शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

गडगडीच्या पाण्यासाठी २५पासून उपोषण

By admin | Updated: January 19, 2016 23:41 IST

जाधव यांचा इशारा : तहसील कार्यालयासमोर आंदोलन

देवरुख : गडगडी धरणाचे पाणी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध व्हावे, तसेच देवरूख येथील डॉ. आंबेडकर वसतिगृह शासनाच्या जागेत स्थलांतरीत व्हावे, या दोन प्रमुख मागण्यांसाठी अ. वि जाधव आणि कार्यकर्ते देवरुख तहसील कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला बेमुदत उपोषण छेडणार आहेत.या उपोषणाला सिद्धार्थ कासारे पाठिंबा देणार आहेत. संगमेश्वर तालुक्यातील वाशी-किंजळे येथील गडगडी धरणाला सुमारे ३०पेक्षा अधिक वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. धरणामध्ये कित्येक कोटी रुपयांचा निधी जिरला आहे. मात्र, तीस वर्षांच्या कालावधीनंतरही वाशी, काटवली, देवळे, फणसवळे, शेरेवाडी, सायले, विघ्रवली, मुचरी, कोसुंब आदी गावातील शेतकऱ्यांना धरणाचे पाणी उपलब्ध होऊ शकलेले नाही. कित्येक कोटी रुपये खर्च होऊनही पाणी उपलब्ध होत नाही, या गंभीर समस्येकडे शासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. शासनाच्या अनास्थेमुळे येथील शेतकरी वंचित राहिले आहेत.शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध व्हावे, याकरिता अ. वि. जाधव आणि कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषणाचे अस्त्र हाती घेतले आहे.सुमारे ३० ते ३२ वर्षे गडगडी धरणाचे काम चालू आहे. शासनाचे कोट्यवधी रुपये खर्ची पडलेले आहेत. परंतु शासनकर्त्यांना अजिबात देणे-घेणे नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला साथ देऊन दूध उत्पादन करण्यासाठी या भागात २५० संकरीत गाई खरेदी केल्या जाणार आहेत. काटवली सहकारी दूध संस्था १०० गाई शेतकऱ्यांना खरेदी करण्यासाठी साथ देणार आहे. हिरवा चारा पाण्याशिवाय निर्माण होणार नाही म्हणून या आंदोलनाद्वारे आम्हाला कालव्याद्वारे गडगडी धरणाचे पाणी पाहिजे, असे जाधव यांनी म्हटले आहे.तसेच देवरूख येथे डॉ. आंबेडकर मागासवर्गीय शासकीय विद्यार्थी वसतिगृह गेली अनेक वर्षे भाड्याच्या खासगी जागेत खितपत पडलेले आहे. शासनाने एक कोटी वीस लाख रुपयात जागेसह तयार इमारत खरेदी केली आहे. इमारत अनेक वर्षे बंद असल्याने दुरुस्तीला आली आहे. दुरुस्तीसाठीही निधी मंजूर होता. परंतु तो निधी परत का पाठवण्यात आला, ही बाब ही गंभीर आहे, असेही जाधव यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)गडगडी धरण : शेतकऱ्यांना पाणी द्यासंगमेश्वर तालुक्यात ३० वर्षापासून गडगडी धरणाचे काम सुरू आहे. या धरणासाठी कोटी रूपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. तरीदेखील धरणाचे काम पूर्ण झालेले नाही. या धरणातील पाणी परिसरातील शेतकऱ्यांना मिळावे, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून करण्यात येत आहे. मात्र, या मागणीकडे अद्याप दुर्लक्षच करण्यात आले आहे. ही मागणी शासनस्तरावरून अद्याप पूर्ण झालेली नाही. या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. केवळ आंदोलन करण्यापलिकडे येथील शेतकऱ्यांच्या हाती काहीच राहिलेले नाही. देवरूख तहसील कार्यालयासमोर होणाऱ्या आंदोलनातून ही मागणी पूर्णत्वास जाण्याची आशा आहे.वसतिगृहासाठी लढादेवरुख येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे. तरीदेखील गेली अनेक वर्षे भाड्याच्या जागेत खितपत पडावे लागत आहे.