शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

जिल्ह्यातील महसूल विभागासाठी आदर्शवत ठरावे : दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 14:06 IST

सावंतवाडी तहसिदार कार्यालयाची सुंदर वास्तू उभारली आहे. या इमारतीच्या फर्निचरचे काम अजून बाकी आहे. लवकरच ही सर्व कामे पूर्ण होतील व जिल्ह्यातील सर्वात सुंदर असे तहसिदार कार्यालय निर्माण होईल व जिल्ह्यातील महसूल विभागासाठी ही इमारत आदर्शवत अशी ठरेल असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केरसकर यांनी सावंतवाडी येथे तहसिलदार कार्यालयाच्या नुतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमावेळी केले.

ठळक मुद्देजिल्ह्यातील महसूल विभागासाठी आदर्शवत ठरावे : दीपक केसरकरसावंतवाडी तालुका तहसिलदार कार्यालय सुंदर वास्तू

सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी तहसिदार कार्यालयाची सुंदर वास्तू उभारली आहे. या इमारतीच्या फर्निचरचे काम अजून बाकी आहे. लवकरच ही सर्व कामे पूर्ण होतील व जिल्ह्यातील सर्वात सुंदर असे तहसिदार कार्यालय निर्माण होईल व जिल्ह्यातील महसूल विभागासाठी ही इमारत आदर्शवत अशी ठरेल असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केरसकर यांनी सावंतवाडी येथे तहसिलदार कार्यालयाच्या नुतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमावेळी केले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, माजी आमदार राजन तेली, सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पल्लवी राऊळ, सावंतवाडीचे राजे खेमराज सावंत, युवराज लखम राजे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रेश्मा सावंत, जिल्हा परिषद सदस्य शितल राऊळ, मायकल डिसोझा, राजन मुळीक, रोहिणी गावडे, पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर, उपसभापती नेमळेकर, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसिलदार राजाराम म्हात्रे, उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई, सुरेश गवस, ठेकेदार सुनिल केळूसकर, प्रसाद नार्वेकर आदींसह सावंतवाडी वासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यातजिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे सांगून पालकमंत्री केसरकर पुढे म्हणाले की, सर्व शासकीय इमारती या सुसज्ज व सुंदर होत आहेत. या वास्तूंच्या रुपातून नागरिकांनाही चांगल्या सुविधा मिळाव्यात. सध्या सावंतवाडीमध्ये वनसदृष्य जमिनीचा प्रश्न मोठा आहे. यावरही लवकरच तोडगा काढण्यात येईल. सध्या शिरशिंगेच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला आहे.

लवकरच कोलगावच्या रस्त्याच्या प्रश्नही सुटेल असा विश्वास व्यक्त करुन केसरकर म्हणाले की, सावंतवाडी येथे महसूलच नाही तर इतर सर्व कार्यालये एकत्र आणण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात यावे. एकाच ठिकाणी सर्व कार्यालये असल्यास नागरिकांना सोयीचे होईल व चांगल्या सुविधा पुरवता येतील. जिल्हा सुंदर बवनव्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. सावंतवाडी तालुक्यतील पाणी पुरवठा योजनांसाठी साडे पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे येत्या काळात तालुक्यामध्ये कोठेही पाण्याची समस्या निर्माण होणार नसल्याचेही पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले.

टॅग्स :TahasildarतहसीलदारDeepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग