शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायावळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
2
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
3
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
4
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
5
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
6
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
7
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
8
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
9
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
10
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
11
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
12
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
13
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
14
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
15
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
16
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
17
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
18
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
19
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
20
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?

जोरदार पावसाने वैभववाडीत तारांबळ; आंबा, काजूचे नुकसान, बागायतदारांकडून नुकसानभरपाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 17:02 IST

विम्यासह शासनाने नुकसानभरपाई द्यावी

वैभववाडी : वैभववाडी तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे आठवडा बाजारातील फिरत्या विक्रेत्यांची तारांबळ उडाली. दरम्यान, सलग पडणाऱ्या पावसामुळे आंबा, काजू पिकांचे मोठे नुकसान होणार आहे.वैभववाडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये मंगळवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटांसह पावसाच्या सरी कोसळल्या. दरम्यान, बुधवारी सकाळपासूनच तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे प्रचंड उकाडा वाढला होता.दुपारी तीन वाजल्यापासून पावसाचे वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली. तालुक्यातील सर्वच गावांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळण्यास सुरुवात झाली. दरम्यान, अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांची तारांबळ उडाली. वैभववाडीचा आठवडा बाजार असल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी रस्त्याकडेला आपली दुकाने थाटली होती.पावसाची रिपरिप सुरू होताच आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांची धावपळ झाली. अनेक व्यापाऱ्यांचा माल पावसात भिजून नुकसान झाले. शहरात अर्धा तास पाऊस सुरू होता. आंबा, काजू हंगाम बहरात असताना पाऊस झाल्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे. पावसामुळे या दोन्ही पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

रात्री पुन्हा पाऊस कोसळलाबुधवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाल्यानंतर विजांचा कडकडाट झाला. त्यानंतर पुन्हा रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. जवळपास वीस मिनिटे मोठ्या सरी कोसळल्यामुळे उशिरापर्यंत वीजही गायब झाली होती.

विम्यासह शासनाने नुकसानभरपाई द्यावीवळवाच्या पावसामुळे वैभववाडी तालुक्यातील आंबा पीक पूर्ण धोक्यात आले आहे. तर काजू पिकाचेही मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे बागायतदार चिंताग्रस्त असून, प्रशासनाने तातडीने पंचनामे करून बागायतदारांना फळपीक विमा तसेच शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गvaibhavwadiवैभववाडीRainपाऊसFarmerशेतकरी