शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

कोकण आयुक्तांकडून नुकसानीचा आढावा, पंचनामे करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 11:21 IST

सावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामीण भागात कोकण आयुक्त शिवाजीराव दौड यांनी स्वत: भातशेतीवर जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून अधिकाऱ्यांना तत्काळ भातशेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.

ठळक मुद्देकोकण आयुक्तांकडून नुकसानीचा आढावा, पंचनामे करण्याचे आदेशसावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्यातील भातशेतीची पाहणी

तळवडे : सावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामीण भागात कोकण आयुक्त शिवाजीराव दौड यांनी स्वत: भातशेतीवर जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून अधिकाऱ्यांना तत्काळ भातशेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. क्यार वादळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या झालेल्या भातशेतीच्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता ते जिल्ह्यात आले होते.तळवडे, तुळस, बांदा परिसर तसेच अनेक ठिकाणी ग्रामीण भागात शेतमळ्यात जाऊन त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला व आपल्या पाठीशी प्रशासन आहे, असे आश्वासन दिले.

यावेळी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, सभापती पंकज पेडणेकर, गटविकास अधिकारी गजानन भोसले, तालुका कृषी अधिकारी आर. टी. चौगुले, प्रशांत चव्हाण, तळवडे सरपंच संदीप आंगचेकर, कृषी सहायक यशवंत गवाणे, ग्रामसेवक एन. ए. राऊळ, तलाठी श्रुती मसुरकर आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्ह्यात नुकसानग्रस्त भातपिकाची पाहणी करण्यासाठी मंत्री, अधिकारीवर्ग, लोकप्रतिनिधी दौरे आखत आहेत. आज गरीब शेतकरीवर्गाची एवढीच मागणी आहे की, जी आम्हांला भातपिकाची नुकसान भरपाई देणार ती वेळेत द्यावी. तुटपुंजी देऊ नका, अशी मागणीही या शेतकरीवर्गातून करण्यात आली.आयुक्तांचा शेतकऱ्यांशी प्रथमच थेट संवादरविवारी प्रथमच कोकण आयुक्तांचा दौरा झाला. यावेळी त्यांनी शेतमळ्यावर जाऊन पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला. कृषी सहाय्यक यांच्याशी त्यांनी बातचीत केली. आज प्रशासकीय अधिकारी शेतमळ्यावर धावून आले आहेत. आज बळीराजा संकटात सापडला असून, त्याला भरपाईची गरज आहे. सरकारने ती लवकरात लवकर द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

टॅग्स :Farmerशेतकरीcommissionerआयुक्तsindhudurgसिंधुदुर्ग