शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

बिकट प्रसंगी साहित्य वाट दाखवते

By admin | Updated: January 5, 2015 00:40 IST

सुनीलकुमार लवटे : आप्पासाहेब पटवर्धन स्मृती व्याख्यानमाला

कणकवली : शाळेतील शिक्षण साक्षर करते. तर साहित्य माणसाला समर्थ बनवते. जीवनातील बिकट प्रसंगात साहित्य वाट दाखवते, असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले. येथील नगर वाचनालयातर्फे आयोजित आप्पासाहेब पटवर्धन स्मृती व्याख्यानमालेतील ‘साहित्य आणि जीवन’ या विषयावर ते बोलत होते. व्याख्यानमालेचे उद्घाटन निवासी नायब तहसीलदार संतोष खरात यांनी केले. वाचनालयाचे अध्यक्ष वि. शं. पडते, कार्यवाह महेश काणेकर, मुख्याधिकारी अवधूत तावडे, ए. वाय. तानवडे यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक वि. शं. पडते यांनी केले.डॉ. लवटे पुढे म्हणाले की, साहित्य का वाचले जाते याचा विचार करा. जीवन जगण्यास साहित्य समर्थ बनवते. जीवनातील अनेक प्रसंग विविध साहित्यकृतींत डोकावतात. साहित्य हे अभिव्यक्तीचे साधन आहे. जेव्हा भाषा नव्हती तेव्हा माणूस तुलनेने बलवान होता. अभिव्यक्ती जशी वाढली तशी माणसाची शक्ती कमी झाली. साहित्य आपणास प्रगल्भ बनवते. मात्र, पोथीसारखे वाचनाने हाती काही लागणार नाही. अल्पाक्षरी लिहिणारे वाचकांवर जास्त प्रभाव टाकतात. ‘गीतांजली’पेक्षा रविंद्रनाथ टागोर यांच्या त्रिपदी प्रभावशाली आहेत. वि. स. खांडेकर यांची ताकद त्यांच्या रूपक कथांमध्ये पहावयास मिळते. शब्दप्रभू कवीला विविध भाव शब्दांत पकडण्याची कला अवगत असते. प्रतिभावान साहित्यकार जीवनाकडे सूक्ष्मपणे पाहत जगतो. साहित्यकारांकडून नकारात्मक आणि सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त होतात. दलित साहित्य, स्त्रीवादी साहित्यातून नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त होताना पाहावयास मिळतात. दुसरीकडे स्वत: आयुष्यात अनेक यातना भोगूनही सकारात्मक लिहिणारा वर्ग आहे. संवेदनशील माणसांना जीवनाचे व्यवहार लागू होत नाहीत. साहित्यकार याच विश्वातले असतात. त्यांच्या संवेदनांना व्यवहाराची चौकट बसत नाही. संवेदनशील साहित्यकारांच्या कलाकृतीत जीवन चपखलपणे बसते. साहित्य हा जीवनाचा आरसा आहे, अशी व्याख्या केली जात असली तरी ते फोटोसारखे नाही. प्रतिभावान साहित्यकार जीवनाला प्रतिबिंबीत करतो. सच्चा लेखक फक्त व्यथा, वेदना मांडत नाही तर आपल्या साहित्यकृतीतून जीवन रसिकतेने प्रतिबिंबीत करतो, असेही डॉ. लवटे म्हणाले. प्रा. लालासाहेब घोरपडे यांनी सूत्रसंचालन केले.आजकाल टीव्ही पाहणे सुखाचे झाले असून, व्याख्यान ऐकणे त्रासाचे झाले आहे. हे सांस्कृतिक अध:पतनाचे निदर्शक आहे. - डॉ. सुनीलकुमार लवटे, साहित्यिक.