शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

गडगडीच्या पाण्यासाठी २५पासून उपोषण

By admin | Updated: January 19, 2016 23:41 IST

जाधव यांचा इशारा : तहसील कार्यालयासमोर आंदोलन

देवरुख : गडगडी धरणाचे पाणी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध व्हावे, तसेच देवरूख येथील डॉ. आंबेडकर वसतिगृह शासनाच्या जागेत स्थलांतरीत व्हावे, या दोन प्रमुख मागण्यांसाठी अ. वि जाधव आणि कार्यकर्ते देवरुख तहसील कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला बेमुदत उपोषण छेडणार आहेत.या उपोषणाला सिद्धार्थ कासारे पाठिंबा देणार आहेत. संगमेश्वर तालुक्यातील वाशी-किंजळे येथील गडगडी धरणाला सुमारे ३०पेक्षा अधिक वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. धरणामध्ये कित्येक कोटी रुपयांचा निधी जिरला आहे. मात्र, तीस वर्षांच्या कालावधीनंतरही वाशी, काटवली, देवळे, फणसवळे, शेरेवाडी, सायले, विघ्रवली, मुचरी, कोसुंब आदी गावातील शेतकऱ्यांना धरणाचे पाणी उपलब्ध होऊ शकलेले नाही. कित्येक कोटी रुपये खर्च होऊनही पाणी उपलब्ध होत नाही, या गंभीर समस्येकडे शासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. शासनाच्या अनास्थेमुळे येथील शेतकरी वंचित राहिले आहेत.शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध व्हावे, याकरिता अ. वि. जाधव आणि कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषणाचे अस्त्र हाती घेतले आहे.सुमारे ३० ते ३२ वर्षे गडगडी धरणाचे काम चालू आहे. शासनाचे कोट्यवधी रुपये खर्ची पडलेले आहेत. परंतु शासनकर्त्यांना अजिबात देणे-घेणे नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला साथ देऊन दूध उत्पादन करण्यासाठी या भागात २५० संकरीत गाई खरेदी केल्या जाणार आहेत. काटवली सहकारी दूध संस्था १०० गाई शेतकऱ्यांना खरेदी करण्यासाठी साथ देणार आहे. हिरवा चारा पाण्याशिवाय निर्माण होणार नाही म्हणून या आंदोलनाद्वारे आम्हाला कालव्याद्वारे गडगडी धरणाचे पाणी पाहिजे, असे जाधव यांनी म्हटले आहे.तसेच देवरूख येथे डॉ. आंबेडकर मागासवर्गीय शासकीय विद्यार्थी वसतिगृह गेली अनेक वर्षे भाड्याच्या खासगी जागेत खितपत पडलेले आहे. शासनाने एक कोटी वीस लाख रुपयात जागेसह तयार इमारत खरेदी केली आहे. इमारत अनेक वर्षे बंद असल्याने दुरुस्तीला आली आहे. दुरुस्तीसाठीही निधी मंजूर होता. परंतु तो निधी परत का पाठवण्यात आला, ही बाब ही गंभीर आहे, असेही जाधव यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)गडगडी धरण : शेतकऱ्यांना पाणी द्यासंगमेश्वर तालुक्यात ३० वर्षापासून गडगडी धरणाचे काम सुरू आहे. या धरणासाठी कोटी रूपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. तरीदेखील धरणाचे काम पूर्ण झालेले नाही. या धरणातील पाणी परिसरातील शेतकऱ्यांना मिळावे, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून करण्यात येत आहे. मात्र, या मागणीकडे अद्याप दुर्लक्षच करण्यात आले आहे. ही मागणी शासनस्तरावरून अद्याप पूर्ण झालेली नाही. या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. केवळ आंदोलन करण्यापलिकडे येथील शेतकऱ्यांच्या हाती काहीच राहिलेले नाही. देवरूख तहसील कार्यालयासमोर होणाऱ्या आंदोलनातून ही मागणी पूर्णत्वास जाण्याची आशा आहे.वसतिगृहासाठी लढादेवरुख येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे. तरीदेखील गेली अनेक वर्षे भाड्याच्या जागेत खितपत पडावे लागत आहे.