शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
3
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
4
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
5
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
6
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
7
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
8
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
9
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
10
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
11
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
12
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
13
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
14
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
15
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
16
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
17
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
18
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
19
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
20
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर

'इकोसेन्सिटिव्ह'ला विरोध कराल तर स्वतःचे अस्तित्व गमावून बसाल, पर्यावरणप्रेमी रमेश गांवसांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 14:26 IST

आज झोपून राहाल तर कायमचे नष्ट व्हाल

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : केवळ मतदार म्हणून जगू नका. घटनेने दिलेले नागरिकत्वाचे हक्क वापरून स्वतःच्या अस्तित्वासाठी 'इकोसेन्सिटिव्ह'चा लढा द्या. आज झोपून राहाल तर कायमचे नष्ट व्हाल, असा इशारा साखळी (गोवा) येथील ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी रमेश गांवस यांनी दोडामार्ग येथे दिला.केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राच्या अधिसुचनेतुन दोडामार्ग तालुका संपूर्ण वगळला आहे. त्याचा समावेश करावा, या मागणीसाठी 'घुंगुरकाठी सिंधुदुर्ग' संस्थेने 'वनश्री फाउंडेशन' आणि पर्यावरणप्रेमींच्यावतीने सहकार्याने दोडामार्ग बाजारपेठेत जनजागृती आणि स्वाक्षरी मोहिम राबवली. यावेळी गांवस बोलत होते.यावेळी 'घुंगुरकाठी'चे अध्यक्ष सतीश लळीत, उपाध्यक्षा डॉ. सई लळीत, 'वनश्री'चे अध्यक्ष संजय सावंत, ॲड. सोनु गवस, ॲड. निलांगी रांगणेकर सावंत, ॲड. उमा सावंत, ॲड. प्रवीण नाईक, उदय पास्ते, सतीश गवस, चंद्रशेखर सावंत, संदेश देसाई, दीपक गवस, नंदकुमार गावडे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.गोव्यातील लोहखनिज खाणींमुळे झालेल्या पर्यावरण विध्वंसाविरोधात यशस्वी लढा दिलेले गांवस पुढे म्हणाले की, खाणींमुळे होणारे भयानक दुष्परिणाम गोमंतकीय जनता भोगते आहे. खाणींचा फायदा फक्त मुठभर धनिकांना होतो. यात गोव्यातील अनेक राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. न्यायालयीन लढ्यामुळे गोव्यातील खाणी बंद झाल्या. यामुळे खाणमालकांची वक्रदृष्टी आता निसर्गसंपन्न सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे आणि त्यातही दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्यांकडे वळली आहे.कळणे खाण, सह्याद्रीमध्ये प्रचंड वृक्षतोड करुन होणारी रबरसारखी एकसुरी लागवड यामुळे आधीच या भागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. खाणमालकांना मोकळे रान मिळावे, यासाठी केंद्राने आता पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राच्या अधिसुचनेतुन दोडामार्ग तालुका वगळला आहे. हे षडयंत्र वेळीच लक्षात घ्या.केवळ पाच वर्षांनी एकदा मतदान करणारे मतदार एवढ्या भुमिकेत राहू नका. राज्यघटनेने दिलेले अधिकार बजावणारे दक्ष नागरिक व्हा, असे सांगुन गांवस म्हणाले की, दोडामार्ग तालुक्याचा समावेश पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात होण्यासाठी 'घुंगुरकाठी' संस्थेने उचललेले पाऊल महत्वाचे आहे. या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास या जैवविविधतासंपन्न भागातील निसर्ग, वन्यजीवनच नव्हे तर मानवी जनजीवनही उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे या चुकीच्या अधिसुचनेविरुद्ध मोठ्या प्रमाणात आवाज उठवा. उशीर केलात तर तुमचे अस्तित्व संपून जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण विभागाने ६ जुलै रोजी जाहीर केलेल्या पश्चिम घाटातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र अधिसुचनेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात जैवविविधतासंपन्न अशा दोडामार्ग तालुक्याचा समावेश केलेला नाही. यामुळे दोडामार्ग तालुक्यावर लोहखनिजासह अन्य खाणींचे काळेकुट्ट संकट उभे ठाकले आहे. याबाबत अभ्यासक, विषयतज्ज्ञ व पर्यावरणप्रेमींनी आपली मते, आक्षेप व सूचना पत्राद्वारे, केंद्रीय वन, पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड, नवी दिल्ली ११०००३ या पत्त्यावर किंवा esz-mef@nic.in या ई-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. 'वनश्री'चे अध्यक्ष संजय सावंत यांनी दोडामार्ग, तिलारी परिसराचे नैसर्गिक महत्व विशद केले.यावेळी ॲड. सोनु गवस, ॲड. निलांगी रांगणेकर सावंत, ॲड. उमा सावंत, ॲड. प्रवीण नाईक, दीपक गवस, समीर शेट्ये यांची भाषणे झाली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उदय पास्ते, सतीश गवस, चंद्रशेखर सावंत, संदेश देसाई, नंदकुमार गावडे नंदकिशोर गवस, संदीप घाडी, धीरेंद्र घाडी, संगम घाडी यांनी विशेष परिश्रम घेतले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गenvironmentपर्यावरण