शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

कलमठ येथे विद्युतभारीत वीजवाहिनी तुटली, वाहनाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 1:27 PM

कणकवली ते आचरा रस्त्यावरील कलमठ मच्छिमार्केटच्या बाजूला मुलांच्या वसतीगृहासमोर विद्युतभारीत वीजवाहिनी अचानक तुटून खाली पडली.

ठळक मुद्देकलमठ येथे विद्युतभारीत वीजवाहिनी तुटली, वाहनाचे नुकसानविजेची उपकरणे जळाली; सुदैवाने जीवितहानी टळली; ग्रामस्थ आक्रमक

कणकवली : कणकवली ते आचरा रस्त्यावरील कलमठ मच्छिमार्केटच्या बाजूला मुलांच्या वसतीगृहासमोर विद्युतभारीत वीजवाहिनी अचानक तुटून खाली पडली.

तिथे उभी करून ठेवलेल्या चारचाकी गाडीवर ही वाहिनी पडल्याने गाडीच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. तर अचानक वीज भारमान वाढल्याने आजुबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांची तसेच व्यावसायिकांची विजेवर चालणारी उपकरणे जळाली आहेत. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली.दरम्यान, ही घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी वायरमनशी संपर्क साधला असता त्याने उद्धट उत्तरे दिली . त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी कणकवली येथील वीज वितरणचे विभागीय कार्यालय गाठत अधिकाऱ्यांना जाब विचारला.

आचरा रस्त्यावरील कलमठ ते वरवडे दरम्यानच्या वीजवाहिन्या जीर्ण झाल्या असून त्या बदलाव्यात अशी मागणी वारंवार कलमठ तसेच वरवडे ग्रामस्थ करीत होते. मात्र, वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.त्यामुळे अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा फटका ग्रामस्थांना बसला.कणकवली-आचरा मुख्य मार्गावरील कलमठ मच्छिमार्केटच्या बाजूला मुलांच्या वसतिगृहासमोर विद्युतभारीत वीजवाहिनी अचानक तुटून तिथे उभी करून ठेवलेल्या गाडी (क्रमांक एम एच ०७ - ए .जे . ११५२) वर पडली. छोटा हत्तीसारख्या या चारचाकी गाडीच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. तर आबा गुडेकर यांच्या गॅरेजमधील कॉम्प्रेसर व आॅलविन फर्नाडिस यांची वेल्डिंग मशीन जळाली आहे.

कलमठ बाजारपेठमधील दुकानदारांचेही नुकसान झाले आहे. घटना घडल्यानंतर वायरमन राकेश कुबल यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ग्रामस्थांना उद्धट उत्तरे दिली. त्यामुळे कलमठ, वरवडे येथील ग्रामस्थ आक्रमक होत वीज वितरणाच्या कणकवली येथील कार्यालयात अतिरिक्त कार्यकारी अभियंता भगत यांची भेट घेतली. यावेळी कार्यकारी अभियंता संजय गवळी तसेच शाखा अभियंता कानडे अनुपस्थित होते.कलमठ, वरवडे येथील ग्रामस्थानी वारंवार जीर्ण विजवाहिनी बदलाची मागणी केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच ही घटना घडली आहे, असा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला. तसेच शाखा अभियंता कानडे यांच्या बदलीची मागणीही केली.

नुकसान झालेल्यांना भरपाई द्यावी अशी मागणी अतिरिक्त कार्यकारी अभियंता भगत यांच्याकडे केली. त्यांनी कार्यकारी अभियंता संजय गवळी यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. त्यानंतर भगत यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने ग्रामस्थ शांत झाले.

यावेळी स्वाभिमान पक्ष युवक जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, हनुमंत बोंद्रे, सुशांत राऊळ, नितीन पेडणेकर, आबा गुडेकर, आॅलविन फर्नांडिस, बाबा पारकर, पपू सावंत, अभि करंबेळकर, तोहसीन शेख, नंदू कोरगावकर उपस्थित होते. 

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग