शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडी काळाची गरज - विनायक राऊत

By सुधीर राणे | Published: March 05, 2024 6:06 PM

सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करूया

कणकवली: लोकसभेची निवडणूक आपल्याला जिंकायचीच आहे. पुन्हा सत्तेत येण्यापासून भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीही काळाची गरज आहे. लोकसभा ते अगदी ग्रामपंचायत निवडणुकीतही ती कायम राहणार आहे. त्यामुळे सर्वांनी एकदिलाने काम करूया.कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करूया. असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी केले. कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालयात मंगळवारी महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत खासदार विनायक राऊत यांच्या 'लेखा जोखा' या कार्यअहवाल पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.  यावेळी आमदार वैभव नाईक, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संजय पडते, बाळा गावडे, सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,जान्हवी सावंत, नीलम सावंत,अतुल रावराणे,संग्राम प्रभुगावकर, भाई गोवेकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, रेवती राणे, अर्चना घारे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,विकास सावंत, साक्षी वंजारे, नागेश मोरये,आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.राऊत म्हणाले, संसदपटू बॅ. नाथ पै,मधू दंडवते, सुरेश प्रभू, सुधीर सावंत या माजी खासदारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आतापर्यंत मी काम केले आहे. विरोधी पक्षामध्ये असून सुद्धा जनतेच्या प्रश्नांवर  संसदीय सर्व आयुधे वापरून आवाज उठविला आहे. लवासा सारखे आंबोली येथे २७ बंगले बांधले आहेत. तिथे दीपक केसरकर सिंधूरत्न योजनेमधून रस्त्यासाठी एक कोटी रुपये खर्च करीत होते. त्याचा भांडा फोड आम्ही केला. प्रमोद जठार माझ्यावर टीका करीत आहेत. मात्र, रिफायनरी प्रकल्पाच्या नावाखाली सामान्य जनतेला देशोधडीला लावून भूमाफियाना साथ देणाऱ्यांना मी विरोध केला. त्यामुळे मी खलनायक आहे. जनतेच्या हितासाठी मी यापुढेही लढत राहीन, मग मला कितीहीवेळा खलनायक म्हटले तरी चालेल. संसदेत मी आवाज उठवल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी मिळाली, हे लक्षात ठेवावे.आम्ही एकसंघ महाविकास आघाडीमध्ये कोणीही आग लावण्याचा प्रयत्न केला तरी आम्हाला फरक पडणार नाही. आम्ही एकसंघ आहोत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात महायुतीचे चार मंत्री असताना गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना इथे आणावे लागते, हे दुर्दैव आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लक्षात ठेवावे की, त्यांचे राज्य आमच्या लोकांवर आवलंबून आहे.त्यामुळे आधी गोवा उभारा आणि मग सिंधुदुर्गात या. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत बेसावध आणि बेफिकीर राहू नये,प्रत्येक घराघरात जावून आपला विचार पोहचवावा.भाजप नेते तसेच राणे कुटुंबीय माझ्यावर टीका करतात. मात्र,  गेल्या १० वर्षात वडिलोपार्जित जमीनीपेक्षा माझी किती जमीन वाढली आहे. ते मला दाखवावे. तसेच वाढलेली जमीन असेल तर राणे कुटुंबीयांनी ती घ्यावी. मंत्रीपद भोगूनही उदय सामंत यांना जे शक्य झाले नाही ते आम्ही करून दाखवले असेही ते म्हणाले. यावेळी आमदार वैभव नाईक तसेच महाविकास आघाडीतील इतर नेत्यांनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVinayak Rautविनायक राऊत BJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी