शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

कौशल्य विकासातून कोकणात रोजगार निर्मिती करणार!, प्रमोद जठार यांची माहिती 

By सुधीर राणे | Published: December 17, 2022 4:32 PM

कणकवली: बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होणार आहे. त्याठिकाणी निर्माण होणारा रोजगार पाहता कोकणातील बेरोजगारांचे कौशल्य विकास करणे आवश्यक आहे. ...

कणकवली: बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होणार आहे. त्याठिकाणी निर्माण होणारा रोजगार पाहता कोकणातील बेरोजगारांचे कौशल्य विकास करणे आवश्यक आहे. त्यामुळे आताच आयटीआय मधून प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण केले पाहिजे. त्यासाठी २१०० गावांमधील प्रत्येक गावातील किमान ५० मुलांना प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी मंत्री मंगलप्रभात  लोढा यांच्याकडे केली असून त्यादृष्टीने लवकरच मंत्रालयात बैठक होणार असल्याची माहिती भाजपा प्रदेश सचिव प्रमोद जठार यांनी दिली.कणकवली येथील भाजपा कार्यालयात आज, शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिडवणे सरपंच रविंद्र शेट्ये, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, पप्पू पुजारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.जठार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील काळात बारसू रिफायनरी प्रकल्प भूसंपादन करण्यासाठी दर जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले. या प्रकल्पासाठी मी अनेक वर्षे काम करत आहे. कोकणातील बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी हा रिफायनरी प्रकल्प आवश्यक आहे. प्रत्येक घरातील एका व्यक्तीला नोकरी या ठिकाणी मिळेल. त्यासाठी कौशल्य विकास(स्किल डेव्हलपेंट) विभागाच्यावतीने २१०० गावांमधील प्रत्येक गावातील किमान ५० मुलांना प्रशिक्षण द्यावे अशी मागणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे केली आहे. त्यांनी अधिवेशन संपल्यावर तातडीने बैठक लावू असे सांगितले आहे. या बैठकीला कोकणातील आमदार उपस्थित राहतील. रिफायनरी प्रकल्प झाल्यास कोकणचा चेहरा मोहरा बदलून जाईल. येथील अर्थकारण बदलेल आणि नोकरीसाठी येथील तरुणांना मुंबई, पुण्यात जावे लागणार नाही. रिफायनरी प्रकल्पात इंजिनियर, फिटर, वायरमन अशा प्रशिक्षित लोकांची गरज लागणार आहे. त्यासाठी आपल्याकडे कार्यरत असलेल्या आयटीआयमध्ये आवश्यक असे नवे ट्रेड सुरू करून येथील बेरोजगार तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सकारात्मकता दर्शविली असल्याचे जठार यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गnanar refinery projectनाणार प्रकल्पBJPभाजपा