शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

सिंधु रत्न समृद्धी योजना फसवी, नव्या बाटलीत जुनी दारू : राजन तेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 16:30 IST

Bjp Sindhudurg rajanteli- योजनेचे नाव बदलून सिंधु -रत्न समृद्धी योजना ठेवण्यात आले असून ती फसवी आहे. ही योजना म्हणजे 'नवीन बाटली आणी जुनीच दारू' असल्याची टीका भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली आहे .

ठळक मुद्देसिंधु रत्न समृद्धी योजना फसवी, नव्या बाटलीत जुनी दारू भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची टीका

कणकवली : सिंधू - रत्न समृद्धी योजनेत सिंधुदुर्गातून ७५ कोटींचे सार्वजनिक हिताचे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस सरकारच्या 'चांदा ते बांदा' या योजनेतून सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी १९३ कोटींचा निधी दिला होता . त्यापैकी १०१ कोटी खर्च झाले तर ९२ कोटी रुपयांचा निधी ठाकरे सरकारने मागे घेतला. त्याच योजनेचे नाव बदलून सिंधु -रत्न समृद्धी योजना ठेवण्यात आले असून ती फसवी आहे. ही योजना म्हणजे 'नवीन बाटली आणी जुनीच दारू' असल्याची टीका भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली आहे .कणकवली येथील भाजप कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजन तेली म्हणाले, शेतकरी , मच्छीमार , महिला बचतगट यांना रोजगारातून आर्थिक उन्नती मिळवून देणे हा चांदा ते बांदा योजनेचा गाभा होता . मात्र ,अर्थमंत्री अजित पवार यांनी ती योजना बासनात गुंडाळून सिंधु-रत्न समृद्धी योजना आणली . मात्र, मागील सव्वा वर्षात एकही रुपया खर्च केला नाही . ही योजना म्हणजे नवीन बाटली जुनी दारू असल्याचा टोला तेली यांनी लगावला .पर्यटन वाढीला चालना न देता कोकणच्या विकासाला खीळ घालण्याचे काम ठाकरे सरकार करत आहे . मागील सव्वा वर्षात जिल्ह्याचा आराखडा वाढण्याऐवजी कमी करण्यात आला . सन २०१९-२० मध्ये असलेला २२५कोटींचा आराखडा आता १४३ कोटींवर आणला . त्यातही फक्त ३३ टक्के निधी आला . हा निधी ४७ कोटी १९ लाख रुपये होता . जिल्ह्यात आलेल्या ३३ टक्के निधींपैकी २५ टक्के म्हणजे ११ कोटी ७९ लाख ७५ हजार रुपयांचा निधी कोव्हीडसाठी राखीव ठेवण्यात आला .

शासनाने चांदा ते बांदा योजनेतील शिल्लक अखर्चित निधीही मागे घेतला. कोकणाने शिवसेनेला सत्ता दिली . मात्र, कोकणवरच शिवसेना अन्याय करीत आहे . अनेक सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार अजून झाले नाहीत . कोरोना काळात नियुक्त कंत्राटी डॉक्टरांचे ६ महिने मानधन नाही. पालकमंत्र्यांचा प्रशासनावर अंकुश नाही.जिल्हा परिषदेचा निधी अखर्चित राहण्याला पालकमंत्री उदय सामंत कारणीभूत असल्याची टीका तेली यांनी केली.ते पुढे म्हणाले, सिंधुरत्न समृद्धी योजनेचा फायदा सिंधुदुर्गवासीयांना होणार नाही.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला शासन निधी आणणार कुठून ? जिल्ह्यात आरोग्य विभागाची ५३६ पदे रिक्त आहेत . ती कधी भरणार ? हे शासनाने जाहीर करावे.तसेच एन.आर.एच. एम. मधील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करावे अशी मागणीही तेली यांनी यावेळी केली . 

टॅग्स :Rajan Teliराजन तेली BJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्ग