शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वैभव नाईकांच्या समर्थनात मोर्चा: अरविंद सावंतांसह पंधरा जणांवर कुडाळमध्ये गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 13:43 IST

मात्र आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.

कुडाळ: आमदार वैभव नाईक यांची लाच लुचपत प्रतिबंध विभागाने सुरू केलेल्या चौकशीच्या विरोधात कुडाळ येथे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकरांवर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. प्राथमिक १५ जणांवर हे गुन्हे दाखल झाले आहेत. या संदर्भात पोलीस व्हिडिओ रेकॉर्डिंग वरून अन्य कार्यकर्त्यांवर सुद्धा गुन्हे दाखल करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांनी मनाई आदेश लागू केला आहे. असे असताना आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंध विभागामार्फत सुरू असलेल्या चौकशीच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्यावतीने कुडाळ येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या माध्यमातून मनाई आदेशाचे उल्लंघन करण्यात आले.मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख राजन नाईक, गौरीशंकर खोत, सतीश सावंत, संतोष शिरसाट, रुपेश पावसकर, अतुल बंगे, संदेश पारकर, जान्हवी सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभय शिरसाट यांच्या विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक तेजस्वी शिंदे यांनी शासकीय तक्रार दाखल केली आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास करत असताना मोर्चाच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग वरून अन्य कार्यकर्त्यांवर सुद्धा गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.वैभव नाईकांना वगळले?या मोर्चामध्ये आमदार वैभव नाईक हे सहभागी झाले होते आणि यासंदर्भातील व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा आहेत. मात्र कुडाळ पोलिसांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVaibhav Naikवैभव नाईक Arvind Sawantअरविंद सावंतPoliceपोलिस