शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

क्यारचा ६८ हजार १७४ शेतकऱ्यांना फटका, भातपिक क्षेत्राचे पंचनामे अखेर पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 15:10 IST

क्यार वादळाने पडलेल्या पावसामुळे बाधित झालेल्या भातपिक क्षेत्राचे अखेर पंचनामे पूर्ण झाले आहेत. पंचनामे पूर्ण करून त्याचा अंतिम अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ३० हजार १५ हेक्टर ६४ गुंठ्याचे पंचनामे करण्यात आले असून यामुळे ६८ हजार १७४ शेतकरी बाधित झाले आहेत.

ठळक मुद्देक्यारचा ६८ हजार १७४ शेतकऱ्यांना फटका, भातपिक क्षेत्राचे पंचनामे अखेर पूर्णअंतिम अहवाल शासनाकडे पाठविला; जिल्ह्यातील नुकसानीचा आकडा मात्र घटला

सिंधुदुर्गनगरी : क्यार वादळाने पडलेल्या पावसामुळे बाधित झालेल्या भातपिक क्षेत्राचे अखेर पंचनामे पूर्ण झाले आहेत. पंचनामे पूर्ण करून त्याचा अंतिम अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ३० हजार १५ हेक्टर ६४ गुंठ्याचे पंचनामे करण्यात आले असून यामुळे ६८ हजार १७४ शेतकरी बाधित झाले आहेत.

भातशेती नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असेल तरी ६ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण झालेल्या क्षेत्राचे नुकसान १३८ कोटींच्यावर गेले होते. मात्र, आता बाधित क्षेत्र वाढलेली असताना नुकसानीचा आकडा मात्र घटला आहे. हा आकडा १२४ कोटी ७८ लाख ६८ हजार रूपयांवर आला आहे.क्यार वादळामुळे कोसळलेल्या पावसाने जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या भातपिकाचे पूर्णत: नुकसान झाले होते. त्यामुळे येथील भातशेतीचे तत्काळ पंचनामे करावेत. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसानी शेतकऱ्यांना द्यावी.

भातशेतीसाठी शेतकऱ्यांनी २०१९-२० मध्ये घेतलेले ८० कोटींचे कर्ज माफ करावे, अशी मागणी जिल्ह्यातील राजकीय व्यक्ती, शेतकरी व सामाजिक संस्था यांनी उचलून धरली होती. त्यानंतर राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षण मंत्री आशीष शेलार यांना पाहणीसाठी पाठविले होते. शिवसेना पक्षाचे युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनीही जिल्ह्यात येत नुकसानीची पाहणी केली.यावेळी दोघांनीही शेतकऱ्यांना सर्व नुकसानी मिळेल, असा विश्वास दिला होता. त्यादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात हंगामी शेती नुकसानीसाठी १० हजार कोटींची रक्कम जाहीर करीत ६ नोव्हेंबरपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. सिंधुदुर्गात मात्र पंचनामे करणारी यंत्रणा तोकडी असल्याने ७ नोव्हेंबर ही तारीख पंचनामे पूर्ण करण्यास उजाडली.उभ्या भातपिकाचे सर्वाधिक नुकसानजिल्ह्यात २०१९-२० या हंगामी कालावधीत भातशेतीखाली ५७ हजार ३२३ हेक्टर क्षेत्र आले होते. आॅक्टोबरात लागलेल्या पावसाने यातील २९ हजार ६८७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून ६२ हजार १२५ शेतकरी बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल राज्य शासनाला कृषी अधीक्षक कार्यालयाने पाठविला होता. यातील ७ नोव्हेंबरपर्यंत ३० हजार १५ हेक्टर ६४ गुंठे क्षेत्राचे पंचनामे पूर्ण केले आहेत. यात ६८ हजार १७४ शेतकरी बाधित झाले आहेत.

या पंचनाम्यामध्ये काढणी पश्चात भातपिकाचे ५ हजार ६ हेक्टर ७३ गुंठे क्षेत्राचे नुकसान झाले आहे. १४ हजार ७०५ शेतकरी बाधित झाले आहेत. मात्र, उभ्या पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. २५ हजार ८ हेक्टर ९८ गुंठे क्षेत्राचे हे नुकसान असून तब्बल ५३ हजार ४६९ शेतकरी बाधित झाले आहेत.

टॅग्स :cycloneचक्रीवादळsindhudurgसिंधुदुर्ग