शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

मालवण पर्यटकांनी फुलले, हजारोंची गर्दी, सलग सुट्यांमुळे सिंधुदुर्ग किनारपट्टीला सर्वाधिक पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2017 4:06 PM

सलग सुट्या आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मालवणी भाषेत यवा कोकण आपलाच आसा असे म्हणण्याची वेळ आता राहिलेली नाही. कारण देश, परदेशासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक मालवण आणि सिंधुदुर्ग किनारपट्टीवर दाखल झाले आहेत.

- महेश सरनाईक सिंधुदुर्ग - सलग सुट्या आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मालवणी भाषेत यवा कोकण आपलाच आसा असे म्हणण्याची वेळ आता राहिलेली नाही. कारण देश, परदेशासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक मालवण आणि सिंधुदुर्ग किनारपट्टीवर दाखल झाले आहेत. गेले दोन दिवस शेकडो वाहनांनी मालवण व्यापून गेलेय. परिणामी वाहतूक कोंडीची समस्याही जाणवत आहे.समुद्रकाठचे पर्यटन आता देशभरासह परदेशातही आघाडीवर आहे. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेल्या १२१ किलोमीटरच्या किनारपट्टीवर प्रत्येक बिच लोभसवाणे आहे. त्यामुळे या भागात एकदा आलेला पर्यटक आपण स्वतःच पुढच्या आपल्या दौऱ्यात आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना घेऊन यायचं प्लॅन करतो आणि दौऱ्यावर आल्यावर पुढच्या दौऱ्याचे नियोजन केले जाते.तारकर्ली, देवबागाला सर्वाधिक पसंतीपर्यटनात मालवणचे नाव घेतलं की तारकर्ली आणि देवबाग या जोडगोळीचे नाव पुढे येणारच. कारण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने येथे पर्यटक निवास बांधले आहेत. तर स्थानिक तरुण आणि उद्योजकांनी घर तेथे जेवण, राहण्याची व्यवस्था करत पर्यटकांसाठी कमी पैसात समुद्र सान्निध्यात राहण्याची सोय उपलब्ध करून दिल्याने पर्यटक या भागाला पसंती देत आहेत.ऑनलाईन बुकिंगला पसंतीसरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे धुमधडाक्यात स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी २० डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत आगाऊ बुकिंग केले आहे. अचानक मालवणच्या दौऱ्याचा बेत आखाला तर राहण्यासाठी हॉटेल्स मिळणे कठीण आहे.पर्यटन वाढले, अपेक्षाही वाढल्याफेसाळणाऱ्या लाटा आणि नयनरम्य किनारा अनुभवण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी मालवण किनारपट्टीवर भेट देत आहेत. सिंधुदुर्गात पर्यटकांचा ओढा विचारात घेता स्थानिकांनी शासनाच्या योजनांची वाट न बघता पर्यटन व्यवसायातून रोजगार निर्मितीवर भर देत पदरचे पैसे घालून मोठ्या दिलाने पर्यटन व्यवसाय उभा केला. त्यानंतर प्रत्येक वर्षी व्यापकता वाढत गेली. पर्यटन वाढले, पर्यटकांच्या अपेक्षाही वाढल्या.सिंधुदुर्ग पर्यटनाची पंढरीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वेगळाच आनंद देऊन जाते. येथे असलेली जैवविविधता, नैसर्गिक साधनसंपत्ती तसेच विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण खाद्यसंस्कृती, लोककला आदींची भुरळ पर्यटकांना नेहमीच पडते. पर्यटकांना नानातऱ्हेचे साहसी खेळ उपलब्ध करून स्थानिकांनी पर्यटकांशी नाते निर्माण केले. यातूनच दरवर्षी पर्यटन बहरत आहे. पर्यटकांनी मालवणसह, वेंगुर्ले आणि देवगड तालुक्याला पसंती दिल्याने पर्यटनाच्या बाबतीत सिंधुदुर्ग राज्यात प्रथम क्रमांकांचा जिल्हा ठरत आहे.

टॅग्स :tourismपर्यटनMalvan beachमालवण समुद्र किनाराsindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकण