शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

कालव्याचे पाणी विलवडे गेटमधून तेरेखोल नदीत सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 20:29 IST

विलवडे गावची अर्थव्यवस्था ही पूर्णत: शेतीवर अवलंबून आहे. परंतु, चालू वर्षी पाऊस लांबल्याने व नदीपात्र कोरडे झाल्याने शेती पिकांसाठी नळ योजनेच्या पंपांना तसेच शेती पंपांना पुरेसे पाणी मिळत नाही. विलवडे परिसरातील शेतक-यांना मोठ्या आर्थिक संकंटाला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देकालव्याचे पाणी विलवडे गेटमधून तेरेखोल नदीत सोडण्याची मागणीतेरेखोल नदीचे पात्र पडले कोरडे

बांदा : विलवडे गावची अर्थव्यवस्था ही पूर्णत: शेतीवर अवलंबून आहे. परंतु, चालू वर्षी पाऊस लांबल्याने व नदीपात्र कोरडे झाल्याने शेती पिकांसाठी नळ योजनेच्या पंपांना तसेच शेती पंपांना पुरेसे पाणी मिळत नाही. विलवडे परिसरातील शेतक-यांना मोठ्या आर्थिक संकंटाला सामोरे जावे लागत आहे.पाणीटंचाई सदृश स्थिती लक्षात घेऊन तिलारी प्रकल्पाच्या बांदा शाखा कालव्याचे पाणी विलवडे येथील गेटमधून तेरेखोल नदीत सोडावे अशी मागणी विलवडे परिसरातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे. याबाबतचे निवेदन शेतकऱ्यांनी मंगळवारी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी प्रमोद दळवी यांनी दिले. तिलारी कालव्याचे पाणी तेरेखोल नदीत सोडल्याने विलवडे परिसरातील शेतकºयांना शेती, नळ योजनेस फायदा होईल.पत्रकात असे नमूद केले आहे की, विलवडे येथून तिलारी प्रकल्पाचा बांदा उपशाखा कालवा गेलेला असून या कालव्याचे काम वाफोली, विलवडे, सरमळे गावात पूर्ण झालेले आहे. ओटवणे येथील कालव्याचे काम चालू असून कालव्याचे पाणी ओटवणे येथील सुक्या नाल्यात सोडण्यात आलेले आहे. या पाण्याचा शेतकºयांना व नळधारकांना, कोणताही फायदा नाही.विलवडे येथे एप्रिल मे महिन्यामध्ये भेंडी, दोडकी, वाल ,केळी, कणग्या, काकडी विविध प्रकारची नगदी पिके व्यापारी पद्धतीने उत्पादन घेतले जाते. परंतु चालू वर्षी पाऊस लांबल्याने व नदीपात्र कोरडे झाल्याने शेती पिकांसाठी नळ योजनेच्या पंपांना तसेच शेती पंपांना पुरेसे पाणी मिळत नाही. विलवडे, सरमळे, ओटवणे तीनही गावातून गेलेल्या तिलारी कालव्याचे पाणी तेरेखोल नदीत सोडण्यासाठी विलवडे येथे गेट ठेवण्यात आलेले आहे. 

टॅग्स :DamधरणWaterपाणीsindhudurgसिंधुदुर्ग