शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

कणकवली तहसिल कार्यालयावर नितेश राणेंची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 11:38 AM

कणकवली तहसिल कार्यालयात ४२४ दाखले प्रलंबित असल्याने महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण निर्माण झाली असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांना मिळाली. त्यामुळे या समस्येची तत्काळ दखल घेत त्यांनी सोमवारी आपल्या सहकाऱ्यांसमवेत येथील तहसिल कार्यालयावर धडक दिली.

ठळक मुद्देतहसिलदारांसह कर्मचाऱ्यांना धरले धारेवरदाखले व अन्य कामे तातडीने मार्गी लावण्याची सूचना

कणकवली: कणकवली तहसिल कार्यालयात ४२४ दाखले प्रलंबित असल्याने महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण निर्माण झाली असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांना मिळाली. त्यामुळे या समस्येची तत्काळ दखल घेत त्यांनी सोमवारी आपल्या सहकाऱ्यांसमवेत येथील तहसिल कार्यालयावर धडक दिली.तहसिल कार्यालयातील महसुल शाखा, दुय्यम निबंधक कार्यालय आणि प्रांत कार्यालयातील सर्व विभागाना भेट देत कर्मचाऱ्यांकडून कामातील समस्या जाणून घेतल्या. तसेच कार्यपध्द्तीत तत्काळ बदल करून जनतेला चांगल्या सुविधा द्या असे तहसिलदार व अधिकाऱ्यांना ठणकावले. ४२४ एवढे दाखले प्रलंबित का राहिले? असा जाबही विचारला. जोपर्यंत जनतेची कामे मार्गी लागत नाहीत तोपर्यंत कार्यालयात आपण ठाण मांडणार असा इशारा देताच अवघ्या दोन तासात ६३ दाखले निकाली काढण्यात आले.कणकवली तहसिल कार्यालयात आमदार नितेश राणे यांनी तहसिलदार संजय पावसकर यांची भेट घेतली. यावेळी नायब तहसिलदार आर. जे. पवार, रवींद्र कडुलकर आदी अधिकारी उपस्थित होते. तसेच स्वाभिमान पक्षाचे शहराध्यक्ष राकेश राणे, युवक जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, उपाध्यक्ष सोनू सावंत, माजी उपसभापती महेश गुरव, पंचायत समिती सदस्य मनोज रावराणे, मिलींद मेस्त्री, महेश लाड, स्वप्नील चिंदरकर, कान्हा मालंडकर, माजी नगरसेवक अण्णा कोदे, संजय नकाशे, संतोष कानडे, भालचंद्र साटम, राकेश परब , उत्तम सावंत आदी स्वाभिमान पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.प्रलंबित दाखल्यांबाबत तहसिलदार संजय पावसकर यांना विचारणा केली असता त्यांनी आज दाखले होतील, असे उत्तर दिले. त्यावेळी आमदारांनी त्याच टेबलवर चला, बघुया दाखले का पेंडींग आहेत ते़ ? असे सांगितले. त्या ठिकाणी चौकशी केली असता ४२४ दाखले प्रलंबीत असल्याचे दिसले.आमदार राणे यांनी दाखले का प्रलंबीत ठेवलात? सकाळपासून किती दाखले केलात? प्रलंबीत कामे ठेवून जनतेला त्रास का देता? अशी विचारणा कर्मचाऱ्यांना केली. त्यावेळी इंटरनेट व सर्व्हर डाऊन असल्याने अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. तिथेच उभे राहून नितेश राणे यांनी कामाचा आढावा घेतला. त्यावेळी इंटरनेटला चांगला 'स्पीड ' असल्याचे दिसून आले. त्यावेळी तहसिलदारांना आता इंटरनेटचा स्पीड चांगला आहे, चार माणसे बसवा आणि दाखल्यांचे काम मार्गी लावा, असे नितेश राणे यांनी सांगितले. त्यानंतर अवघ्या दोन तासात तब्बल ६३ दाखले निकाली निघाल्याने आमदार येताच आता कसा स्पीड मिळाला अशी कोपरखळी तहसिदारांना आ़मदार राणे यांनी मारली .यावेळी वीज प्रवाह खंडीत झाल्याने वीज वितरणचे सहाय्यक कार्यकारी अभियंता भगत याना तहसिल कार्यालयात बोलविण्यात आले. त्यांना आमदार राणे यांनी तहसिल कार्यालयाला वेगळ्या फीडरवरून वीज पुरवठा करा. कारण हजारो लोकांची कामे तहसिल कार्यालयाशी निगडीत आहेत. वीज गेल्यास सर्व सेवा ठप्प होतात. या फिडरवरील काम सकाळी १० पूर्वी किंवा संध्याकाळी ७ नंतर करावे. तहसिलदार यांच्याशी चर्चा करून वीजेचा प्रश्न मार्गी लावा. नागरीकांची गैरसोय करून नका . अशा सूचना दिल्या.दुय्यम निबंधक कार्यालयातील लिपीक धारेवर !कणकवली दुय्यम निबंधक कार्यालयाअंतर्गत चाललेले कामकाज जनतेसाठी त्रासदायक असल्याची बाब स्वाभिमान कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या लक्षात आणून दिली. यावेळी कासार्डे येथील संजय नकाशे यांनी दुय्यक निबंधक कार्यालयातील घाडीगांवकर हा लिपीक अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन जनतेला त्रास देतो. जिल्हा परिषद शाळेच्या बक्षीस पत्रासाठी ८० वर्षाच्या वृध्देला इंटरनेट नसल्याने आॅफलाईन काम न करता दिवसभर बसवून परत पाठविले. शासनाचा जीआर आॅफलाईन काम करण्याचा असतानादेखील हा लिपीक जाणीवपुर्वक त्रास देत असल्याचे सांगितले. यावेळी आमदार राणे यांनी तुमच्या कामात बदल करा असे सांगत त्या लिपीकाला समज दिली.स्टॅम्प विक्रेत्यांना आमदारांचा इशारा !तहसील कार्यालयातील स्टॅम्प विक्रेत्यांकडून स्टॅम्प दिले जात नाहीत. अशी तक्रार आमदारांकडे काही नागरिकांनी केली. त्यामुळे त्यांनी तिथे पाहणी केली असता एकाच स्टॅम्प विक्रेत्याकडे गर्दी दिसून आली. त्या स्टॅम्प विक्रेत्याला आमदारानी समज दिली. तसेच स्टॅम्प विक्रीच्या मुद्यावर दुय्यम निबंधक जाधव यांनाही विचारणा केली. नागरिकांना दोन-दोन तास स्टॅम्प घेण्यासाठी थांबावे लागते, तुमचा लक्ष आहे काय? तहसिलदार काय करता तुम्ही? अशी विचारणा केली. तसेच विक्रेत्यांकडून दररोज आढावा घ्या. एकाच विक्रेत्याने स्टॅम्प न देता सर्वांनी द्यावे. नागरीकांची गैरसोय होता नये. पुन्हा तक्रार आल्यास खपवून घेतले जाणार नाही. असे सांगितले.प्रतिज्ञापत्र २० मिनिटात दिलेच पाहिजे !नागरीकांना दोन-दोन तास प्रतिज्ञापत्रासाठी थांबावे लागल्यास बाहेरून येणाऱ्या लोकांनी करायचे काय? सेतू कार्यालयात प्रतिज्ञापत्र दाखल झाल्यापासून अवघ्या वीस मिनिटात संबंधित अधिकाऱ्याची सही होऊन नागरीकांना प्रतिज्ञापत्र दिले जावे . कुठलाही हलगर्जीपणा चालणार नाही. प्रतिज्ञापत्रामध्ये नागरीक आपली हमी देत असतात. त्यामुळे त्यात त्रुटी काढून जनतेला त्रास देऊ नका. पुढील काळात मी या सेवांचा आढावा घेणार असल्याचे आमदार राणे यांनी सांगितले.प्रांत कार्यालयाला भेट !कणकवली प्रांताधिकारी कार्यालयाला आमदार राणे यानी भेट दिली असता २१५ दाखले अधिकाऱ्यांच्या सहीसाठी प्रलंबित असल्याची बाब उघड झाली. तसेच वैभववाडीतील अंध असलेले दिलीप नारकर व अन्य नागरीकांनी प्रांत कार्यालयातील प्रलंबीत दाखल्यांबाबत तक्रारी केल्या़. त्याबाबत चौकशी केली असता कर्मचाऱ्यांनी इंटरनेट सेवेचे कारण पुढे केले. आमदार राणे यांनी कोणतीही सबब सांगून चालणार नाही. विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्याचा प्रश्न आहे. कोणत्याही परिस्थितीत दाखल्यांचा निपटारा करा, अशा सूचना नायब तहसिलदार आर. जे. पवार व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. 

टॅग्स :TahasildarतहसीलदारNitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग