शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

भातशेतीच्या नुकसानीने शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 5:17 PM

Parshuram Upkar, Farmar, Sindhdurugnews राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींची घोषणा केली आहे. मात्र, परतीच्या पावसाने भातशेती व फळबागा यांचे झालेले नुकसान पाहता शेतकऱ्यांना भरपाई देण्याची ही घोषणा फक्त दिशाभूल करण्यासाठीच असल्याचे लक्षात येईल, अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली आहे.

ठळक मुद्देभातशेतीच्या नुकसानीने शेतकरी अडचणीत शासनाची आश्वासने फक्त दिशाभूल करण्यासाठी, परशुराम उपरकर यांची टीका 

कणकवली : राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींची घोषणा केली आहे. मात्र, परतीच्या पावसाने भातशेती व फळबागा यांचे झालेले नुकसान पाहता शेतकऱ्यांना भरपाई देण्याची ही घोषणा फक्त दिशाभूल करण्यासाठीच असल्याचे लक्षात येईल, अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली आहे.कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भातशेती धारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाई ही गुंठ्याला १०० रुपयेच असल्याने शेतकरी पूर्णतः अडचणीत आला आहे.शासनाने शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकरिता विविध सामग्री घेण्यासाठी बँकेकडून कर्ज घेऊन शेती करण्यासाठी भाग पाडले. यामुळे शेतकरी दोन्ही बाजूने अडचणीत आला आहे. एकीकडे बँकेचे कर्ज फेडण्यासाठी पैसे नाहीत तर दुसरीकडे शेतीतून उत्पन्नही मिळालेले नाही. यामुळे शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत अपुरी असून किमान गुंठ्याला अडीच हजार व हेक्टरी २५ हजार रुपये तरी देण्याची गरज होती. त्यामुळे त्यातून शेतकऱ्याला सहाय्य मिळाले असते.जे शेतकरी अवकाळी पावसावर व भातशेतीवर अवलंबून असतात ते सर्व शेतकरी आता अडचणीत आले आहेत. शासनाची मदत मिळेल की नाही ? हे सांगता येत नाही. यापूर्वीही अशाप्रकारच्या अवकाळी पाऊस किंवा वादळामुळे झालेली नुकसान भरपाई देणार अशी शासनाने घोषणा करूनही ती अनेकांना अद्याप मिळालेली नाही.

मच्छिमारांना नुकसानीबाबत ६५ कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले होते. त्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला १२ कोटी देण्याच्या घोषणा आमदार, खासदारांनी केल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात त्या योजनेकरिता मच्छिमारांना अटी घालण्यात आल्या आहेत. त्या अटींमुळे मच्छिमारांना कोणतीही मदत मिळणार नसून ते मदतीपासून वंचित राहणार आहेत.मदत जाहीर करायची पण ती अपुरीच मदत द्यायची आणि ज्या अटी घालायच्या त्या शेतकरी किंवा मच्छिमार पूर्ण करू शकणार नाहीत. त्यामुळे शासनाचा निधी खर्च होणार नाही. अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. दरम्यान, मागच्या वर्षी जूनपर्यंत कर्जमुक्ती करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र, अद्यापही बहुतांश शेतकऱ्यांची कर्जमुक्ती बाकी आहे. यामुळे जनतेने जागृत होण्याची गरज आहे.सामाजिक प्रश्न म्हणून लक्ष देण्याची गरजदारू, मटका, जुगार हे अवैध धंदे बंद करण्यात यावेत. त्यामुळे कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. देवगड तालुक्यात दारुला पैसे न दिल्याने पत्नीला पेटवून देण्यापर्यंत पतीची मजल गेली आहे. यामुळे पोलिसांनी सामाजिक प्रश्न म्हणून या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे. जुगार अड्डे उद्ध्वस्त झाले असे पोलिसांकडून सांगितले जात असताना बेळणे येथे काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची चर्चा सुरू आहे. त्याबाबत पोलीस काही करणार आहेत की नाही ? असा प्रश्न परशुराम उपरकर यांनी यावेळी उपस्थित केला.

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरी