शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

हत्तीकडून शेतीचे नुकसान; कर्नाटकमधील तज्ञांची मदत घेणार, प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दिली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 12:40 PM

राज्य सरकारच्या माध्यमातून कर्नाटक मधील तज्ञांशी पत्रव्यवहार करण्यात येणार

सावंतवाडी : सिंधुदुर्गसह कोल्हापूर जिल्हयाला भेडसावणाऱ्या हत्ती प्रश्नावर आता पुन्हा एकदा वनविभाग कर्नाटक मधील हत्ती तज्ञांची मदत घेणार आहे. याबाबतची प्राथमिक चर्चा ही या तज्ञांशी झाली असल्याची माहिती नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक वायएलपी राव यांनी दिली.राव हे शुक्रवारी सिंधुदुर्गवनविभागाच्या आढावा बैठकीसाठी सावंतवाडीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कोल्हापूर वनपरिक्षेत्राचे मुख्य वनसंरक्षक माणिकचंद रामानुजम, उपवनसंरक्षक एस.नवकिशोर रेड्डी, वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, अमृत शिंदे, एस.सोनवडेकर उपस्थित होते.राव म्हणाले, हत्तीकडून सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. या नुकसानीमुळे दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त आहेत. यावर कायमस्वरूपी उपाय योजना आखण्याबाबत आमची चर्चा सुरू आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे मुख्य वनसंरक्षक माणिकचंद रामानुजम यांनी अलिकडेच कर्नाटक राज्यातील हत्ती तज्ञांशी चर्चा केली आहे. ही प्राथमिक चर्चा होती. पण लवकरच राज्य सरकारच्या माध्यमातून कर्नाटक मधील तज्ञांशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. त्यानंतर एक अधिकाऱ्याचे पथक तिथे जाईल व हत्ती बाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी चर्चा करतील असे राव यांनी स्पष्ट केले.हत्तीसह वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीची भरपाई अत्यल्प आहे.या नुकसानीत वाढ व्हावी यासाठी राज्य शासनाकडे एक  प्रस्ताव पाठवण्यात आला असून या प्रस्तावाच्या आधारे भविष्यात नुकसान भरपाईत मोठी वाढ होईल. सध्या हा प्रस्ताव मंत्रालयीन पातळीवर असल्याचे राव यांनी सांगितले. मात्र यावर अद्याप निर्णय झाला नाही.सध्या मी राज्याचा दौरा करून जंगल क्षेत्रात काय बदल करायचे नवीन काय सुचना आहेत का यांची माहिती अधिकाऱ्यांकडून घेत आहे. त्याबाबतच चर्चा करण्यासाठी आलो होतो अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावाही घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभागFarmerशेतकरी