शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

कोकणी माणसाची बुद्धिमत्ता, गुणात्मक हुशारी विकासासाठी सार्थकी लावूया, नारायण राणे यांचे आवाहन

By सुधीर राणे | Updated: August 9, 2024 16:26 IST

सिंगापूर प्रमाणे हजारो कोटींची गुंतवणूक करणारे प्रकल्प कोकणात आणणार

कणकवली: सिंधुदुर्गातील बेकारी दूर करण्याचा माझा संकल्प आहे. सिंगापूर प्रमाणे हजारो कोटींची गुंतवणूक करणारे पर्यटनावर आधारित प्रकल्प इथे आणायचे आहेत. त्यासाठी सहकार्य करा. कोकणी माणसाची बुद्धिमत्ता, गुणात्मकता हुशारी येथील विकासासाठी सार्थकी लावूया असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी केले.कणकवली रेल्वे स्थानकासमोरील सुशोभिकरणाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, कोकण रेल्वेचे सहसंचालक आर.के.हेगडे, राव, कांबळे, सार्वजनिक बांधकामच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता विनायक जोशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, माजी आमदार राजन तेली, अॅड. अजित गोगटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जिल्हाध्यक्ष अबिद नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.नारायण राणे  म्हणाले, कणकवली रेल्वे स्थानकासमोरील सुशोभीकरण हे सर्वांच्या सहकार्यातून घडलेल्या विकासाचे प्रतीक आहे. त्यामुळे यापुढे नकारात्मकता मनातून काढून टाका. सहकार्याची भावना ठेवा. नुसते डोळे असून चालत नाही तर डोळसपणा हवा. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तो दाखवला. तसेच हे रेल्वे स्थानक सुशिभिकरणाचे सुंदर काम उभे केले.केंद्र सरकारने आणि राज्यातल्या महायुती सरकारने पायाभूत सुविधांमध्ये अशा प्रकारची फार मोठी सुधारणा केली आहे. लोकांची आर्थिक स्थिती सुधारावी,त्यांनी समृध्द व्हावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. कोकणी माणसाचे आतापर्यंत शोषण झाले होते.मात्र आता त्यांच्या घरात सुख आणि समाधान निर्माण व्हावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. एकमेकांच्या हातात हात असणे हे सलोख्याचे प्रतीक आहे. कोकणी माणसाने तसेच सर्व जाती, धर्मातील लोकांनी रेल्वेस्थानकावरील या हातात हात घातलेल्या शिल्पाचे अनुकरण करावे.राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा कल्याणकारी आणि आर्थिकदृष्टया समृद्ध बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना आपणही जोड दिली पाहिजे. तुम्ही दिलेल्या मतांची ताकद एवढी आहे की मला कोणी काहीही नाही म्हणत नाही. महाराष्ट्र सरकारने रेल्वे संदर्भातील कोणतेही पत्र अथवा परवानगी मागण्यासाठी प्रस्ताव केंद्राकडे दिल्यास तो मागे येणार नाही. त्यामुळे रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरील सोयीसुविधांसाठी, त्या ठिकाणी काम करण्यासंदर्भात परवानगी देण्यासाठी आपण राज्य सरकारचा प्रस्ताव आल्यावर संबंधित मंत्र्यांशी बोलून ती परवानगी मिळवून देऊ. देशाच्या तिजोरीत मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असलेले शहर ३४ टक्के हिस्सा उचलते. याचा विचार मुंबई लगत असणाऱ्या कोकणी माणसांनी केला पाहिजे. कोकण हे समृद्ध बनले पाहिजे. विरोधामुळे विकास होत नाही. हा विरोध थांबवा. इतर पक्षांची दुकाने आता बंद होत चालली आहेत.त्यामुळे प्रगतीसाठी भाजपचा  विचार आचरणात आणा.असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. निलेश पवार यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे