शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नक्की कोणते द्रव पाजायचा?
2
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
3
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
4
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
6
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
7
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
8
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
9
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
10
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
11
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
12
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
13
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
14
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
15
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
16
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
17
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
18
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
19
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
20
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींचा निधी पडून

By admin | Updated: September 26, 2014 23:32 IST

ई टेंडरिंग रखडले : ४४ वाड्यांच्या योजनांवर परिणाम

रहिम दलाल -रत्नागिरी -ग्रामपंचायतींकडून ई - टेंडरिंगची कामे वेळेवर होत नसल्याने राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातील ४४ वाड्यांची कामे रखडली आहेत़ त्यामुळे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे कोट्यवधी रुपयांचा निधी पडून आहे़ केंद्र शासनाने भारत निर्माण कार्यक्रमाचे नामकरण राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम असे केले़ या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील वाड्या, वस्त्या आणि तांडे यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दरवर्षी भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाणी पुरवठ्याच्या अनेक योजना राबविण्यात आल्या़या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ३९९ वाड्यांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला होता़ त्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये ३२६ वाड्या आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये ७३ वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे़ यामधील सुमारे १०० कामे पूर्ण झाली असून, २५३ कामे सुरु आहेत़ अजूनही ४४ ग्रामपंचायतींकडून कामांचे ई-टेंडरिंग करण्यात आलेले नाहीत़ या कार्यक्रमांतर्गत राबवण्यात येणाऱ्या नळपाणी पुरवठा योजनांच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया करावी लागते़ त्यासाठी ही निविदा ई-टेंडरिंगने काढणे आवश्यक आहे़ मात्र, अनेक ग्रामपंचायतींकडून ई-टेंडरिंगचे काम वेळेवर होत नसल्याने निविदा प्रक्रियेला वेळ लागत असल्याने ही कामे अडकली आहेत़ त्यामुळे या कार्यक्रमाचा कोट्यवधी रुपयांचा निधी पडून आहे़जिल्ह्यातील राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनांची कामे रखडल्याने ई-टेंडरिंग करण्याबाबत जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून ग्रामपंचायतींना वेळोवेळी कळविण्यात आले आहे़ मात्र, ग्रामपंचायती याकडे दुर्लक्ष करीत आहे़ राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातील योजनेंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे इ टेडरिंगपध्दतीचा वापर होणार आहे.