शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंध-अपंगाच्या संख्येत वाढ, औषध कंपन्यांसह डॉक्टर जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 17:45 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलिओ व अंध-अंपगांची संख्या कमी होेण्यापेक्षा ती दिवसेंदिवस वाढत असून याला जबाबदार औषध कंपन्या व डॉक्टर असल्याचा गंभीर आरोप महालक्ष्मी अंध- अपंग सामाजिक संघटनेचे अध्यक्ष हरी गावकर यांनी केला आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यात अंध-अपंगाच्या संख्येत वाढऔषध कंपन्यांसह डॉक्टर जबाबदार अंध-अपंग संघटनेचा आरोप२८ मार्चला प्रांत कार्यालयावर आक्रोश मोर्चा

सावंतवाडी : जिल्ह्यात पोलिओ व अंध-अंपगांची संख्या कमी होेण्यापेक्षा ती दिवसेंदिवस वाढत असून याला जबाबदार औषध कंपन्या व डॉक्टर असल्याचा गंभीर आरोप महालक्ष्मी अंध- अपंग सामाजिक संघटनेचे अध्यक्ष हरी गावकर यांनी केला आहे.

अंध-अपंग बांधवाच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनीे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अंध-अपंग बांधवांच्यावतीने २८ मार्च रोजी येथील प्रांताधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढणार असल्याचेही जाहीर केले.गावकर म्हणाले, अंध बांधवांना आपल्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी भांडावे लागत आहे. अंधबांधवांचे हक्क डावलण्यात येत असून आमच्यावर अन्याय होत आहे.  स्थानिक स्वराज्य संस्थांमधून देण्यात येणाऱ्या तीन टक्के अपंग निधीतही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात येत असून प्रत्यक्षात आम्हाला दीड टक्का निधीच वाटप करण्यात येत आहे. उर्वरित दीड टक्का निधी संगनमताने लाटला जातो.जिल्ह्यात तीन टक्के राखीव जागांवर आज अधिकाऱ्यांची मुले भरती करण्यात आली आहेत. तसेच यातून अपंगांना डावलण्यात आले आहे ही वस्तूस्थिती आहे. त्याचा शासन स्तरावरून शोध घेण्यात यावा. डॉक्टर व औषध कंपन्यांच्या साटेलोट्यामुळे अंपगत्वात वाढ होत आहे.

डॉक्टरांकडून रूग्णांना देण्यात येणारी औषधे चांगल्या दर्जाची दिली जात नसल्याने मूकबधीर, मतिमंदत्व अशा प्रकारच्या रोगांना प्रोत्साहन मिळत आहे. यांच्यावर अन्न व औषध प्रशासनाने वेळीच लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. आज रस्त्याचा कामात होणाऱ्या भ्रष्टाचारामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे.रस्त्याच्या साईटपट्ट्या, कच्चे गटार, दिशादर्शक फलक, डांबराचे अल्प प्रमाण व अंदाजपत्रकानुसार न करण्यात येणारी कामे यामुळे रस्ता काही काळातच खराब, होऊन रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे अपघात होऊन अपंगत्वाचे प्रमाण वाढलेले दिसत आहे.या सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी २८ मार्चला प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणाार आहे. या मोर्चासाठी आमदार बच्चू कडू यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे, असे संघटेनेचे सल्लागार सुनील पेडणेकर यांनी सांगितले.यावेळी संघटनेचे सल्लागार सुनील पेडणेकर, आत्माराम परब, विठ्ठल शिरोडकर, उमेश कोरगावकर, सत्यवान वारंग, राधाबाई नाईक आदी उपस्थित होते.स्वतंत्र रेशन कार्ड द्या!अपंगांच्या समस्यांवर आमदार, खासदार यांचे कोणाचेही लक्ष नाही. त्यामुळे आम्हा अंपगांवर उपासमारीची वेळ आली आहे. दिवसेंदिवस वाढणारी महागाई व महागड्या सेवा सवलती यामुळे मोठा फटका अपंगांना सोसावा लागत आहे. त्यामुळे शासनाने अपंगांना स्वतंत्र रेशन कार्ड द्यावे, अशी मागणी यावेळी अंध-अंपग बांधवांनी बोलून दाखविली.अपंग निधीत वाढ कराशासनाकडून राज्यातील अपंगाना देण्यात येणारा संजय गांधी अपंग निधी हा ६०० रूपये एवढा तुटपुंजा देण्यात येतो. त्यात वाढ करून तो गोवा, कर्नाटक, राज्याच्या धर्तीवर २ हजार रूपये एवढा देण्यात यावा, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली.महालक्ष्मी अंध-अंपग सामाजिक संघटनेच्या अंध बांधवांनी एकत्र येत अपंगाच्या समस्या मांडल्या.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गHealthआरोग्य