शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
2
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
3
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
4
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
5
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या नूर खान बेसवर हल्ला; Video समोर आला...
6
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
8
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
9
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
10
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
11
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
12
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
13
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
14
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
15
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
16
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
17
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
18
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
19
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
20
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 

उन्हाळ्यामुळे शीतपेयांना मागणी

By admin | Updated: April 1, 2015 00:14 IST

ग्राहकांना भुरळ : स्थानिक उत्पादनांच्या विक्रीतही वाढ

प्रथमेश गुरव -वेंगुर्ले  -वाढत्या उन्हाळ्यात बाजारात दाखल झालेल्या नावीन्यपूर्ण वेष्टनातील कंपनीच्या व स्थानिक शीतपेयांनी ग्राहकांना भुरळ घातली आहे. कंपनीच्या शीतपेयांबरोबरच स्थानिक शीतपेयांनाही मागणी असल्याचे आढळून आले आहे. सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. वाढत्या उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळण्यासाठी नागरिक शीतपेये पीत असतात. बाजारात विविध कंपन्यांची शीतपेये दाखल झाली आहेत. नावीन्यपूर्ण वेष्टनातील ही शीतपेये नागरिकांना आकर्षित करीत आहेत. मात्र, दुसरीकडे गावातील स्थानिक लोकही स्वत: शीतपेयांचे उत्पादन घेत असून त्यांचीही उत्पादने बाजारात आली आहेत. कंपनीच्या व स्थानिक उत्पादनांमधील शीतपेये निवडताना गाहक स्थानिक शीतपेयांची निवड करत असल्याचे स्थानिक उत्पादकांचे म्हणणे आहे. दरम्यान, बाहेर गावचे प्रवासी, पर्यटक मात्र ‘यूज अ‍ॅण्ड थ्रो’ अशा स्वरुपातील असणारी शीतपेये घेणेच पसंत करतात. स्थानिक शीतपेयांच्या किंमती या कंपनीच्या शीतपेयांपेक्षा कमी व सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या असतात. परंतु कंपनीची शीतपेये महाग असली, तरी त्यांच्या ‘यूज अ‍ॅण्ड थ्रो’ वेष्टनामुळे प्रवासात स्वत:बरोबर ठेवणे सोयीचे बनते. त्यामुळे स्थानिक प्रवासीवर्ग सुद्धा कंपनीच्या शीतपेयांचा वापर करतात. परिणामी, पर्यटक तसेच प्रवाशांपर्यंत आपले उत्पादन पोहोचविण्यासाठी स्थानिक उत्पादकांना मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागणार आहेत. वेंगुर्ले तालुक्यात ८ ते १० च्या आसपास स्थानिक शीतपेयांचे तसेच कोकम सरबत बनविणारेही उत्पादक आहेत. शीतपेयांमध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे ‘पाणी’. पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल, तर उत्पादन घेणे सोयीचे होते. साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस न पडल्यास बाजारपेठेतील शीतपेयांची मागणी वाढती राहते. पण पाणी टंचाईचे मोठे संकट या स्थानिक उत्पादकांसमोर निर्माण होते. बाहेरून पाणी आणून उत्पादन करणे परवडणारे नसल्याने मे महिन्याच्या शेवटी हा व्यवसाय मंदगतीने चालतो. जाहिरात, बाजारपेठ, पाणी या संकटांना सामोरे जात स्थानिक शीतपेये उत्पादकांना हा व्यवसाय टिकविणे म्हणजे एक प्रकारचे आव्हानच असते. (प्रतिनिधी)स्थानिक उत्पादकांना प्रतिसादसध्या स्पर्धेचे युग असल्याने प्रत्येक व्यवसायात स्पर्धा ही आहेच. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी काही स्थानिक थंड पेय उत्पादकांनी कंपनीशी बरोबरी करत प्लास्टिक बॉटलमध्ये उत्पादन सुरू केले आहे. त्याला प्रतिसादही लाभत आहे. मात्र, प्लास्टिक बॉटलमधील ही प्रक्रिया महागडी असल्याने यामध्ये चांगले यश मिळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. - दीपक माडकर, रेलीश सोडा फॅक्टरी वेंगुर्लेदर्जा वाढविल्यास बाजारपेठआमच्याकडे स्थानिक व कंपनीची अशी दोन्ही उत्पादने विक्रीस आहेत. पर्यटकांकडून कंपनीच्या उत्पादनांची मागणी जास्त असते. स्थानिक थंडपेय उत्पादकांनी आपल्या उत्पादनाचा दर्जा वाढविल्यास निश्चितच त्यांना चांगल्याप्रकारे बाजारपेठ मिळू शकेल. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. परंतु हे तंत्रज्ञान आर्थिकदृष्ट्या स्थानिक उत्पादकांना परवडणारे नाही. - संजू तानावडे भाजप शहराध्यक्ष