? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, त्याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीच उत्तर देतील असेही ते म्हणाले.पवार म्हणतात ते कधीच होत नाहीबाळासाहेब ठाकरे शिवसेना व भाजपाची युती झालेली आहे. हे सरकार स्थिर असून बहुमत सिद्ध केलेले आहे. त्यामुळे शरद पवार जे म्हणतात, ते कधीच होत नाही. कारण महाविकास आघाडी सरकार पुढील २५ वर्षे राहणार असेही ते म्हणाले होते. आता त्याचे काय झाले? बाळासाहेब ठाकरे शिवसेना व भाजप यांची दिलजमाई झाली आहे. त्यामुळे कोणाला मंत्री किंवा  पालकमंत्री बनवा अगर नको बनवू, विशेष असे काहीही  होणार नाही. मात्र,आम्ही केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून  विकासाच्या गाडीला डबल इंजिन लावून जनतेला निश्चितच दिलासा देऊ. असा विश्वासही  शेलार यांनी व्यक्त केला.ठाकरेंचा अहंकार प्रत्येक प्रकल्पाच्या आडवा येत होतासिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजाने पालकमंत्री मराठा समाजाचा द्यावा, अशी मागणी केली आहे. ती व मराठा समाजाच्या अन्य मागण्या महाविकास आघाडी सरकार पेक्षा भाजपच पूर्ण करेल. यापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अहंकार प्रत्येक प्रकल्पाच्या आडवा येत होत. पण, आता डबल इंजिनच्या गतीने राज्यातील महामार्ग चौपदरीकरण तसेच अन्य प्रकल्प मार्गी लावले जातील असेही सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाAshish Shelarआशीष शेलारNitesh Raneनीतेश राणे