शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

शासकीय इमारती झाडीत हरवल्या, सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 5:31 PM

ओरोस ,दि. ९ : सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या आवारातील शासकीय इमारतींवर झाडींचे साम्राज्य पसरले आहे. इमारतींवर कौलारू छप्पर घालण्यात आलेले असून त्याची ठिकठिकाणी मोडतोड झाल्यामुळे छपराला गळती लागली आहे.सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या मुख्य कार्यालयातील स्वच्छतागृहे बंद असून दरवाजा दोऱ्यांनी बांधून ठेवण्यात आले आहेत. इमारतीत पाण्याचे पाईप फुटून पाणी वाया जात आहे. याकडे दुर्लक्ष झाल्याचे ...

ठळक मुद्देछपरांना गळती, जनतेमधून नाराजीचा सूरसिंधुदुर्ग जिल्ह्याची राजधानी समस्याग्रस्तअधिकारी दौरे करण्यात मग्न

ओरोस ,दि. ९ : सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या आवारातील शासकीय इमारतींवर झाडींचे साम्राज्य पसरले आहे. इमारतींवर कौलारू छप्पर घालण्यात आलेले असून त्याची ठिकठिकाणी मोडतोड झाल्यामुळे छपराला गळती लागली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या मुख्य कार्यालयातील स्वच्छतागृहे बंद असून दरवाजा दोऱ्यांनी बांधून ठेवण्यात आले आहेत. इमारतीत पाण्याचे पाईप फुटून पाणी वाया जात आहे. याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र मुख्यालयातील परिसरात दिसत आहे.

दरम्यान, अनेक शासकीय कामांसाठी जिल्ह्यातील लोक येथे येत असतात. मात्र, या ठिकाणची परिस्थिती पाहून जनतेतूनच नाराजीचे सूर उमटत आहेत. शासकीय यंत्रणेची ही बिकट परिस्थिती असेल तर इतर कार्यालयांची काय अवस्था असणार असे सूर उमटत आहेत.

या सर्व समस्यांचा उल्लेख नियोजन समितीच्या बैठकीत केला जातो. मात्र, या इमारतींना २५ वर्षे पूर्ण होत असून इमारतींची डागडुजी कोण करणार? हा प्रश्न आहे. अनेक ठिकाणी झाडींचे साम्राज्य पसरले आहे तर इमारतींच्या आत स्वच्छतागृहे बंद अवस्थेत आहेत.

अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी बांधण्यात आलेल्या शौचालयांमध्ये नळ नाहीत, दरवाजे बंद अवस्थेत आहेत. तर काही ठिकाणी ही शौचालये दोऱ्यांनी बंद करून ठेवलेली पहावयास मिळत आहेत.अधिकारी दौरे करण्यात मग्नयेथील जिल्हा प्रशासकीय अधिकारी व निवासी अधिकारी यांचे लक्ष मात्र आपण काम करीत असलेल्या प्रशासकीय इमारतींकडे नसून बाहेरचा दौरा करण्यात ते मग्न असतात. एखादा अधिकारी इमारतींच्या आवारात महिन्यातून एक दिवस भेट देऊन या सर्व प्रकारांची पहाणी करेल अशी आशा जनता करीत आहे.

जिल्ह्याची राजधानी समस्याग्रस्तप्रशासनाच्या नियोजन समिती सभेत यावर कोणत्याही लोकप्रतिनिधीला आवाज उठविण्याचे धाडस होत नाही. सामान्य जनतेला मात्र याचा त्रास सहन करावा लागत आहे. सायंकाळी सहा वाजल्यानंतर या परिसरातील व मुख्य रस्त्यांवरील पथदीप बंद असतात. रात्रीच्यावेळी कर्मचाऱ्यांना अंधारातून घरी जावे लागते.

कोणत्याही सोयी सुविधा नसल्यामुळे फक्त जिल्ह्याची मुख्य राजधानी म्हणून नावारूपाला आलेली सिंधुदुर्गनगरी असे मोठ्या दिमाखात याठिकाणी ही वास्तू उभी आहे. याकडे पालकमंत्री व लोकप्रतिनिधींनी तरी लक्ष द्यावे अशी शासकीय कामानिमित्त येणाऱ्या  जनतेची मागणी आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcollectorतहसीलदार