शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

निसर्गाच्या देणगीत मानवी हस्तक्षेप, वर बंधारे घातल्याने आंबोलीतील धबधबे प्रवाहहीन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2018 9:14 PM

निसर्गाची देणगी असलेले आंबोलीतील धबधबे सध्या मानवी हस्तक्षेपाच्या कचाट्यात सापडल्याने पाऊस पडूनही हे धबधबे प्रवाहीत होत नसल्याची तक्रार स्थानिकांची आहे.

 - अनंत जाधव  

सावंतवाडी - निसर्गाची देणगी असलेले आंबोलीतील धबधबे सध्या मानवी हस्तक्षेपाच्या कचाट्यात सापडल्याने पाऊस पडूनही हे धबधबे प्रवाहीत होत नसल्याची ओरड स्थानिकांची आहे. जेथून धबधब्यांचे पाणी पडते, त्यांच्यावरच वनविभागाने बंधारे घातल्याने हे पाणी बंधा-यातच अडल्याने खाली येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकारावर सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जर बंधा-यामुळे पाणी अडत असेल तर ते बंधारे काढायला लावू, असे स्पष्ट केले आहे.आंबोली घाट हा ब्रिटिशकालीन आहे. तसेच हे धबधबेही नैसर्गिक असून, निर्सगाची अतिउत्तम देणगीच मानली जात आहे. गेली अनेक वर्षे हे धबधबे प्रवाहित होत आहेत. या धबधब्यातून पडणारे पाणी हे चौकुळमधून प्रवाहित होत असते. तेथे वनविभाग दरवर्षी या पाण्याच्या प्रवाहात अडथळे ठरत असलेल्या गटारांमध्ये कचरा साठत असेल तो काढणे तसेच गटारातील माती काढणे असे प्रकार करत असतात. त्यामुळे चौकुळमध्ये मोठा पाऊस झाला की धबधबे प्रवाहित होत असतात.सध्या आंबोली व चौकुळ मोठ्या प्रमाणात पाऊस पडत नसला, तरी सुरूवातीच्या काळात मोठा पाऊस आंबोली व चौकुळ परिसरात कोसळला. त्यामुळे नक्कीच हे धबधबे कोसळले पाहिजे होते. पण अद्यापपर्यंत हवे तसे धबधबे प्रवाहित झाले नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत स्थानिक दुकानदारांची ओरड होती. पण त्यांच्याकडे कोण लक्ष देत नव्हते. म्हणून रविवारी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता या धबधब्याच्यावर मोठ्या प्रमाणात बंधारे घालण्यात आल्याचे दिसून येत आहे.वनविभागाने हे बंधारे घातले आहेत. पण हे धबधबे घालण्यामागे वनविभागाचा उद्देश साफ आहे. त्यांना बंधाºयात बारमाही पाणी साठवायचे असून, ते बारमाही पाणी साटले तर कायमस्वरूपी धबधबे सुरू राहातील आणि पर्यटकही आकर्षित होतील, असे वाटत होते. पण निसर्गाच्या देणगीत मानवी हस्तक्षेप झाला तर ते चालत नाही याचीच प्रचिती आता सर्वांनी आली आहे.मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला नसला तरी धबधबे पडण्याएवढा पाऊस आंबोली व चौकुळमध्ये कोसळला आहे. पण आता मुख्य धबधब्यातून ज्या पध्दतीने पाणी पडायला पाहिजे होते, तेवढे पाणी पडत नसल्याने पर्यटकही नाराज झाले आहेत. आंबोलीत येणारा पर्यटक हा धबधब्याच्या खाली आंघोळ करण्यासाठी येत असतो. त्यातून त्यांना आनंद मिळत असतो. पण यावर्षी या आनंदावर सुरूवातीच्या काळात तरी विरजण पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.दरम्यान, या सर्व प्रकाबाबत स्थानिक व्यापारी तसेच दुकानदारांना विचारले असता काहींनी नाव न सांगण्याच्या अटीवर बोलक्या प्रतिकिया दिल्या. यात वर जर बंधारे घातले तर पाणी कोठून पडणार आणि वनविभागाला कोण सांगणार, असे सांगितले. या बंधाºयात पाणी साठणार तेव्हा ते खाली येणार, असेही काहींचे मत होते. त्यामुुळे आता निसर्गाच्या देणगीत हस्तक्षेप केल्यास काय होऊ शकते याचे हे उत्तम उदाहारण असून, वनविभागाने याचा बोध घेणे गरजेचे आहे. अन्यथा हे निसर्गाचे देणे लुप्त होण्यास वेळ लागणार नसल्याचेच यातून दिसून येत आहे.निसर्गाच्या देणगीत हस्तक्षेप चुकीचाच : साळगावकरजे धबधबे कोसळत आहेत हे निसर्गाचे वरदान आहे. मात्र वनविभागाने त्यात हस्तक्षेप करू नये. काही जुन्या माणसांकडून माहिती घेतली पाहिजे होती आणि नंतरच त्यावर निर्णय घेतला पाहिजे होता. अन्यथा येथील पर्यटनही नष्ट होण्यास वेळ लागणार नाही, असे मत सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले. त्यांनीही रविवारी आंबोलीला भेट देत नाराजी व्यक्त केली आहे.वेळ पडल्यास बंधारे काढण्यास सांगू : केसरकर जर बंधाºयामुळे आंबोतील धबधबे कोसळत नसतील तर वनविभागाच्या अधिकाºयांशी चर्चा करून बंधारे काढायला लावू. बारमाही धबधबे कोसळले पाहिजेत. आंबोली सतत पर्यटक आले पाहिजेत, यासाठीच हे बंधारे घातले आहेत, असे मत सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.दरवर्षीच्या तुलनेत पाणी प्रवाह कमी :पर्यटकवर्षा पर्यटनासाठी आम्ही दरवर्षी आंबोलीत येतो. मात्र दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाण्याचा प्रवाह कमी आहे. जून महिना संपत आला तरी धबधब्यांचा प्रवाह वाढला नाही. त्यामुळे नेमके काय झाले याचा शोध वनविभागाने घेणे गरजेचे आहे, असे मत पर्यटक दीपाली हरमलकर यांनी व्यक्त केले.पाणी अडवण्याचा फायदा वन्यप्राण्यांना : वनविभागनव्याने बंधारे घातले आहे हे सत्य आहे. मात्र ते बंधारे भरल्यानंतर पाणी नेहमीप्रमाणे वाहणा-या पाण्यावर मोठ्या प्रमाणात माती वाहून जाऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. पाणी अडवण्याचा फायदा जंगलातील प्राण्यांना होणार आहे. तसेच जास्त काळ टिकण्यासाठी त्याचा फायदा होईल.

टॅग्स :Amboli hill stationआंबोलि हिल स्टेशनWaterपाणी