शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
4
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
5
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
6
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
7
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
8
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
9
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
10
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
11
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
12
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
13
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
14
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
15
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
16
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
17
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
18
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
19
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 6:13 PM

Rain AgricultureSector Sindhudurg : कणकवली तालुक्यासह जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून अक्षरशः झोडपून काढलेल्या पावसाने आता अचानक विश्रांती घेतली आहे. गेले तीन दिवस कडक ऊन पडत असल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. यापुढील कालावधीत कडक ऊन असेच पडल्यास भातशेती सुकून जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत अचानक विश्रांती : कडक ऊन पडत असल्याने चिंता

कणकवली : कणकवली तालुक्यासह जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून अक्षरशः झोडपून काढलेल्या पावसाने आता अचानक विश्रांती घेतली आहे. गेले तीन दिवस कडक ऊन पडत असल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. यापुढील कालावधीत कडक ऊन असेच पडल्यास भातशेती सुकून जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.शेतकरी सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मे महिन्याच्या मध्यांतरात तौक्ते चक्रीवादळ आल्याने, त्या कालावधीतच मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे दरवर्षी अनेक ठिकाणी भेडसावणारी पाण्याची समस्या मात्र दूर झाली, तर शेत जमीन ओलीचिंब झाल्याने शेतकरीही सुखावला होता. त्यानंतर, पावसाचा ओघ कायमच राहिल्याने, अनेक शेतकऱ्यांनी मे महिन्यातच नांगरणीला सुरुवात केली होती.

दरवर्षी ही नांगरणी जूनच्या मध्यानंतर केली जाते. मात्र, पुरेशा पडलेल्या या पावसाने यावर्षी सारे काही चित्रच बदलून टाकले. त्यानंतर, शेती कामांना वेग येत पेरणी करून आता भात वाण लावणी योग्य झाले आहे.मात्र, गेल्या तीन दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याचे चित्र दिसत आहे. दिवसभरात पावसाची तुरळक सर कोसळत असली, तरी तिचा भात शेतीसाठी उपयोग नाही. त्यामुळे मोठा पाऊस येणार की नाही, या चिंतेत शेतकरी पडला आहे. अधूनमधून काळे ढग येऊन पावसाचे चिन्ह निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होत आहेत.शेतकरी मोठ्या अडचणीतजूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केलेल्या भाताचा कालावधी पूर्ण झाल्याने आता ते लावणीयोग्य झाले आहे. मात्र, पाऊस येण्याची चिन्हेच नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

पाऊस नसल्याने उंच भागातील जमिनीतील पाणी सुकून गेले आहे, तर गेल्या २ ते ४ दिवसांत लावणी केलेले भात पाऊस न पडल्यास सुकण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्याचे डोळे नभाकडे लागून राहिले आहेत, तर काही भागांत शेती वाळून जाऊ नये, यासाठी कृत्रिम पाण्याचा उसपा करून शेतीला पाणी पुरविले जात आहे. भरडी शेती असलेले शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस