शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जोरदार पावसाने वैभववाडीत तारांबळ; आंबा, काजूचे नुकसान, बागायतदारांकडून नुकसानभरपाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 17:02 IST

विम्यासह शासनाने नुकसानभरपाई द्यावी

वैभववाडी : वैभववाडी तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे आठवडा बाजारातील फिरत्या विक्रेत्यांची तारांबळ उडाली. दरम्यान, सलग पडणाऱ्या पावसामुळे आंबा, काजू पिकांचे मोठे नुकसान होणार आहे.वैभववाडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये मंगळवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटांसह पावसाच्या सरी कोसळल्या. दरम्यान, बुधवारी सकाळपासूनच तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे प्रचंड उकाडा वाढला होता.दुपारी तीन वाजल्यापासून पावसाचे वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली. तालुक्यातील सर्वच गावांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळण्यास सुरुवात झाली. दरम्यान, अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांची तारांबळ उडाली. वैभववाडीचा आठवडा बाजार असल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी रस्त्याकडेला आपली दुकाने थाटली होती.पावसाची रिपरिप सुरू होताच आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांची धावपळ झाली. अनेक व्यापाऱ्यांचा माल पावसात भिजून नुकसान झाले. शहरात अर्धा तास पाऊस सुरू होता. आंबा, काजू हंगाम बहरात असताना पाऊस झाल्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे. पावसामुळे या दोन्ही पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

रात्री पुन्हा पाऊस कोसळलाबुधवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाल्यानंतर विजांचा कडकडाट झाला. त्यानंतर पुन्हा रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. जवळपास वीस मिनिटे मोठ्या सरी कोसळल्यामुळे उशिरापर्यंत वीजही गायब झाली होती.

विम्यासह शासनाने नुकसानभरपाई द्यावीवळवाच्या पावसामुळे वैभववाडी तालुक्यातील आंबा पीक पूर्ण धोक्यात आले आहे. तर काजू पिकाचेही मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे बागायतदार चिंताग्रस्त असून, प्रशासनाने तातडीने पंचनामे करून बागायतदारांना फळपीक विमा तसेच शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गvaibhavwadiवैभववाडीRainपाऊसFarmerशेतकरी