शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

sindhudurg: कणकवली तालुक्यात पावसाचा जोर कायम!; जानवली, गडनदी पाणी पातळीत वाढ

By सुधीर राणे | Updated: July 22, 2023 13:22 IST

आचरा मार्गावर काही काळ पाणी, केटी बंधारे ओव्हर फ्लो!

कणकवली : कणकवली तालुक्यात काल, शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जानवली व गडनदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे कणकवली ते आचरापर्यंत जाणाऱ्या  मार्गावर वरवडे येथे पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. गडनदीवरील केटीबंधारे पाण्याखाली गेले असून मराठा मंडळ लगत असलेला केटी बंधाऱ्यावरून पाणी गेल्याने या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांना प्रवास करणे कठीण झाले होते. कणकवली तालुक्यात गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे नदी-नाले तंडुब भरले आहेत. शुक्रवारी रात्री पावसाने घाटमाथ्यावर जोरदार हजेरी लावली. परिमाणी जानवली व गडनदीच्या पाण्यात वाढ झाली. जानवली नदीचे पाणी आचरा रस्त्यावर आल्याने हा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे सकाळच्या सत्रात मालवणकडे जाणाऱ्यांचे काहीसे हाल झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिल्यानंतर गुरुवार व शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली होती. मात्र, शनिवारी सकाळीच आचरा मार्गावर पाणी आल्यामुळे यापरिसरात असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जाणे शक्य झाले नाही. नागरिकांनाही मागे फिरावे लागले. गडनदीवरील केटी बंधारे ओव्हर फ्लो झाले आहेत.कणकवली मराठा मंडळ नजीक असलेल्या केटीबंधाऱ्यावरून पाणी वाहू लागले असून पाण्याच्या प्रवाहाने मोठे लाकडाचे ओंडके बंधाऱ्यात अडकून पडले आहेत. पाण्याचा प्रवाहामुळे ते बंधाऱ्याला आदळत असल्याने बंधारा कमकुवत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे ओंडके काढून टाकण्याची मागणी होत आहे. दरम्यान, पाणी आलेल्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी करत ते दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीRainपाऊसriverनदी