शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

पुरामुळे फायबर बोट कारखान्याचे ४० लाखांचे नुकसान, काळसे बागवाडीतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:07 PM

मालवण तालुक्यातील काळसे बागवाडीमध्ये आलेल्या महापुरामध्ये काही कुटुंबाचे घरगुती साहित्य आणि घरांचे नुकसान झाले आहे. परंतु या महापुरामुळे सर्वाधिक आणि व्यावसायिक नुकसान झाले आहे ते शंकर नारायण नार्वेकर आणि कुटुंबीयांच्या बाळराजे फायबर आणि बोट बिल्डर्स या कारखान्याचे.

ठळक मुद्देपुरामुळे फायबर बोट कारखान्याचे ४० लाखांचे नुकसान, काळसे बागवाडीतील प्रकार पुन्हा व्यवसाय उभा करण्याचे नार्वेकर कुटुंबियांसमोर आव्हान

चौके : मालवण तालुक्यातील काळसे बागवाडीमध्ये आलेल्या महापुरामध्ये काही कुटुंबाचे घरगुती साहित्य आणि घरांचे नुकसान झाले आहे. परंतु या महापुरामुळे सर्वाधिक आणि व्यावसायिक नुकसान झाले आहे ते शंकर नारायण नार्वेकर आणि कुटुंबीयांच्या बाळराजे फायबर आणि बोट बिल्डर्स या कारखान्याचे. पुरामध्ये वाहून गेलेले आणि पाण्यात भिजून वाया गेलेले सामान यांचा तपशील काढल्यानंतर सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे शंकर नार्वेकर यांच्या निदर्शनास आले. एवढे मोठे नुकसान भरून काढून पुन्हा व्यवसाय उभा करणे हे त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.काळसे बागवाडीमध्ये कर्ली नदीकिनारी शंकर नार्वेकर आणि कुटुंबीयांचा बाळराजे फायबर आणि बोट बिल्डर्स या नावाने फायबरच्या व लाकडी बोटी बांधणे व दुरुस्ती करण्याचा व्यवसाय आहे. गेली १२ वर्षे हा व्यवसाय ते करतात या व्यवसायामुळे काही स्थानिक लोकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. परंतु ६ आॅगस्ट रोजी पहाटे ४ वाजता कर्ली खाडीला आलेल्या महाभयंकर पुरामुळे होत्याचे नव्हते झाले आणि नार्वेकर कुटुंबीयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.अचानक आलेल्या या महापुरामध्ये २ नवीन बनविलेल्या रेती बोटी, १९ फुट लांबीचे ६ पगार ( छोट्या होड्या), २७५ नग प्लायवूड, १५२ कॅन रेक्झीन, ५५ मॅट बॉक्स ( रोल ), वेगवेगळ्या आकाराचे ४९ फोम, २५०० घनफूट लाकूड सामान, ५५ फुट लांबीचा फायबर मोल्ड ( साचा ), २ मोडलेले मोल्ड आणि १० बेल्ट एवढे सर्व सामान वाहून गेले तसेच जनरेटर, इलेक्ट्रिक कटर, तसेच इतर मशिन आणि विद्युत उपकरणे पुराच्या पाण्यात भिजून नादुरुस्त झाली.अशाप्रकारे वाहून गेलेले आणि नादुरुस्त झालेले सर्व सामान ४0 लाख रुपये किमतीचे होते अशी माहिती शंकर नार्वेकर यांनी दिली. तर काही सामान वाडीतील तरुणांनी आणि शेजारील सहाकाऱ्यांनी धाडसाने पकडले त्यामुळे काही साहित्य वाहून जाण्यापासून वाचवता आले.

यावेळी संदिप शिंग्रे, सचिन सावंत, अरुण शिंग्रे, संदिप गुराम, पिंट्या परब, ललित खोत, अक्षय घाडी, बबलू खोत, बबलू जावकर, वैभव घाडी, दाजी घाडी, विष्णू नांदोस्कर, आना परब, गुणेश घाडी, विशाल राणे, पिंट्या नार्वेकर, शिवा मेस्ता, सुनिल मेस्ता, वासुदेव मेस्ता, लक्ष्मण माड्ये, नाना खोत, जयेश वाडकर, अरविंद खोत, सचिन खोत, अमित खोत, वासुदेव मेस्ता यांनी मदतकार्य करून काही सामान वाहून जाण्यापासून वाचवले. तरीही एवढे लाखो रुपयांचे नुकसान भरून काढणे ही शंकर नार्वेकर यांच्यासमोरील मोठी समस्या आहे. 

टॅग्स :floodपूरsindhudurgसिंधुदुर्ग