शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

सर्वाधिक ग्रामपंचायत निवडणुका सिंधुदुर्गात; आॅनलाईन अर्ज भरण्याची पद्धत चांगली - जे. एस. सहारिया  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 22:11 IST

राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून या निवडणुका शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्व प्रकारची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली.

कुडाळ : राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून या निवडणुका शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्व प्रकारची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली. ते कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यात ४६ सरपंच व ९२६ ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे असे सांगत अर्ज भरण्यासाठी आॅनलाईनची पद्धत चांगली असल्याचे मत व्यक्त केले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६ आॅक्टोबरला ४२५ पैकी ३२५ ग्रामपंचायतींच्या होणा-या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी राज्याचे निवडणूक आयोगाचे आयुक्त सहारिया व सचिव शेखर चन्ने सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौ-यावर आले होते. सोमवारी सायंकाळी एमआयडीसीच्या विश्रामगृहावर त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी राज्य निवडणूक सचिव चन्ने, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी व इतर अधिकारी उपस्थित होते.सहारिया म्हणाले, राज्यात सर्वात जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत आहेत. ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून दोन्हीही पदांसाठी एकूण ६ हजार ५०० उमेदवारी अर्ज आले होते. अर्ज छाननीनंतर सरपंचपदासाठी ८३७ व ग्रामपंचायत सदस्यपदासाठी ३ हजार ६६१ एवढे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.निवडणूक प्रक्रिया शांततेत, सुरळीत व चांगल्या पध्दतीने पार पाडण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रकारचे नियोजन व तयारी पूर्ण झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात पोलीस यंत्रणेमार्फत ४५ विभाग करण्यात आले असून २० ठिकाणी नाका तपासणी पथके सीसीटीव्ही यंत्रणेसहीत कार्यान्वित असणार आहेत. भरारी पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. आवश्यकता वाटल्यास भरारी पथके वाढविण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यात येणारे रस्ते, रेल्वे, समुद्र्री व हवाई मार्ग या ठिकाणीही चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.निवडणुका जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत १०१ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून यामध्ये विविध ठिकाणी पकडलेल्या सुमारे ४६ लाख रुपयांच्या अवैध दारूच्या तसेच विनापरवाना शस्त्रास्त्र बाळगल्याच्या गुन्ह्यांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. ४६ सरपंच, ९२६ सदस्य बिनविरोध : सहारियानिवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सरपंचांपैकी ४६ सरपंच बिनविरोध झाल्याने २७९ सरपंचपदासाठी, तर ९२६ सदस्य बिनविरोध झाल्यामुळे १ हजार ७३५ ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी निवडणूक होणार आहे, असे सहारिया यांनी सांगितले. जिल्ह्यात ४ लाख २ हजार मतदार असून १ हजार २९ मतदान केंद्र्रांसाठी ६१९ इमारती निश्चित करण्यात आल्या आहेत. सर्वात जास्त मतदान केंद्रे कणकवली तालुक्यात असल्याचेही सहारिया यांनी सांगितले.

टॅग्स :Electionनिवडणूक