शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
4
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
5
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
6
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
7
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
8
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
9
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
10
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
11
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
12
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
13
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
14
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
15
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: वैभववाडी, कणकवलीत मुसळधार पावसाने दाणादाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 16:25 IST

बाजारपेठेत चिखल : खांबाळेत नारळाच्या झाडावर पडली वीज

वैभववाडी : वैभववाडी तालुक्यातील बहुतांश गावांना बुधवारी (दि.१४) मुसळधार पावसाने झोडपून काढले. विजांच्या कडकडाटांसह सुमारे तासभर झालेल्या पावसाने वैभववाडी बाजारपेठेत अक्षरशः दाणादाण उडवून दिली. दरम्यान, खांबाळे येथे घरानजीक असलेल्या नारळाच्या झाडांवर वीज पडली.वैभववाडी तालुक्याच्या विविध भागांत गेल्या गुरुवारपासून जोरदार पाऊस पडत आहे. बुधवारी सकाळपासून काहीसे ढगाळ वातावरण होते, शिवाय प्रचंड उकाडा जाणवत होता. सकाळी अकरानंतर वाहने चालविणे मुश्कील झाले होते. दरम्यान, दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या. या पावसामुळे सर्वांचीच ताराबंळ उडाली. जवळपास तासभर शहरात जोरदार पाऊस सुरू होता.तालुक्यातील वैभववाडी, एडगाव, सोनाळी, कुसूर उंबर्डे, वेंगसर, करुळ, कोकिसरे, खांबाळे, आचिर्णे, नावळे, सडुरे, कुर्ली या गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. खांबाळे येथील स्नेहलता प्रभाकर पवार यांच्या घरानजीक असलेल्या नारळाच्या झाडावर वीज कोसळली. त्यामध्ये नारळाच्या झाडाचे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने इतर कोणतीही हानी झाली नाही.या पावसामुळे वैभववाडी शहरात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले. आज आठवडा बाजारानिमित्त मोठी गर्दी होती. गटारांतील पाणी रस्त्यावर आल्यामुळे नागरिकांचे हाल झाले. रस्त्यानजीक बसलेल्या व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

या भागात केवळ आठ ते दहा दिवसांचा हंगाम राहिला आहे, परंतु आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व मुसळधार पावसामुळे आंबा बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

महामार्गाच्या कामामुळे वैभववाडी चिखलात!ऐन हंगामात वैभववाडी शहरातील संभाजी चौकातून जाणाऱ्या तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम गेल्या आठवड्यात सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी कोकिसरे नारकरवाडीपासून अर्जुन रावराणे विद्यार्थ्यांपर्यंत रस्ता उखडून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ सर्वत्र चिखलच चिखल झाला असून, दुचाकीस्वार घसरून पडत आहेत.

कणकवली शहरात पावसाची हजेरीकणकवली शहरासह तालुक्यात बुधवारी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. वातावरणात  उष्णतेचे प्रमाण वाढलेले असतानाच पाऊस कोसळल्याने वातावरण काहीसे थंडगार झाले होते. मात्र, काही वेळाने पुन्हा वातावरणातील उष्णतेच्या प्रमाणात वाढ झाली. शहरात पावसाने हजेरी लावताच वीज प्रवाह खंडित झाला. पाऊण तासानंतर वीज प्रवाह सुरळीत झाला. त्यामुळे उष्णतेने नागरीक त्रस्त झाले होते. अचानक पावसाने हजेरी लावल्याने शहरातील विक्रेत्यांची धावपळ उडाली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गvaibhavwadiवैभववाडीKankavliकणकवलीRainपाऊस