शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
4
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
5
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
6
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
7
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
8
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
9
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
10
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
11
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
12
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
13
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
14
Navi Mumbai: तीन मित्रांच्या जीवावर बेतली पावसाळी सहल 
15
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
16
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
17
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
18
IPO: 'स्वप्न विकणारे' आयपीओ ठरले फसवे, रिटर्न्समध्ये गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग !
19
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
20
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली

तलाव, धरणांच्या पाणी पातळीत कमालीची घट ; सिंधुदुर्गातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 11:56 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने नंतरच्या काळात तुरळक हजेरी लावली . सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये आवश्यक असा पाऊस न झाल्याने सिंधुदुर्गातील तलाव आणि धरणांच्या पाणी पातळीतही यावर्षी कमालीची घट झाल्याचे चित्र आहे. यापूर्वीच नदीनाल्यांची पात्रे आटली असून अनेक ठिकाणी यावर्षी उन्हाच्या चटक्यांबरोबरच पाणीटंचाईची झळ अधिक तीव्र झाली आहे.

ठळक मुद्देतलाव, धरणांच्या पाणी पातळीत कमालीची घट ; सिंधुदुर्गातील स्थितीउन्हाबरोबरच पाण्याची झळ बसण्याची शक्यता !

सुधीर राणेकणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने नंतरच्या काळात तुरळक हजेरी लावली . सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये आवश्यक असा पाऊस न झाल्याने सिंधुदुर्गातील तलाव आणि धरणांच्या पाणी पातळीतही यावर्षी कमालीची घट झाल्याचे चित्र आहे. यापूर्वीच नदीनाल्यांची पात्रे आटली असून अनेक ठिकाणी यावर्षी उन्हाच्या चटक्यांबरोबरच पाणीटंचाईची झळ अधिक तीव्र झाली आहे.त्यामुळे यापुढील काळात पाण्याचा वापर अधिक जपून करावा लागणार आहे. ज्या तुलनेत यावर्षी कच्चे आणि पक्के बंधारे होण्याची आवश्यकता होती ते बांधण्याबाबत प्रशासनाकडून म्हणावी तशी तत्परता दिसलेली नाही. त्याचा फटका आता मे महिन्यात बसणार आहे. वेळेवर पाऊस न पडल्यास जिल्ह्यातील काही ठिकाणच्या ग्रामस्थाना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे.गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाणीसाठ्यात निश्चितच घट झाली आहे. त्यामुळे तलाव आणि धरणांमधील पाणीसाठ्याचा नियोजनपूर्वक वापर यापुढील कालावधीत करावा लागणार असल्याची बाब जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघुपाटबंधारे प्रकल्पातील ३१ ऑक्टोबर अखेरच्या अहवालानुसार उपयुक्त पाणीसाठा आणि त्याची टक्केवारी पाहिल्यानंतर समोेर आली आहे. काही ठिकाणची एप्रिल अखेरची आकडेवारी उपलब्ध झाली असून पाणी साठ्यात मोठया प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे.ऑक्टोबर २०१८ अखेर देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पात ६९.६६८० द.ल.घ.मी उपयुक्त पाणी साठा ( ७१.०८टक्के) होता. गतवर्षी याकालावधीत या धरणामध्ये ८५.०७ टक्के उपयुक्त पाणी साठा होता. तर तिलारी आंतरराज्य प्रकल्पामध्ये ३५२.०८९० द.ल.घ.मी. पाणी साठा (७८.७०टक्के ) होता. गतवर्षी ऑक्टोबर अखेर ही पाणी साठ्याची टक्केवारी ९४ टक्के होती.तिलारी जलविद्युत प्रकल्पामध्ये ऑक्टोबर २०१८ अखेर ८४.१९०० द.ल.घ.मी. पाणी साठा (९८.५७ टक्के ) होता. कोर्ले-सातंडी मध्यम प्रकल्पामध्येही गतवर्षी आणि यावर्षीची उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ऑक्टोबर मध्ये १०० टक्के होती . २६एप्रिल २०१९ रोजी ही टक्केवारी ९१. ९६ आहे. म्हणजेच २३.५०८ द.ल.घ.मी पाणी साठा आहे. एप्रिल २०१८ मध्ये हा पाणी साठा २३.७३२ द.ल.घ.मी(९२.८३ टक्के) होता.शिवडाव लघुपाटबंधारे प्रकल्पामध्ये २.४९५७ द.ल. घ.मी उपयुक्त पाणी साठा (९४.२५ टक्के) ऑक्टोबर मध्ये होता. या कालावधीत गतवर्षी याच तलावात पाण्याची टक्केवारी १०० टक्के म्हणजे २.६४८० द.ल. घ.मी. पाणीसाठा होता. तर आता एप्रिल २०१९ मध्ये ०.७४७६ द.ल. घ.मी म्हणजे २८.२३टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी एप्रिल मध्ये ०.९४६२ द.ल. घ.मी म्हणजे ३५.७३ टक्के पाणी साठा होता.नाधवडे धरणात ऑक्टोबर २०१८ मध्ये उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ९५.८४ टक्के असून गतवर्षी ऑक्टोबर मध्ये ती १०० टक्के होती. एप्रिल २०१९ अखेर ती २.०१५१ द.ल. घ.मी म्हणजे ४६.१३ टक्के पाणी साठा आहे. तर एप्रिल २०१८मध्ये १.९७५० द.ल. घ.मी म्हणजे ४५.२२ टक्के पाणी साठा होता.ओटव धरणामध्ये ऑक्टोबर २०१८ मध्ये उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ९४.७६ टक्के होती. गतवर्षी या कालावधीत ती १०० टक्के होती. तर एप्रिल २०१९ अखेर १.९७०७ द.ल. घ.मी म्हणजे ४२. ११ टक्के पाणी साठा आहे. एप्रिल २०१८मध्ये २.१८९७ द.ल. घ.मी म्हणजे ४६.७९ टक्के पाणी साठा होता.देंदोणवाडी प्रकल्पामध्ये एप्रिल २०१९ अखेर ०.१४६६ द.ल. घ.मी म्हणजे १.५० टक्के पाणी साठा आहे. एप्रिल २०१८मध्ये ०.४६७९ द.ल. घ.मी म्हणजे ४.७७ टक्के पाणी साठा होता.तरंदळे धरणामध्ये ऑक्टोबर २०१८ मध्ये ९८.९२ टक्के पाणीसाठा असून गतवर्षी ऑक्टोबर मध्ये तो ९९.८२ टक्के होता. एप्रिल २०१९ अखेर २.५३७० द.ल. घ.मी म्हणजे ५५.६६ टक्के पाणी साठा आहे. एप्रिल २०१८मध्ये २.४४९० द.ल. घ.मी म्हणजे ५३.७३ टक्के पाणी साठा होता.आडेली तलावामध्ये ऑक्टोबर २०१८ मध्ये ८९.५२ टक्के तर गतवर्षी ऑक्टोबर मध्ये १०० टक्के पाणीसाठा होता. आंबोली तलावामध्ये ऑक्टोबर २०१८ मध्ये ९७.२२ टक्के पाणी साठा असून गतवर्षी ऑक्टोबर मध्ये ही टक्केवारी ९९.१९ टक्के होती.चोरगेवाडी तलावामध्ये ऑक्टोबर २०१८ मध्ये ९७.३१ टक्के पाणीसाठा असून गतवर्षी ऑक्टोबर मध्ये १०० टक्के पाणी साठा होता. हातेरी, माडखोल, निळेली या तलावांमध्ये गतवर्षीप्रमाणे ऑक्टोबर मध्ये १०० टक्के पाणीसाठा होता.ओरोसबुद्रुक तलावात ऑक्टोबर २०१८ मध्ये ६७ .१२ टक्के , सनमटेंब तलावात ९९.१६ टक्के , तळेवाडी डिगस तलावा मध्ये ७४.४०टक्के , दाबाचीवाडी तलावामध्ये ८८.०६ टक्के , पावशी, शिरवल तलावामध्ये ३.०३०० द.ल. घ.मी. म्हणजेच १०० टक्के , कुळास तलावामध्ये ८०.९० टक्के , वाफोली तलावामध्ये ८४.०३ टक्के , कारिवडे तलावात ९६.३९ टक्के , धामापूर तलावात ७३.३७ टक्के , हरकुळ बुद्रुक तलावात ९५.६३ टक्के , ओसरगाव तलावात ६३.७८ टक्के , ओझरम तलावात ८९.४८ टक्के , पोईप तलावात २५.१९ टक्के , शिरगाव तलावात ६७.३२ टक्के , तिथवली तलावात ९४.३७ टक्के , लोरे तलावात ९४.९० टक्के पाणीसाठा होता. आता एप्रिल महिन्यात या पाणी साठ्यात मोठया प्रमाणात कपात झाली आहे.त्यामुळे एकूणच जिल्ह्यातील तलाव आणि धरणातील पाणीसाठ्याची ही सद्यस्थिती पाहता शेती आणि पिण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पाण्याचे चोख नियोजन आता तरी करावे लागणार आहे. अजून संपूर्ण मे महिना शिल्लक असून जून महिन्यात वेळेवर जर पाऊस पडला नाही तर सध्याच्या उष्णतेचे प्रमाण पाहता पाणी टंचाई उग्र रूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी ठोस नोयोजन करणे आवश्यक आहे. तर जनतेने सामाजिक भान राखत पाणी काटकसरीने वापरणे आवश्यक आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईsindhudurgसिंधुदुर्ग