शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

नितेश राणेंना मंत्रीपद मिळणार? भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 20:11 IST

शरद पवार जे म्हणतात, ते कधीच होत नाही.

कणकवली : महाराष्ट्रात आता बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युतीचे सरकार आले आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकाच विचाराचे असल्याने विकासाच्या गाडीला आता डबल इंजिन लागलेले आहे. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचा उपयोग होईल. केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याशी चांगला संवाद आहे. त्यामुळे आमदार नितेश राणे यांच्या मंत्रीपदाबद्दल तेच सांगू शकतील असे मत भाजपा नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केलं. तर, सिंधुदुर्गचा पालकमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच ठरवतील असेही त्यांनी सांगितले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांला उत्तर देताना शेलार यांनी स्पष्ट भूमिका मांडली.आशिष शेलार हे आज, सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असता त्यांनी कणकवली येथे भाजप पदाधिकाऱ्यांसोबत लोकसभा मतदार संघाबाबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.आशिष शेलार म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची जागा जिंकण्यासाठी आतापासूनच पायाभरणी आढावा बैठकीच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. हा मतदार संघ भाजपला मिळविण्यासाठी नव्हे तर तो जिंकण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. असेही ते यावेळी म्हणाले. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होईल ? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, त्याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीच उत्तर देतील असेही ते म्हणाले.पवार म्हणतात ते कधीच होत नाहीबाळासाहेब ठाकरे शिवसेना व भाजपाची युती झालेली आहे. हे सरकार स्थिर असून बहुमत सिद्ध केलेले आहे. त्यामुळे शरद पवार जे म्हणतात, ते कधीच होत नाही. कारण महाविकास आघाडी सरकार पुढील २५ वर्षे राहणार असेही ते म्हणाले होते. आता त्याचे काय झाले? बाळासाहेब ठाकरे शिवसेना व भाजप यांची दिलजमाई झाली आहे. त्यामुळे कोणाला मंत्री किंवा  पालकमंत्री बनवा अगर नको बनवू, विशेष असे काहीही  होणार नाही. मात्र,आम्ही केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून  विकासाच्या गाडीला डबल इंजिन लावून जनतेला निश्चितच दिलासा देऊ. असा विश्वासही  शेलार यांनी व्यक्त केला.ठाकरेंचा अहंकार प्रत्येक प्रकल्पाच्या आडवा येत होतासिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजाने पालकमंत्री मराठा समाजाचा द्यावा, अशी मागणी केली आहे. ती व मराठा समाजाच्या अन्य मागण्या महाविकास आघाडी सरकार पेक्षा भाजपच पूर्ण करेल. यापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अहंकार प्रत्येक प्रकल्पाच्या आडवा येत होत. पण, आता डबल इंजिनच्या गतीने राज्यातील महामार्ग चौपदरीकरण तसेच अन्य प्रकल्प मार्गी लावले जातील असेही सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाAshish Shelarआशीष शेलारNitesh Raneनीतेश राणे