शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधु रत्न समृद्धी योजना फसवी, नव्या बाटलीत जुनी दारू : राजन तेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 16:30 IST

Bjp Sindhudurg rajanteli- योजनेचे नाव बदलून सिंधु -रत्न समृद्धी योजना ठेवण्यात आले असून ती फसवी आहे. ही योजना म्हणजे 'नवीन बाटली आणी जुनीच दारू' असल्याची टीका भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली आहे .

ठळक मुद्देसिंधु रत्न समृद्धी योजना फसवी, नव्या बाटलीत जुनी दारू भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची टीका

कणकवली : सिंधू - रत्न समृद्धी योजनेत सिंधुदुर्गातून ७५ कोटींचे सार्वजनिक हिताचे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस सरकारच्या 'चांदा ते बांदा' या योजनेतून सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी १९३ कोटींचा निधी दिला होता . त्यापैकी १०१ कोटी खर्च झाले तर ९२ कोटी रुपयांचा निधी ठाकरे सरकारने मागे घेतला. त्याच योजनेचे नाव बदलून सिंधु -रत्न समृद्धी योजना ठेवण्यात आले असून ती फसवी आहे. ही योजना म्हणजे 'नवीन बाटली आणी जुनीच दारू' असल्याची टीका भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली आहे .कणकवली येथील भाजप कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजन तेली म्हणाले, शेतकरी , मच्छीमार , महिला बचतगट यांना रोजगारातून आर्थिक उन्नती मिळवून देणे हा चांदा ते बांदा योजनेचा गाभा होता . मात्र ,अर्थमंत्री अजित पवार यांनी ती योजना बासनात गुंडाळून सिंधु-रत्न समृद्धी योजना आणली . मात्र, मागील सव्वा वर्षात एकही रुपया खर्च केला नाही . ही योजना म्हणजे नवीन बाटली जुनी दारू असल्याचा टोला तेली यांनी लगावला .पर्यटन वाढीला चालना न देता कोकणच्या विकासाला खीळ घालण्याचे काम ठाकरे सरकार करत आहे . मागील सव्वा वर्षात जिल्ह्याचा आराखडा वाढण्याऐवजी कमी करण्यात आला . सन २०१९-२० मध्ये असलेला २२५कोटींचा आराखडा आता १४३ कोटींवर आणला . त्यातही फक्त ३३ टक्के निधी आला . हा निधी ४७ कोटी १९ लाख रुपये होता . जिल्ह्यात आलेल्या ३३ टक्के निधींपैकी २५ टक्के म्हणजे ११ कोटी ७९ लाख ७५ हजार रुपयांचा निधी कोव्हीडसाठी राखीव ठेवण्यात आला .

शासनाने चांदा ते बांदा योजनेतील शिल्लक अखर्चित निधीही मागे घेतला. कोकणाने शिवसेनेला सत्ता दिली . मात्र, कोकणवरच शिवसेना अन्याय करीत आहे . अनेक सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार अजून झाले नाहीत . कोरोना काळात नियुक्त कंत्राटी डॉक्टरांचे ६ महिने मानधन नाही. पालकमंत्र्यांचा प्रशासनावर अंकुश नाही.जिल्हा परिषदेचा निधी अखर्चित राहण्याला पालकमंत्री उदय सामंत कारणीभूत असल्याची टीका तेली यांनी केली.ते पुढे म्हणाले, सिंधुरत्न समृद्धी योजनेचा फायदा सिंधुदुर्गवासीयांना होणार नाही.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला शासन निधी आणणार कुठून ? जिल्ह्यात आरोग्य विभागाची ५३६ पदे रिक्त आहेत . ती कधी भरणार ? हे शासनाने जाहीर करावे.तसेच एन.आर.एच. एम. मधील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करावे अशी मागणीही तेली यांनी यावेळी केली . 

टॅग्स :Rajan Teliराजन तेली BJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्ग