शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

कणकवलीतील गुन्हा मालवण पोलिसांकडे वर्ग का?, कन्हैया पारकर यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 14:55 IST

कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की, शिवीगाळ करीत कर्तव्य बजावण्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कणकवली पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्याचा पुढील तपास मालवण पोलिसांकडे का वर्ग करण्यात आला आहे? या प्रकरणातील कलमे शिथिल करण्याचा तर हा प्रकार नाही ना? असे सवाल उपस्थित करीत जिल्हा पोलिसांनी आपल्या वरिष्ठांना वस्तुस्थिती समजावून सांगत दाखल झालेल्या तक्रारीप्रमाणे तपास करून आपली विश्वासार्हता टिकवावी, असे आवाहन कणकवलीचे माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी केले आहे. ​

ठळक मुद्देकणकवलीतील गुन्हा मालवण पोलिसांकडे वर्ग का?, कन्हैया पारकर यांचा सवालपोलीस योद्ध्यावर हल्ला प्रकरण, कर्तव्यदक्ष पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होण्याची भीती

कणकवली : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की, शिवीगाळ करीत कर्तव्य बजावण्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कणकवली पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्याचा पुढील तपास मालवण पोलिसांकडे का वर्ग करण्यात आला आहे? या प्रकरणातील कलमे शिथिल करण्याचा तर हा प्रकार नाही ना? असे सवाल उपस्थित करीत जिल्हा पोलिसांनी आपल्या वरिष्ठांना वस्तुस्थिती समजावून सांगत दाखल झालेल्या तक्रारीप्रमाणे तपास करून आपली विश्वासार्हता टिकवावी, असे आवाहन कणकवलीचे माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी केले आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कणकवली पोलीस ठाण्यात १७ एप्रिल २०२० रोजी पोलीस कर्मचारी आशिष जामदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित जावेद शेखसह कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक अबिद नाईक व संदीप नलावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर २७ एप्रिल रोजी जावेद शेख याला अटक झाली होती. आता या प्रकरणाचा पुढील तपास हा मालवण पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याचे समजते.कोरोनाच्या संकटकाळात कर्तव्यावर असलेल्या पोलीस योद्ध्यावर हा हल्ला झाला होता. त्यातील संशयित हे राजकीय व्यक्ती आहेत. हा गुन्हा कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. संशयित सापडत नसल्याने कणकवली नगराध्यक्षांचे वाहन पोलिसांनी जप्त केले होते. मात्र, गेल्या महिनाभरापासून पोलिसांना संशयित सापडलेले नाहीत. याप्रकरणाची ही पार्श्वभूमी पाहता, अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.मुळात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असताना तो मालवण पोलिसांकडे का वर्ग करण्यात आला? अशी कोणती अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाली? ३५३ सारखा गुन्हा दाखल झालेला असताना आरोपी सापडत नाहीत, आरोपींची वाहने जप्त होतात, मात्र, ४१ ची नोटीस बजावताच आरोपी हजर कसे होतात? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना हल्ला झाल्याने गुन्ह्याचे गांभीर्य अधिक आहे. या प्रकरणाला कोणतीही राजकीय बाजू नाही. कायद्याची जाण असलेल्या पोलिसानेच तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे एखादे कलम वगळायचे असेल तर तक्रारदार पोलिसाला आपली तक्रार मागे घ्यावी लागणार आहे. तसे झाले तर पोलीस खोट्या तक्रारी करतात, असा संदेश सामान्य जनतेत जाण्याची शक्यता आहे. तसेच तक्रारदार पोलिसाला न्याय मिळाला नाही, तर पोलीस आपल्याच कर्मचाऱ्याला न्याय देऊ शकले नाहीत, तर इतरांचे काय? अशी भावना सामान्य माणसांत निर्माण होणार आहे.याविषयी कोणतीही राजकीय भूमिका नाही : पारकरकोरोनाच्या काळात संपूर्ण राज्यात पोलिसांवर हल्ल्याच्या २५० घटना घडल्या. मात्र, सिंधुदुर्गात ही एकमेव घटना असून तीही कणकवलीतील आणि त्यात नगराध्यक्षांचा सहभाग आहे. त्यामुळे याप्रकरणी पोलीस दलाविषयीच्या विश्वासार्हतेचा आणि प्रतिमेचा प्रश्न आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात ढिलाई दाखविल्यास कर्तव्यदक्ष पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होण्याची भीती आहे. याविषयी माझी कोणतीही राजकीय भूमिका नसून जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत सुरू असलेल्या चर्चांचा कानोसा घेता ही प्रतिक्रिया देत आहे, असेही कन्हैया पारकर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Policeपोलिसsindhudurgसिंधुदुर्ग