शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

शासनाच्या उदासीनतेमुळे आंबोली पर्यटन विकासाला खिळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 4:25 PM

शासनाच्या उदासिनतेमुळे आंबोलीच्या पर्यटन विकासाला खीळ बसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, याबाबत ठोस पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा येथे झालेल्या बैठकीत देण्यात आला आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांच्या बैठकीत नाराजी ठोस पावले न उचलल्यास आंदोलनाचा इशारा

आंबोली : शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे आंबोली पर्यटन स्थळाला धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी विविध विकासकामांवर खर्च करत असलेल्या लाखो रुपयांच्या निधीचा चुराडा झाला आहे.

शासनाच्या उदासिनतेमुळे आंबोलीच्या पर्यटन विकासाला खीळ बसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, याबाबत ठोस पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा येथे झालेल्या बैठकीत देण्यात आला आहे.जिल्ह्यातील प्रति महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंबोलीमध्ये शासनाने विकासात्मक धोरणे राबवून आंबोली पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिध्द झाले. तेच पर्यटन क्षेत्र आज भकास होण्याची चिन्हे दिसत आहे.

या पर्यटन क्षेत्राचा विकास न होण्याचे कारण फक्त लोकप्रतिनिधी आणि शासन असल्याचे स्पष्ट होत आहे. पर्यटनासाठी आलेला लाखो रुपयांचा निधी मंजूर होऊनही आंबोली पर्यटन स्थळाची दुरवस्था कायम आहे. त्यामुळे हा निधी जातो तरी कोठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.आंबोली पर्यटन झपाट्याने वाढ होण्याचे राहिले बाजूला, पण पर्यटन क्षेत्राच्या अधोगतीचा चाप लागलेला आहे. शासनाने चुकीच्या पध्दतीने खर्च केल्यामुळे आज आंबोलीत रस्त्यांची दयनीय अवस्था निर्माण झाली आहे.

सर्व पर्यटन पाँईटची दुरवस्था झाली असल्यामुळे आंबोलीत पर्यटकांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. भविष्यात शासनाने आंबोली पर्यटन क्षेत्राकडे पाट फिरवली तर येत्या एक ते दोन वर्षात येथील पर्यटन बंद होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.आंबोली पर्यटन क्षेत्राला यापूर्वी विविध कामांवर लाखो रुपयांचा निधी खर्च होऊनही ते अपूर्ण अवस्थेत आहेत. वाहनतळाची गैरसोय असल्यामुळे पर्यटकांना आठ ते दहा किलोमीटर पायपीट करावी लागते. येथील पर्यटन स्थळांचा विकास करण्याची पालकमंत्र्यांनी आश्वासने दिली होती. मात्र त्यांनाही आश्वासनांचे विस्मरण झाले आहे.

टॅग्स :Amboli hill stationआंबोलि हिल स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग