शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

आॅनलाईनचा धान्य दुकानदारांना फटका, ग्राहकांना धान्य मिळण्यास अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 11:33 AM

ग्रामीण भागात पॉस मशीनसाठी आवश्यक इंटरनेट मिळत नसल्याने मशीन निरुपयोगी ठरते. त्यामुळे ग्राहकांना रेशनवरील धान्य मिळण्यास अडचणी निर्माण होतात. शासनाकडून आॅनलाईन विक्रीतूनच धान्य दुकानांना धान्यसाठा केला जातो. मात्र, आॅनलाईनमुळे धान्यसाठा कमी होत असल्याने ग्राहक व धान्य दुकानदारांचे नुकसान होते.

ठळक मुद्देवेंगुर्ले पंचायत समिती सभेत रंगली चर्चाआॅफलाईन धान्य वितरणाच्या आधारावर धान्यसाठा द्यावा

वेंगुर्ले : ग्रामीण भागात पॉस मशीनसाठी आवश्यक इंटरनेट मिळत नसल्याने मशीन निरुपयोगी ठरते. त्यामुळे ग्राहकांना रेशनवरील धान्य मिळण्यास अडचणी निर्माण होतात. शासनाकडून आॅनलाईन विक्रीतूनच धान्य दुकानांना धान्यसाठा केला जातो. मात्र, आॅनलाईनमुळे धान्यसाठा कमी होत असल्याने ग्राहक व धान्य दुकानदारांचे नुकसान होते.त्यामुळे तालुक्यात पूर्ण क्षमतेचे इंटरनेट व सर्व्हर जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत आॅफलाईन धान्य वितरण करावे. तसेच आॅफलाईन धान्य वितरणाच्या आधारावर शासनाने दुकानांना धान्यसाठा द्यावा, असा ठराव पंचायत समिती सभेत करण्यात आला.वेंगुर्ले पंचायत समितीची मासिक सभा सभापती सुनील मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली व पंचायत समिती सदस्य यशवंत परब, श्यामसुंदर मुणनकर, मंगेश कामत, सिद्धेश परब, अनुश्री कांबळी, गौरवी मडवळ, साक्षी कुबल, प्रणाली बंगे तसेच गटविकास अधिकारी विद्याधर सुतार यांच्या उपस्थितीत झाली.तालुक्यात अनेक ठिकाणी घरकुल योजनेंतर्गत बांधलेल्या घरांमधील काही घरे बंद आहेत तर काही भाड्याने दिली आहेत. याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधूनही प्रशासनाने कोणतीच माहिती दिली नसल्याचे गौरवी मडवळ यांनी सभेत सांगितले.

याबाबत त्याचा सर्व्हे झाला असून लवकरच संबंधितांना नोटिसा काढणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी सुतार यांनी दिली. शिरोडा बसस्थानक येथील भिंतीच्या कामाचे काय झाले, या प्रश्नावर त्याची निविदा प्रक्रिया झाली असून, हे काम लवकरच मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.पंचायत समिती सभागृहात सदस्यांनी मांडलेल्या सूचना व ठराव तालुक्यातील जनतेसाठी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे त्या सूचना व ठरावांबाबत पुढे कोणती कार्यवाही झाली, त्याची माहिती प्रशासनाने पुढील सभेत ठेवावी, असा ठराव अनुश्री कांबळी यांनी मांडला. याबरोबरच इतर विविध विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली.शिष्यवृत्ती परीक्षा मध्यवर्ती केंद्रावर घ्यावी!पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा वेंगुर्ले शहरातील वेंगुर्ले हायस्कूल, पाटकर हायस्कूल व मदर तेरेसा हायस्कूल येथे होतात. तालुक्यातील टोकाच्या भागातील शाळांच्या मुलांना २० ते ३० किलोमीटर प्रवास करून परीक्षेला यावे लागते. यात त्यांना आर्थिक भुर्दंड पडतो. त्यामुळे केंद्र्रबलगटातील मध्यवर्ती केंद्र्रावर शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जावी, असा ठराव मंगेश कामत यांनी मांडला.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीsindhudurgसिंधुदुर्ग