शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची खेळी ओळखा, राष्ट्रवादीतून फुटून गेलेल्या आमदारांना जितेंद्र आव्हाडांचा सल्ला

By अनंत खं.जाधव | Updated: July 11, 2023 14:13 IST

केसरकरांना कात्रजचा रस्ता तरी माहित आहे का?

सावंतवाडी : मंत्रीमंडळ विस्तार होऊन आठवडा उलटला तरी मंत्रीपदे दिली जात नाही. यावरूनच राष्ट्रवादीतून फुटून गेलेल्यांनी भाजपची खेळी ओळखावी असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला. ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आव्हाड यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्या जुन्या टीकेचा संदर्भ घेत पवारांना कात्रजचा घाट दाखवणे म्हणजे फू फू करणे नव्हे असा टोला लगावला.आमदार आव्हाड हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असता सावंतवाडीतील जयप्रकाश चौकात त्याचे राष्ट्रवादीच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी माजी मंत्री प्रविण भोसले, महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर, अफरोज राजगुरू, जावेद शेख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.आव्हाड म्हणाले, सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेवरून भाजप नेच शरद पवार यांचे घर फोडले हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोण सांगत असेल की आपण त्यातले नाही त्याचा खरा चेहरा खोत यांनीच उघड केल्याचे आव्हाड म्हणाले. जे राष्ट्रवादीतून फुटून गेलेत त्यांना अद्याप मंत्रीपदे देण्यात आली नाहीत. विस्तार होऊन आठवडा उलटून गेला त्यामुळे गेलेल्यांनी आतातरी भाजपचा डाव ओळखावा असा सल्लाही आव्हाड यांनी दिला.कात्रजचा रस्ता तरी केसरकरांना माहित आहे का?शरद पवार यांना कात्रजचा घाट दाखवणाऱ्या मंत्री दीपक केसरकर यांना कात्रजचा रस्ता तरी माहित आहे का? असा सवाल करत बंडखोरांना राष्ट्रवादी काँग्रेस आपली ताकद दाखवेल असेही आव्हाड म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड