शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

आडाळी एमआयडीसी जागेतील ५० एकरचा भूखंड जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 11:06 IST

environment Sindhudurg Neews: केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय वनौषधी संस्था स्थापन करण्यासाठी आडाळी एमआयडीसी जागेतील ५० एकरचा भूखंड जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात दिला. जागेचे सीमांकनही करण्यात आले. शुक्रवारी महामंडळ व दोडामार्ग तहसीलदार यांच्यात तसा करार झाला आहे. अलिकडेच राज्य मंत्रिमंडळाने या प्रकल्पासाठी ५० एकर जागा मोफत व १०० कोटीचा निधी देण्याचा निर्णय घेतला होता.

ठळक मुद्देआडाळी एमआयडीसी जागेतील ५० एकरचा भूखंड जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात १०० कोटींचा निधी देण्याचा निर्णय : आशा पल्लवीत

दोडामार्ग : केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय वनौषधी संस्था स्थापन करण्यासाठी आडाळी एमआयडीसी जागेतील ५० एकरचा भूखंड जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात दिला. जागेचे सीमांकनही करण्यात आले. महामंडळ व दोडामार्ग तहसीलदार यांच्यात तसा करार झाला आहे. अलिकडेच राज्य मंत्रिमंडळाने या प्रकल्पासाठी ५० एकर जागा मोफत व १०० कोटीचा निधी देण्याचा निर्णय घेतला होता.आडाळीत औद्योगिक क्षेत्र मंजूर होऊन तब्बल आठ वर्षाच्या कालांतराने येथील पहिला भूखंड महामंडळाने प्रकल्पासाठी दिल्याने आशा पल्लवीत झाल्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून राष्ट्रीय वनौषधी संशोधन संस्था आडाळी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेत मंजूर करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी आडाळी येथे प्रकल्पाला मंजुरी दिली होती. मात्र, हा प्रकल्प जळगाव येथे नेण्यात आला. राज्यात युतीची

सत्ता जाऊन महाआघाडी ची सत्ता आली. त्यानंतर नाईक यांनी पुन्हा आडाळीत प्रकल्प मंजुरीची घोषणा केली. प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून मोफत जमीन मिळणे आवश्यक होते. अखेर आडाळी एमआयडीसी मधील 50 एकर जागा प्रकल्पसाठी देण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळने घेतला. त्यानंतर तत्काळ महामंडळाकडून जागा निश्चित करण्यात आली आहे. तसेच जागेचे सीमांकनही करण्यात आले आहे.महामंडळाने ही जागा राज्यशासनाकडे हसतांतरित केली. शुक्रवारी दोडामार्ग तहसीलदार अरुण खानोलकर व महामंडळाचे अधिकारी उमेश कोष्टी यांनी आडाळी येथे हस्तानंतरण करारावर सह्या केल्या. यावेळी मंडळ अधिकारी प्रेमानंद सावंत, तलाठी श्रीमती गोरे उपस्थित होते. यावेळी कोष्टी यांनी तहसीलदार यांना प्रकल्पसाठी निश्चित केलेली जागा दाखवली.आशादायक सुरवातकेंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त सहकार्यातून हा प्रकल्प उभा राहणार आहे. अनेक अडथळे पार करून प्रकल्प आता दृष्टक्षेपात येत आहे. केंद्र आणि राज्यात वेगळ्या पक्षांची सरकारे आणि त्यात पुन्हा कोकणातील प्रकल्प अशी स्थिती असल्याने प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता नाही असे भाकीत वर्तविले जात होते. पण सत्ताधारी आणि विरोधकांची समन्वयाची भूमिकाच या प्रकल्पाचा मजबूत पाया ठरली आहे. शिवाय आडाळीसाठीही ही ऐतिहासिक बाब आहे. गेली आठ वर्षे जी मेहनत आम्ही एमआयडीसी साठी घेत आहोत, ती आता फळाला येत असल्याचे स्थानिय लोकांधिकार संरक्षण समितीचे समन्वयक पराग गावकर यांनी सांगितले. 

टॅग्स :environmentपर्यावरणAyurvedic Home Remediesघरगुती उपायsindhudurgसिंधुदुर्ग