शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

नरडवे धरणग्रस्तांच्या समस्या प्रथम मार्गी लावा: संदेश पारकर यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 3:43 PM

नरडवे धरण प्रकल्पाचे काम सुरू होऊन २० वर्षे झाली . मात्र ,अजूनही अनेक समस्या सुटलेल्या नाहीत. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनापासून ते घराच्या मुल्यांकणापर्यंतचे प्रश्न प्रथम सुटणे आवश्यक आहेत. आधी या समस्या मार्गी लावा, नंतरच धरणाचे काम सुरू करा. अशी आग्रही मागणी प्रकल्पग्रस्तांच्यावतीने जिल्हाधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्याची माहिती कोकण सिंचन पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.

ठळक मुद्देनरडवे धरणग्रस्तांच्या समस्या प्रथम मार्गी लावा: संदेश पारकर यांची मागणी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची घेतली प्रकल्पग्रस्तांसह भेट

कणकवली : नरडवे धरण प्रकल्पाचे काम सुरू होऊन २० वर्षे झाली . मात्र ,अजूनही अनेक समस्या सुटलेल्या नाहीत. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनापासून ते घराच्या मुल्यांकणापर्यंतचे प्रश्न प्रथम सुटणे आवश्यक आहेत. आधी या समस्या मार्गी लावा, नंतरच धरणाचे काम सुरू करा. अशी आग्रही मागणी प्रकल्पग्रस्तांच्यावतीने जिल्हाधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्याची माहिती कोकण सिंचन पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.याबाबत त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, नरडवे प्रकल्पग्रस्तांसोबत जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे व अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांची ओरोस येथे भेट घेऊन समस्यांबाबत बुधवारी चर्चा करण्यात आली. यावेळी प्रभाकर ढवळ, सुरेश ढवळ, जयराम ढवळ, मारूती ढवळ, मधुकर पालव, प्रकाश सावंत, गणेश ढवळ, वैभव नार्वेकर आदी उपस्थित होते.प्रकल्पग्रस्तांचे अनेक मुद्दे आहेत. त्याची सोडवणूक होणे आवश्यक आहे. २० वर्षापासून या प्रकल्पाचे काम सुरू आहे. ३२ कोटिंचा हा प्रकल्प काहि हजार कोटिंवर जाऊन पोहोचला आहे. मात्र, प्रकल्पग्रस्त आजहि वाऱ्यावर आहेत. त्यांना पुनर्वसनासाठी भूखंड देण्यात आलेले नाहित. पुनर्वसन गावठाणे तयार करण्यात आलेली आहेत, तेथे सुविधाही नाहित. प्रकल्पग्रस्ताना पर्यायी जमिनीचे वाटप झालेले नाही . ९६४ घरांचे मुल्यांकन करण्याची कार्यवाहि झालेली नाही.ज्यांना उत्पनाचे कोणतेही साधन नाही. अशा प्रकल्पग्रस्तानी करायचे काय? त्यामुळे या समस्या सर्व प्रथम मार्गी लावा व नंतरच काम सुरू करण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांची आहे. त्यासाठी प्रकल्पग्रस्तानी काम बंद पाडले. मात्र, तरीहि कडक पोलीस बंदोबस्तात बुधवारी काम सुरू करण्यात आले आहे. हे योग्य नव्हे.वास्तविक अगोदर ठरल्यानुसार प्रकल्पग्रस्तांची बैठक घेऊन समस्या मार्गी लावण्याबाबतची कार्यवाहि होणे आवश्यक होते. याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले. दरम्यान , प्रकल्पग्रस्तांच्या समस्या लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे. असेही संदेश पारकर यांनी या म्हटले आहे. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग