शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

सिंधूदुर्गमधील तिलारी धरणाचा डावा कालवा फुटला, लोकांनी अनुभवली पुरसदृश्य स्थिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 11:50 IST

या कालव्यांकडे तिलारी विभागाचे होत असलेले दुर्लक्ष आणि ठेकेदाराचा मनमानी कारभार, हा या कालवा फुटीला जबाबदार असल्याचे येथील नागरिक बोलत आहेत. यापूर्वीही माध्यमांतून या धरणाला अनेक ठिकाणी भगदाड पडल्याचे वृत्त आले आहे.

दोडामार्ग : सिंधूदुर्ग जिल्ह्यातील तिराळी धरणाचा गोवा आणि महाराष्ट्राला पाणीपुरवठा करणारा कालवा खानयाळे येथे फुटला. यामुळे येळपई नदीत ऐन उन्हाळ्यात लोकांनी पुरसदृश्य स्थिती अनुभवली. परिणामी तिराळी-दोडामार्ग दोन तासांहूनही अधिक काळ बंद राहिला. तिराळी धरण हे सिंधूदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठे मातीचे धरण आहे.

या कालव्यांकडे तिलारी विभागाचे होत असलेले दुर्लक्ष आणि ठेकेदाराचा मनमानी कारभार, हा या कालवा फुटीला जबाबदार असल्याचे येथील नागरिक बोलत आहेत. यापूर्वीही माध्यमांतून या धरणाला अनेक ठिकाणी भगदाड पडल्याचे वृत्त आले आहे. मात्र, तरीही निद्रिस्त असलेल्या तिलारी विभागाला जाग येत नव्हती. यामुळे अखेर खानयाळे येथे कालव्याला मोठे भगदाड पडून कालवा फुटला. परिणामी तेथील माती व पाणी लोकांच्या शेतात गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर उन्हाळ्यात शेतीला पाणीपुरवठा करणारा हा कालवा बंद होत असल्यामुळे शेती करपण्याची भीतीही शेतकर्‍यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

अधिकाऱ्यांच्या दूर्लक्षामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत आण याचे परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. एढेच नाही, तर प्रशासनाबरोबरच येथील आमदार, पालकमंत्री यांचेही याकडे लक्ष नाही. यामुळे या कालव्यांची योग्य दुरुस्ती आणि देखभाल होत नाही. यासंदर्भात आता, जोवर कालव्याचे पूर्ण ऑडिट होऊन त्याची संपूर्ण दुरुस्त होत नाही, तोवर यातून पाणी सोडू देणार नसल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र निंबाळकर यांनी दिला आहे. खासदार विनायक राऊत यांनी या घटनेची माहिती घेतली असून यासंदर्भात चौकशी होणार असल्याचे विभागप्रमुख संतोष मोर्ये यांनी म्हटले आहे. याशिवाय, तिराळी विभागाची कार्यालये तिराळीत आणावीत यासाठीही येथे उपोषण करण्यात येणार असल्याचे समजते. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गWaterपाणीfloodपूरDamधरण