शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत तणाव! "फाटाफूट कराल तर स्वतंत्र निवडणूक लढू..."; शिंदेसेनेचा थेट युती तोडण्याचा इशारा?
2
आजचे राशीभविष्य, ५ डिसेंबर २०२५: सरकार विरोधी कामे, राग यापासून दूर राहणे हितावह राहील
3
व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर; ८ दशकांची रशियासोबतची मैत्री होणार दृढ, जगाचे असणार लक्ष
4
"भारत नशीबवान आहे की, त्यांना मोदींसारखा नेता मिळाला"- व्लादिमीर पुतिन
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपा ६५ जागा लढण्यावर ठाम; शिंदेसेनेला १७ जागा देण्याची तयारी
6
सरकार प्रगतिपथावर, खरे उतरतेय अपेक्षांवर; ध्रुव रिसर्च आणि लोकमतच्या सर्वेक्षणात सरकारला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद
7
राज्यातील ८० हजार शाळा आज बंद; शिक्षकांचा एल्गार, वेतन कपातीच्या आदेशानंतरही शिक्षक संघटना ‘बंद’वर ठाम
8
अग्रलेख: नव्वदीचा रुपया काय म्हणतो? सरकारची झोप उडाली नसेल तर ती उडायला हवी
9
विमानसेवेचा बट्ट्याबोळ! ‘इंडिगो’ची देशभरातील ३८० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले
10
विशेष लेख: बदल्याचे नाही, बदलाचे राजकारण अन‌् फडणवीस
11
पिवळा दिवा लावून कार घेतली मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर, सीएम नाहीत सांगून बाहेरूनच यू-टर्न; तीन कोटींचा चुना
12
महापालिका निवडणुकांचा बिगुल डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात! राज्यातील मनपा आयुक्तांनी दर्शविली तयारी
13
संचारसाथी ॲप : पाणी मुरते आहे, ते नेमके कुठे?
14
Anoushka Shankar Sitar Air India:अनुष्का शंकर यांची तुटली सतार; एअर इंडियाविरूद्ध संतापाचे सूर
15
तत्कालीन ठाणे आयुक्तांवर अवमान कारवाईची तलवार; काय म्हणाले न्यायालय, प्रकरण काय?
16
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
17
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
18
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
19
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
20
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
Daily Top 2Weekly Top 5

गडगडीच्या पाण्यासाठी २५पासून उपोषण

By admin | Updated: January 19, 2016 23:41 IST

जाधव यांचा इशारा : तहसील कार्यालयासमोर आंदोलन

देवरुख : गडगडी धरणाचे पाणी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध व्हावे, तसेच देवरूख येथील डॉ. आंबेडकर वसतिगृह शासनाच्या जागेत स्थलांतरीत व्हावे, या दोन प्रमुख मागण्यांसाठी अ. वि जाधव आणि कार्यकर्ते देवरुख तहसील कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला बेमुदत उपोषण छेडणार आहेत.या उपोषणाला सिद्धार्थ कासारे पाठिंबा देणार आहेत. संगमेश्वर तालुक्यातील वाशी-किंजळे येथील गडगडी धरणाला सुमारे ३०पेक्षा अधिक वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. धरणामध्ये कित्येक कोटी रुपयांचा निधी जिरला आहे. मात्र, तीस वर्षांच्या कालावधीनंतरही वाशी, काटवली, देवळे, फणसवळे, शेरेवाडी, सायले, विघ्रवली, मुचरी, कोसुंब आदी गावातील शेतकऱ्यांना धरणाचे पाणी उपलब्ध होऊ शकलेले नाही. कित्येक कोटी रुपये खर्च होऊनही पाणी उपलब्ध होत नाही, या गंभीर समस्येकडे शासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. शासनाच्या अनास्थेमुळे येथील शेतकरी वंचित राहिले आहेत.शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध व्हावे, याकरिता अ. वि. जाधव आणि कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषणाचे अस्त्र हाती घेतले आहे.सुमारे ३० ते ३२ वर्षे गडगडी धरणाचे काम चालू आहे. शासनाचे कोट्यवधी रुपये खर्ची पडलेले आहेत. परंतु शासनकर्त्यांना अजिबात देणे-घेणे नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला साथ देऊन दूध उत्पादन करण्यासाठी या भागात २५० संकरीत गाई खरेदी केल्या जाणार आहेत. काटवली सहकारी दूध संस्था १०० गाई शेतकऱ्यांना खरेदी करण्यासाठी साथ देणार आहे. हिरवा चारा पाण्याशिवाय निर्माण होणार नाही म्हणून या आंदोलनाद्वारे आम्हाला कालव्याद्वारे गडगडी धरणाचे पाणी पाहिजे, असे जाधव यांनी म्हटले आहे.तसेच देवरूख येथे डॉ. आंबेडकर मागासवर्गीय शासकीय विद्यार्थी वसतिगृह गेली अनेक वर्षे भाड्याच्या खासगी जागेत खितपत पडलेले आहे. शासनाने एक कोटी वीस लाख रुपयात जागेसह तयार इमारत खरेदी केली आहे. इमारत अनेक वर्षे बंद असल्याने दुरुस्तीला आली आहे. दुरुस्तीसाठीही निधी मंजूर होता. परंतु तो निधी परत का पाठवण्यात आला, ही बाब ही गंभीर आहे, असेही जाधव यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)गडगडी धरण : शेतकऱ्यांना पाणी द्यासंगमेश्वर तालुक्यात ३० वर्षापासून गडगडी धरणाचे काम सुरू आहे. या धरणासाठी कोटी रूपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. तरीदेखील धरणाचे काम पूर्ण झालेले नाही. या धरणातील पाणी परिसरातील शेतकऱ्यांना मिळावे, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून करण्यात येत आहे. मात्र, या मागणीकडे अद्याप दुर्लक्षच करण्यात आले आहे. ही मागणी शासनस्तरावरून अद्याप पूर्ण झालेली नाही. या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. केवळ आंदोलन करण्यापलिकडे येथील शेतकऱ्यांच्या हाती काहीच राहिलेले नाही. देवरूख तहसील कार्यालयासमोर होणाऱ्या आंदोलनातून ही मागणी पूर्णत्वास जाण्याची आशा आहे.वसतिगृहासाठी लढादेवरुख येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे. तरीदेखील गेली अनेक वर्षे भाड्याच्या जागेत खितपत पडावे लागत आहे.