शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

रास्त धान्य दुकानावर धान्य मिळणे बंद

By admin | Updated: October 29, 2015 00:12 IST

सर्वसामान्यांना जगणे मुश्कील : कणकवलीतील नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

कणकवली : कणकवली शहरामध्ये गेल्या महिन्यापासून रास्त दराच्या धान्य दुकानांवर धान्य मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना जगणे मुश्कील होऊन बसले आहे. या समस्येची तत्काळ दखल घेऊन आमच्या भावना शासनदरबारी पोहोचवाव्यात. तसेच रास्त दराचा धान्यपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आमच्या हक्कांसाठी तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा एका निवेदनाद्वारे शहरातील नागरिकांनी तहसीलदारांना दिला आहे.येथील तहसील कार्यालयात मंगळवारी नगरसेवक गौतम खुडकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील काही नागरिकांनी नायब तहसीलदार आर. जे. पवार यांना निवेदन सादर केले. यावेळी किशोर चौगुले, बिरबल चौगुले, आकाश सकट, रमेश गायकवाड, विष्णू सकट, बाबी कदम, मनोज खुडकर, संतोष कांबळे, समीर कांबळे, योगिता मेस्त्री, प्रिया मेस्त्री, उत्तम तांबे, विजया जाधव यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते.शासनाकडून सर्वसामान्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी योग्यरीतीने होत नाही. अलीकडे रास्त धान्य दुकानावर धान्यच उपलब्ध होत नाही. त्यामुळे यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे धान्याविना हाल होत आहेत. ऐन सणासुदीच्या काळातदेखील धान्य मिळू शकत नाही. रास्त धान्य दुकानात चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. अनेक गोरगरिबांना अद्याप रेशनकार्ड मिळू शकलेली नाहीत. या समस्यांवर तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असे या निवेदनात म्हटले आहे. (वार्ताहर)