शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

सिंधु रत्न समृद्धी योजना फसवी, नव्या बाटलीत जुनी दारू : राजन तेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 16:30 IST

Bjp Sindhudurg rajanteli- योजनेचे नाव बदलून सिंधु -रत्न समृद्धी योजना ठेवण्यात आले असून ती फसवी आहे. ही योजना म्हणजे 'नवीन बाटली आणी जुनीच दारू' असल्याची टीका भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली आहे .

ठळक मुद्देसिंधु रत्न समृद्धी योजना फसवी, नव्या बाटलीत जुनी दारू भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची टीका

कणकवली : सिंधू - रत्न समृद्धी योजनेत सिंधुदुर्गातून ७५ कोटींचे सार्वजनिक हिताचे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस सरकारच्या 'चांदा ते बांदा' या योजनेतून सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी १९३ कोटींचा निधी दिला होता . त्यापैकी १०१ कोटी खर्च झाले तर ९२ कोटी रुपयांचा निधी ठाकरे सरकारने मागे घेतला. त्याच योजनेचे नाव बदलून सिंधु -रत्न समृद्धी योजना ठेवण्यात आले असून ती फसवी आहे. ही योजना म्हणजे 'नवीन बाटली आणी जुनीच दारू' असल्याची टीका भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली आहे .कणकवली येथील भाजप कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजन तेली म्हणाले, शेतकरी , मच्छीमार , महिला बचतगट यांना रोजगारातून आर्थिक उन्नती मिळवून देणे हा चांदा ते बांदा योजनेचा गाभा होता . मात्र ,अर्थमंत्री अजित पवार यांनी ती योजना बासनात गुंडाळून सिंधु-रत्न समृद्धी योजना आणली . मात्र, मागील सव्वा वर्षात एकही रुपया खर्च केला नाही . ही योजना म्हणजे नवीन बाटली जुनी दारू असल्याचा टोला तेली यांनी लगावला .पर्यटन वाढीला चालना न देता कोकणच्या विकासाला खीळ घालण्याचे काम ठाकरे सरकार करत आहे . मागील सव्वा वर्षात जिल्ह्याचा आराखडा वाढण्याऐवजी कमी करण्यात आला . सन २०१९-२० मध्ये असलेला २२५कोटींचा आराखडा आता १४३ कोटींवर आणला . त्यातही फक्त ३३ टक्के निधी आला . हा निधी ४७ कोटी १९ लाख रुपये होता . जिल्ह्यात आलेल्या ३३ टक्के निधींपैकी २५ टक्के म्हणजे ११ कोटी ७९ लाख ७५ हजार रुपयांचा निधी कोव्हीडसाठी राखीव ठेवण्यात आला .

शासनाने चांदा ते बांदा योजनेतील शिल्लक अखर्चित निधीही मागे घेतला. कोकणाने शिवसेनेला सत्ता दिली . मात्र, कोकणवरच शिवसेना अन्याय करीत आहे . अनेक सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार अजून झाले नाहीत . कोरोना काळात नियुक्त कंत्राटी डॉक्टरांचे ६ महिने मानधन नाही. पालकमंत्र्यांचा प्रशासनावर अंकुश नाही.जिल्हा परिषदेचा निधी अखर्चित राहण्याला पालकमंत्री उदय सामंत कारणीभूत असल्याची टीका तेली यांनी केली.ते पुढे म्हणाले, सिंधुरत्न समृद्धी योजनेचा फायदा सिंधुदुर्गवासीयांना होणार नाही.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला शासन निधी आणणार कुठून ? जिल्ह्यात आरोग्य विभागाची ५३६ पदे रिक्त आहेत . ती कधी भरणार ? हे शासनाने जाहीर करावे.तसेच एन.आर.एच. एम. मधील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करावे अशी मागणीही तेली यांनी यावेळी केली . 

टॅग्स :Rajan Teliराजन तेली BJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्ग