शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

कोकणी माणसाची बुद्धिमत्ता, गुणात्मक हुशारी विकासासाठी सार्थकी लावूया, नारायण राणे यांचे आवाहन

By सुधीर राणे | Updated: August 9, 2024 16:26 IST

सिंगापूर प्रमाणे हजारो कोटींची गुंतवणूक करणारे प्रकल्प कोकणात आणणार

कणकवली: सिंधुदुर्गातील बेकारी दूर करण्याचा माझा संकल्प आहे. सिंगापूर प्रमाणे हजारो कोटींची गुंतवणूक करणारे पर्यटनावर आधारित प्रकल्प इथे आणायचे आहेत. त्यासाठी सहकार्य करा. कोकणी माणसाची बुद्धिमत्ता, गुणात्मकता हुशारी येथील विकासासाठी सार्थकी लावूया असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी केले.कणकवली रेल्वे स्थानकासमोरील सुशोभिकरणाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, कोकण रेल्वेचे सहसंचालक आर.के.हेगडे, राव, कांबळे, सार्वजनिक बांधकामच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता विनायक जोशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, माजी आमदार राजन तेली, अॅड. अजित गोगटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जिल्हाध्यक्ष अबिद नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.नारायण राणे  म्हणाले, कणकवली रेल्वे स्थानकासमोरील सुशोभीकरण हे सर्वांच्या सहकार्यातून घडलेल्या विकासाचे प्रतीक आहे. त्यामुळे यापुढे नकारात्मकता मनातून काढून टाका. सहकार्याची भावना ठेवा. नुसते डोळे असून चालत नाही तर डोळसपणा हवा. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तो दाखवला. तसेच हे रेल्वे स्थानक सुशिभिकरणाचे सुंदर काम उभे केले.केंद्र सरकारने आणि राज्यातल्या महायुती सरकारने पायाभूत सुविधांमध्ये अशा प्रकारची फार मोठी सुधारणा केली आहे. लोकांची आर्थिक स्थिती सुधारावी,त्यांनी समृध्द व्हावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. कोकणी माणसाचे आतापर्यंत शोषण झाले होते.मात्र आता त्यांच्या घरात सुख आणि समाधान निर्माण व्हावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. एकमेकांच्या हातात हात असणे हे सलोख्याचे प्रतीक आहे. कोकणी माणसाने तसेच सर्व जाती, धर्मातील लोकांनी रेल्वेस्थानकावरील या हातात हात घातलेल्या शिल्पाचे अनुकरण करावे.राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा कल्याणकारी आणि आर्थिकदृष्टया समृद्ध बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना आपणही जोड दिली पाहिजे. तुम्ही दिलेल्या मतांची ताकद एवढी आहे की मला कोणी काहीही नाही म्हणत नाही. महाराष्ट्र सरकारने रेल्वे संदर्भातील कोणतेही पत्र अथवा परवानगी मागण्यासाठी प्रस्ताव केंद्राकडे दिल्यास तो मागे येणार नाही. त्यामुळे रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरील सोयीसुविधांसाठी, त्या ठिकाणी काम करण्यासंदर्भात परवानगी देण्यासाठी आपण राज्य सरकारचा प्रस्ताव आल्यावर संबंधित मंत्र्यांशी बोलून ती परवानगी मिळवून देऊ. देशाच्या तिजोरीत मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असलेले शहर ३४ टक्के हिस्सा उचलते. याचा विचार मुंबई लगत असणाऱ्या कोकणी माणसांनी केला पाहिजे. कोकण हे समृद्ध बनले पाहिजे. विरोधामुळे विकास होत नाही. हा विरोध थांबवा. इतर पक्षांची दुकाने आता बंद होत चालली आहेत.त्यामुळे प्रगतीसाठी भाजपचा  विचार आचरणात आणा.असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. निलेश पवार यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे