शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

आडाळी एमआयडीसी जागेतील ५० एकरचा भूखंड जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 11:06 IST

environment Sindhudurg Neews: केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय वनौषधी संस्था स्थापन करण्यासाठी आडाळी एमआयडीसी जागेतील ५० एकरचा भूखंड जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात दिला. जागेचे सीमांकनही करण्यात आले. शुक्रवारी महामंडळ व दोडामार्ग तहसीलदार यांच्यात तसा करार झाला आहे. अलिकडेच राज्य मंत्रिमंडळाने या प्रकल्पासाठी ५० एकर जागा मोफत व १०० कोटीचा निधी देण्याचा निर्णय घेतला होता.

ठळक मुद्देआडाळी एमआयडीसी जागेतील ५० एकरचा भूखंड जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात १०० कोटींचा निधी देण्याचा निर्णय : आशा पल्लवीत

दोडामार्ग : केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय वनौषधी संस्था स्थापन करण्यासाठी आडाळी एमआयडीसी जागेतील ५० एकरचा भूखंड जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात दिला. जागेचे सीमांकनही करण्यात आले. महामंडळ व दोडामार्ग तहसीलदार यांच्यात तसा करार झाला आहे. अलिकडेच राज्य मंत्रिमंडळाने या प्रकल्पासाठी ५० एकर जागा मोफत व १०० कोटीचा निधी देण्याचा निर्णय घेतला होता.आडाळीत औद्योगिक क्षेत्र मंजूर होऊन तब्बल आठ वर्षाच्या कालांतराने येथील पहिला भूखंड महामंडळाने प्रकल्पासाठी दिल्याने आशा पल्लवीत झाल्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून राष्ट्रीय वनौषधी संशोधन संस्था आडाळी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेत मंजूर करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी आडाळी येथे प्रकल्पाला मंजुरी दिली होती. मात्र, हा प्रकल्प जळगाव येथे नेण्यात आला. राज्यात युतीची

सत्ता जाऊन महाआघाडी ची सत्ता आली. त्यानंतर नाईक यांनी पुन्हा आडाळीत प्रकल्प मंजुरीची घोषणा केली. प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून मोफत जमीन मिळणे आवश्यक होते. अखेर आडाळी एमआयडीसी मधील 50 एकर जागा प्रकल्पसाठी देण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळने घेतला. त्यानंतर तत्काळ महामंडळाकडून जागा निश्चित करण्यात आली आहे. तसेच जागेचे सीमांकनही करण्यात आले आहे.महामंडळाने ही जागा राज्यशासनाकडे हसतांतरित केली. शुक्रवारी दोडामार्ग तहसीलदार अरुण खानोलकर व महामंडळाचे अधिकारी उमेश कोष्टी यांनी आडाळी येथे हस्तानंतरण करारावर सह्या केल्या. यावेळी मंडळ अधिकारी प्रेमानंद सावंत, तलाठी श्रीमती गोरे उपस्थित होते. यावेळी कोष्टी यांनी तहसीलदार यांना प्रकल्पसाठी निश्चित केलेली जागा दाखवली.आशादायक सुरवातकेंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त सहकार्यातून हा प्रकल्प उभा राहणार आहे. अनेक अडथळे पार करून प्रकल्प आता दृष्टक्षेपात येत आहे. केंद्र आणि राज्यात वेगळ्या पक्षांची सरकारे आणि त्यात पुन्हा कोकणातील प्रकल्प अशी स्थिती असल्याने प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता नाही असे भाकीत वर्तविले जात होते. पण सत्ताधारी आणि विरोधकांची समन्वयाची भूमिकाच या प्रकल्पाचा मजबूत पाया ठरली आहे. शिवाय आडाळीसाठीही ही ऐतिहासिक बाब आहे. गेली आठ वर्षे जी मेहनत आम्ही एमआयडीसी साठी घेत आहोत, ती आता फळाला येत असल्याचे स्थानिय लोकांधिकार संरक्षण समितीचे समन्वयक पराग गावकर यांनी सांगितले. 

टॅग्स :environmentपर्यावरणAyurvedic Home Remediesघरगुती उपायsindhudurgसिंधुदुर्ग