शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा टँक बनला डास उत्पत्ती केंद्र

By admin | Updated: November 12, 2014 22:51 IST

सिंधुदुर्गनगरीतील प्रश्न : हिवताप विभागाचे दुर्लक्ष

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी येथील आयटीपार्कमधील पाण्याचा टँक पाण्याने भरण्यात आला आहे. मात्र, त्याच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने हा पाण्याचा टँक डास उत्पत्ती केंद्र बनला आहे.जिल्हा हिवताप विभागामार्फत डास निर्मूलन मोहीम जिल्ह्यात राबविली जात असली तरी जिल्हा मुख्यालय परिसरात असणाऱ्या आयटी पार्कमध्ये असलेल्या पाण्याच्या टँकमध्ये गेले दोन महिने पाणी साठवून ठेवल्यामुळे होणाऱ्या डास निर्मितीकडे मात्र हा विभाग डोळेझाक करत आहे. जिल्ह्यात डेंग्यूची साथ फैलावत आहे. डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. हिवतापाचे रुग्णही वाढत आहेत. विविध तापाचे रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या अहवालानुसार आजच्या स्थितीला ४१ तापाचे रुग्ण दाखल झाले आहेत.जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरी येथे नव्यानेच भव्य असे आयटी पार्क उभारण्यात आले आहे. त्यामध्ये पाण्याचा टँक बांधून त्यामध्ये पाणी साठवून ठेवण्यात आले आहे. या टँकमधील पाणी बदलण्यात येत नाही. त्यामुळे या पाण्यात गाळही साठला आहे. अनेक महिने पाणी साठून राहिल्याने या पाण्यात मोठ्या प्रमाणावर डास निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. याठिकाणी सायंकाळी शासकीय वसाहतीतील कर्मचारी व त्यांची मुले रोज फिरण्यासाठी जातात. अशांना तापाची लागण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.सिंधुदुर्गनगरी आयटी पार्कमधील पाण्याच्या टँककडे दुर्लक्ष केले जात असल्याने हे टँक डास निर्मिती केंद्र बनले आहे. मात्र, या अतिगंभीर समस्येकडे जिल्हा हिवताप विभागाचे लक्ष गेलेले नाही. जिल्ह्यात लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात बंधारे बांधण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. हे बंधारेही डास उत्पत्तीचे कारण बनणार आहेत. याबाबत हिवताप विभागाचे नियोजन काय? पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बांधण्यात येणारे जिल्ह्यातील बंधारे हिवताप विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे डास निर्मितीला कारण बनणार आहेत. (प्रतिनिधी)