शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

जोरदार पावसाने वैभववाडीत तारांबळ; आंबा, काजूचे नुकसान, बागायतदारांकडून नुकसानभरपाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 17:02 IST

विम्यासह शासनाने नुकसानभरपाई द्यावी

वैभववाडी : वैभववाडी तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे आठवडा बाजारातील फिरत्या विक्रेत्यांची तारांबळ उडाली. दरम्यान, सलग पडणाऱ्या पावसामुळे आंबा, काजू पिकांचे मोठे नुकसान होणार आहे.वैभववाडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये मंगळवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटांसह पावसाच्या सरी कोसळल्या. दरम्यान, बुधवारी सकाळपासूनच तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे प्रचंड उकाडा वाढला होता.दुपारी तीन वाजल्यापासून पावसाचे वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली. तालुक्यातील सर्वच गावांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळण्यास सुरुवात झाली. दरम्यान, अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांची तारांबळ उडाली. वैभववाडीचा आठवडा बाजार असल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी रस्त्याकडेला आपली दुकाने थाटली होती.पावसाची रिपरिप सुरू होताच आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांची धावपळ झाली. अनेक व्यापाऱ्यांचा माल पावसात भिजून नुकसान झाले. शहरात अर्धा तास पाऊस सुरू होता. आंबा, काजू हंगाम बहरात असताना पाऊस झाल्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे. पावसामुळे या दोन्ही पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

रात्री पुन्हा पाऊस कोसळलाबुधवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाल्यानंतर विजांचा कडकडाट झाला. त्यानंतर पुन्हा रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. जवळपास वीस मिनिटे मोठ्या सरी कोसळल्यामुळे उशिरापर्यंत वीजही गायब झाली होती.

विम्यासह शासनाने नुकसानभरपाई द्यावीवळवाच्या पावसामुळे वैभववाडी तालुक्यातील आंबा पीक पूर्ण धोक्यात आले आहे. तर काजू पिकाचेही मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे बागायतदार चिंताग्रस्त असून, प्रशासनाने तातडीने पंचनामे करून बागायतदारांना फळपीक विमा तसेच शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गvaibhavwadiवैभववाडीRainपाऊसFarmerशेतकरी