शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

कचरा प्रकल्पातून प्रत्येकावर पाच लाखांचा पडणार बोजा : विनायक राऊत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 10:34 AM

कणकवलीत होणारा ९०० कोटींचा कचरा प्रकल्प हा महाघोटाळा आहे. हा प्रकल्प बंद पडला तर प्रत्येक कणकवलीकराच्या डोक्यावर पाच लाख रुपये कर्जाचा बोजा पडणार आहे, असा आरोप करतानाच या कचरा प्रकल्पाची सखोल चौकशी करावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी येथे दिली.

ठळक मुद्दे कचरा प्रकल्पातून प्रत्येकावर पाच लाखांचा पडणार बोजा : विनायक राऊत शासनाचे अनुदान लाटण्यासाठी, बँक कर्ज बुडविण्यासाठी प्रकल्प

कणकवली : कणकवलीत होणारा ९०० कोटींचा कचरा प्रकल्प हा महाघोटाळा आहे. हा प्रकल्प बंद पडला तर प्रत्येक कणकवलीकराच्या डोक्यावर पाच लाख रुपये कर्जाचा बोजा पडणार आहे, असा आरोप करतानाच या कचरा प्रकल्पाची सखोल चौकशी करावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी येथे दिली.कणकवली शहरात ९०० कोटींचा कचरा प्रकल्प उभारला जात आहे. या कचरा प्रकल्पाबाबत शिवसेना-भाजप महायुतीच्या नेत्यांनी आक्षेप घेत हा प्रकल्प म्हणजे जनतेची फसवणूक असल्याचा आरोप कणकवली येथील विजय भवनमध्ये शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.यावेळी खासदार विनायक राऊत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, भाजप नेते संदेश पारकर आदींनी कचरा प्रकल्पावर टीका केली. यावेळी अतुल रावराणे, नगरसेवक सुशांत नाईक, शैलेश भोगले, हर्षद गावडे, रुपेश नार्वेकर, सुजित जाधव तसेच शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी विनायक राऊत म्हणाले, ए.जी.डॉटर्स या कंपनीने दिल्ली गाझियाबाद तसेच पटना आणि कणकवली येथील नगरपालिकांबरोबर कचरा प्रकल्पाबाबत करार केलेले आहेत. मात्र, हा प्रकल्प केंद्र शासनाची सबसिडी आणि बँकांचे कर्ज लाटण्यासाठी केला जात आहे.कणकवली नगरपंचायतीने केलेल्या करारपत्रात या ९०० कोटींच्या कचरा प्रकल्पासाठी नारायण राणे कुटुंबीयांच्या अखत्यारित असलेल्या विविध आस्थापनांबरोबरच इंजिनिअरिंग कॉलेजमधून २ टन, मातोश्री वृद्धाश्रमातून ३ टन तसेच जिल्हा परिषद १२५ टन, दोडामार्ग नगरपंचायत ३ टन कचरा मिळणार असल्याची आकडेवारी समाविष्ट केलेली आहे. एवढा कचरा त्या ठिकाणाहून कसा मिळू शकेल? हे एक मोठे कोडेच आहे.सत्य डोळ्यासमोर मांडण्याचा प्रयत्नकणकवलीवासीयांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा चढेल. त्यामुळे जनतेला त्रास होईल अशी कोणतीही कृती त्यांच्याकडून होणार नाही यासाठी प्रयत्न करण्यात येतील.  या प्रकल्पाचे सत्य आम्ही जनतेसमोर मांडत आहोत, असेही विनायक राऊत यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVinayak Rautविनायक राऊत