शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

शेतकरी चिंतेत; सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे भातशेती जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 13:09 IST

गेले दोन-तीन दिवस संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.

सिंधुदुर्ग - गेले दोन-तीन दिवस संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. दरम्यान गुरूवारी रात्रीपासून पावसाचे प्रमाण अधिकचं वाढले आहे. तर शुक्रवारी सकाळपासून पावसाची संततधार कायम राहीली आहे. या पावसाचा भात शेती वर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. भात शेती जमीन-दोस्त होऊन पाण्याखाली गेल्यामुळे भाताला “अंकुर” फुटण्यास सुरुवात झाली आहे. या सर्व परस्थितीत जिल्ह्यात ओला दुष्काळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र विधानसभेच्या धामधुमीत याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे शेतकरी बांधवामधून कमालीची नाराजी व्यक्त होत आहे.

यावर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यामुळे काही ठिकाणी महाप्रलय आला होता यात अनेकांचे संसार शेती पाण्याखाली गेली होती. दरम्यान, नंतर या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर या सगळ्या परिस्थितीतून स्वतः ला सावरत लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. पाऊस कमी झाल्यानंतर सनईच्या हंगामात पुन्हा दमदार पाऊस सुरू झाल्यामुळे हातातोंडाशी आलेली भात शेती पाण्याखाली गेली आहे. तर शेती जमीन दोस्त झाल्यामुळे भात पिकाला अंकुर फुटण्यास सुरुवात झाली आहे पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे मात्र, विधानसभेच्या धामधुमीत या बळीराजाकडे लक्ष देण्यासाठी सरकार कमी पडल्यामुळे शेतकरी बांधवा मधून कमालीची नाराजी व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसFarmerशेतकरी