शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

...तरच कोकणात शेती, मत्स्य व्यवसायाला चांगले दिवस येतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 18:32 IST

विजयकुमार : सावंतवाडीत आरोग्य पर्यावरण, शाश्वत शेती विषयावर मार्गदर्शन

सावंतवाडी : येथील आंबा, काजू, नारळ या पिकांसोबत भातशेतीला सेंद्रिय शेतीची जोड दिल्यास मूर्त स्वरुप येईल. जे शेतकरी सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यास प्रोत्साहित आहेत, त्यांच्या मालाला सेंद्रिय प्रमाणीकरण प्रक्रियेत समाविष्ट केले गेल्यास भविष्यात कोकणात शेती व मत्स्य व्यवसायाला चांगले दिवस येतील, असे मत केंद्र्र सरकारचे कृषी विभागाचे तत्कालीन सचिव विजयकुमार यांनी व्यक्त केले. 

सावंतवाडी येथील नवसरणी सभागृहात रेसिड्यू फ्री आॅरगॅनिक मिशन इंडिया फेडरेशन तसेच सिंधुदुर्ग जिल्हा आॅरगॅनिक फेडरेशन व कोकण भूमी प्रतिष्ठान यांंच्यावतीने आरोग्य, पर्यावरण, शाश्वत शेती या विषयांवर कार्यशाळेचे  आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला  उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, रेसिड्यू फ्री आॅरगॅनिक मिशन इंडिया फेडरेशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब परुळेकर, आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण तज्ज्ञ डॉ. प्रशांत नाईकवाडी, ‘नोका’चे संचालय संजय देशमुख, कार्डो फुड्स प्रा. लि.चे संचालक सेनेट बालन, सचिव रणजित सावंत, पालकमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी किरण गावतुरे, रामानंद शिरोडकर, जिल्हा कृषी अधिकारी शेळके, कृषी अधिकारी आरिफ शहा, पर्यटन तज्ज्ञ गुरुनाथ राणे आदी उपस्थित होते.

यावेळी विजयकुमार म्हणाले, राज्य शासनाच्या चांदा ते बांदा कृषी योजनेतून कृषीविषयक भरघोस उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. केंद्र्र शासनाच्या कृषी खात्यात  सचिवपदापर्यंत गेली ३५ वर्षे कृषीविषयक क्षेत्रात जवळून काम करण्याची संधी मिळाली. मराठवाडा, विदर्भसारख्या ठिकाणी कापसाचे भरघोस उत्पादन होते. मात्र, रासायनिक खतांच्या परिणामामुळे तेथील शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. त्यांना शासनाकडून साडेतीन हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागली. त्यानंतर त्याची कारणे शोधली असता भयानक वास्तव समोर आले. सेंद्रिय शेतीतून कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळाले पाहिजे. शिवाय ग्राहकांना समाधान मिळेल हे बघितले पाहिजे. गेल्या साठ दशकांपासून आपण शेती व पिकांसाठी पेस्टीसाईड व रासायनिक कीटकनाशके, तणनाशके वापरण्यावर भर दिला आहे. त्यामुळे माणसाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. 

उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेल्या कोकणला रासायनिक खतांच्या प्रदूषणापासून वाचविणे आवश्यक आहे. यावर खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने ६० ते ७० टक्के एवढी रासायनिक खतांची विक्री कमी केली आहे. त्यामुळे जमीन, पाणी व पर्यावरणाचेही प्रदूषण होते. शेतकऱ्यांमध्ये आता जागरुकता निर्माण होत आहे. त्यांनीही रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय शेतीवर भर दिला आहे. भारतात सेंद्रिय शेतीला मोठे मार्केट असून, केंद्र व राज्य सरकारने युवा पिढीसाठी अनुदान देत येथील शेतकऱ्यांना समृद्ध केले असल्याचे सांगितले.

रेसिड्यू फ्री आॅरगॅनिक मिशन इंडिया फेडरेशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब परुळेकर यांनी कोकण हा समृद्ध जैवविविधता असलेला प्रदेश आहे. हरितक्रांतीच्या नावाखाली रासायनिक खतांचा बेसुमार वापर करून जमीन, हवा, पाणी दूषित होत आहे. यावर उपाययोजना व्हावी म्हणून सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट आॅरगॅनिक फार्मर फेडरेशनची स्थापना केली. शेतकऱ्यांसाठी अ‍ॅक्शन प्लॅन तयार करून माहिती दिली. सिंधुदुर्गातील शेतकरी सेंद्रिय शेती करतात. त्यांच्या उत्पादनांचे प्रमाणीकीकरण करून देशविदेशात बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी हे फेडरेशन कार्यरत आहे. कोकणात सेंद्रिय शेती ही चळवळ उभी करून त्या माध्यमातून सुरक्षित अन्न द्यायचे व शेतकऱ्यांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी विषमुक्त शेतीवर भर देणे ही या फेडरेशनची संकल्पना आहे, असे ते म्हणाले. 

नियंत्रण कक्षाची गरज : विजयकुमार सेंद्रिय शेतीतून हमखास उत्पादन व मार्केट मिळण्याची हमी आहे. यातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होऊन ते सधन होतील. सेंद्रिय शेतीवर भर देण्यासाठी शेतकऱ्यांनी गट निर्माण केले पाहिजेत. शेतकºयांशी संवाद साधण्यासाठी व नोंदणीकृत शेतकऱ्यांना तत्काळ मार्गदर्शन मिळेल. यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला पाहिजे, असे ते म्हणाले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग