शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

'इकोसेन्सिटिव्ह'ला विरोध कराल तर स्वतःचे अस्तित्व गमावून बसाल, पर्यावरणप्रेमी रमेश गांवसांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 14:26 IST

आज झोपून राहाल तर कायमचे नष्ट व्हाल

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : केवळ मतदार म्हणून जगू नका. घटनेने दिलेले नागरिकत्वाचे हक्क वापरून स्वतःच्या अस्तित्वासाठी 'इकोसेन्सिटिव्ह'चा लढा द्या. आज झोपून राहाल तर कायमचे नष्ट व्हाल, असा इशारा साखळी (गोवा) येथील ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी रमेश गांवस यांनी दोडामार्ग येथे दिला.केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राच्या अधिसुचनेतुन दोडामार्ग तालुका संपूर्ण वगळला आहे. त्याचा समावेश करावा, या मागणीसाठी 'घुंगुरकाठी सिंधुदुर्ग' संस्थेने 'वनश्री फाउंडेशन' आणि पर्यावरणप्रेमींच्यावतीने सहकार्याने दोडामार्ग बाजारपेठेत जनजागृती आणि स्वाक्षरी मोहिम राबवली. यावेळी गांवस बोलत होते.यावेळी 'घुंगुरकाठी'चे अध्यक्ष सतीश लळीत, उपाध्यक्षा डॉ. सई लळीत, 'वनश्री'चे अध्यक्ष संजय सावंत, ॲड. सोनु गवस, ॲड. निलांगी रांगणेकर सावंत, ॲड. उमा सावंत, ॲड. प्रवीण नाईक, उदय पास्ते, सतीश गवस, चंद्रशेखर सावंत, संदेश देसाई, दीपक गवस, नंदकुमार गावडे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.गोव्यातील लोहखनिज खाणींमुळे झालेल्या पर्यावरण विध्वंसाविरोधात यशस्वी लढा दिलेले गांवस पुढे म्हणाले की, खाणींमुळे होणारे भयानक दुष्परिणाम गोमंतकीय जनता भोगते आहे. खाणींचा फायदा फक्त मुठभर धनिकांना होतो. यात गोव्यातील अनेक राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. न्यायालयीन लढ्यामुळे गोव्यातील खाणी बंद झाल्या. यामुळे खाणमालकांची वक्रदृष्टी आता निसर्गसंपन्न सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे आणि त्यातही दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्यांकडे वळली आहे.कळणे खाण, सह्याद्रीमध्ये प्रचंड वृक्षतोड करुन होणारी रबरसारखी एकसुरी लागवड यामुळे आधीच या भागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. खाणमालकांना मोकळे रान मिळावे, यासाठी केंद्राने आता पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राच्या अधिसुचनेतुन दोडामार्ग तालुका वगळला आहे. हे षडयंत्र वेळीच लक्षात घ्या.केवळ पाच वर्षांनी एकदा मतदान करणारे मतदार एवढ्या भुमिकेत राहू नका. राज्यघटनेने दिलेले अधिकार बजावणारे दक्ष नागरिक व्हा, असे सांगुन गांवस म्हणाले की, दोडामार्ग तालुक्याचा समावेश पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात होण्यासाठी 'घुंगुरकाठी' संस्थेने उचललेले पाऊल महत्वाचे आहे. या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास या जैवविविधतासंपन्न भागातील निसर्ग, वन्यजीवनच नव्हे तर मानवी जनजीवनही उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे या चुकीच्या अधिसुचनेविरुद्ध मोठ्या प्रमाणात आवाज उठवा. उशीर केलात तर तुमचे अस्तित्व संपून जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण विभागाने ६ जुलै रोजी जाहीर केलेल्या पश्चिम घाटातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र अधिसुचनेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात जैवविविधतासंपन्न अशा दोडामार्ग तालुक्याचा समावेश केलेला नाही. यामुळे दोडामार्ग तालुक्यावर लोहखनिजासह अन्य खाणींचे काळेकुट्ट संकट उभे ठाकले आहे. याबाबत अभ्यासक, विषयतज्ज्ञ व पर्यावरणप्रेमींनी आपली मते, आक्षेप व सूचना पत्राद्वारे, केंद्रीय वन, पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड, नवी दिल्ली ११०००३ या पत्त्यावर किंवा esz-mef@nic.in या ई-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. 'वनश्री'चे अध्यक्ष संजय सावंत यांनी दोडामार्ग, तिलारी परिसराचे नैसर्गिक महत्व विशद केले.यावेळी ॲड. सोनु गवस, ॲड. निलांगी रांगणेकर सावंत, ॲड. उमा सावंत, ॲड. प्रवीण नाईक, दीपक गवस, समीर शेट्ये यांची भाषणे झाली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उदय पास्ते, सतीश गवस, चंद्रशेखर सावंत, संदेश देसाई, नंदकुमार गावडे नंदकिशोर गवस, संदीप घाडी, धीरेंद्र घाडी, संगम घाडी यांनी विशेष परिश्रम घेतले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गenvironmentपर्यावरण