शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गद्दारांना निवडणुकीत पाडल्याशिवाय स्वस्थ बसू नका!, सुभाष देसाई यांचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 13:07 IST

कितीही चौकशा लावा, दबाव आणा तरी आम्ही ठाकरेंसोबत

कणकवली: सध्याचा काळ हा संकटाचा असला तरी उद्धव ठाकरे संघर्ष करीत आहेत. या संघर्षाच्या वाटेत अडचणी, खाचखळगे आहेत. मात्र, शेवटी विजय निश्चित आहे. येत्या काळात निवडणुकीत गद्दारांना पाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा चंग सर्वांनी बांधून कामाला लागावे, असे आवाहन ज्येष्ठ शिवसेना नेते तथा राज्याचे माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने कणकवली व वैभववाडी  तालुक्याचा शिवगर्जना मेळावा कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संजय पडते, प्रदीप बोरकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, कोकण  सिंचन मंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, अतुल रावराणे, स्नेहा माने, नीलम सावंत, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, मंगेश लोके, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राजू शेटये आदी उपस्थित होते.सुभाष देसाई म्हणाले,  बाळासाहेबांच्या विचाराच्या जोरावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी कायम आहेत. राज्यातील शिवसैनिकांप्रमाणे येथील शिवसैनिक ठाकरे यांच्या पाठीशी आहेत याचा आपल्याला अभिमान आहे. ही शिवसेनेने मिळविलेली संपत्ती आहे. शिवसेनेचे नाव, चिन्ह चोरले गेले आहे तरीही येत्या निवडणुकांमध्ये पक्षाला मोठे यश मिळायला हवे यादृष्टीने कामाला लागा. गावागावात जाऊन उद्धव ठाकरे यांचे विचार पोहचवा. असे आवाहन त्यांनी केले.आमदार नाईक म्हणाले, ज्या पक्षाचे आमदार, खासदार सोडून गेले. चार दिवसांपूर्वी नाव आणि चिन्ह गेले.तरीही  पक्षाचे कार्यकर्ते आज मोठ्या संख्येने एकत्रित आले आहेत. हीच शिवसैनिकांची खरी ताकद आहे.शिवसैनिक हा कोणत्याही वादळामुळे हलणार नाही हे आजच्या उपस्थितीवरून दाखवून दिले आहे. शेवटचा आमदार सोडून गेला तरी मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत राहणार आहे. माझ्या कितीही चौकशा लावा, दबाव आणा तरी आम्ही ठाकरेंसोबत राहणार आहोत. कारण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिवसैनिकांमुळे दोन वेळा आमदार होण्याची संधी मिळाली. त्यामुळे लढायचं ते जिंकेपर्यंत आणि म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरे शिवसेनेसोबतच आपण राहणार आहे.

अन्यायाविरुद्ध पेटून उठले पाहिजे कारण ज्या ज्यावेळी शिवसैनिक पेटून उठतो  त्यावेळी त्यांच्या पाठीशी जनता उभी राहते. हा या जिल्ह्याचा इतिहास आहे. जे जे शिवसेनेला सोडून गेले त्यांचे काय झाले हे जिल्ह्यातील जनतेने पाहिले आहे. आज भाजप निवडणुकीपासून लांब पळत आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका आहेत. या निवडणुकांची लोक वाट बघत आहेत. त्यावेळी भाजपला लोक धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत.जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी महाविकास आघाडीच्या काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपलब्ध करून दिला. ज्यावेळी कोरोना महामारीचे संकट, तोक्ते वादळाचे संकट होते त्यावेळी सर्वप्रथम शिवसैनिकच मदतीसाठी धावून आला होता. त्यावेळी भाजपची माणसे कुठे होती असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी अन्य पदाधिकाऱ्यांनीही मार्गदर्शन केले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSubhash Desaiसुभाष देसाई