शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

कर्ली पुलाची सुरक्षितता धोक्यात, बेकायदा वाळूची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 17:52 IST

sand, malvan, police, sindhudurngnews कर्जबाजारी झालेल्या वाळू व्यावसायिकांसमोर अनेक आव्हाने असल्याने त्यांना नाईलाजाने वाळू व्यवसाय करावा लागत आहे. परंतु बेसुमार वाळू उत्खनन केल्यामुळे नदीचे पात्र रुंदावल्याने लोकवस्ती, शेतजमिनी, माडबागायतींचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

ठळक मुद्दे कर्ली पुलाची सुरक्षितता धोक्यात, बेकायदा वाळूची लूटबंदी असताना जिल्ह्यात राजरोस वाळू उपसा सुरू

सिद्धेश आचरेकरमालवण : कर्जबाजारी झालेल्या वाळू व्यावसायिकांसमोर अनेक आव्हाने असल्याने त्यांना नाईलाजाने वाळू व्यवसाय करावा लागत आहे. परंतु बेसुमार वाळू उत्खनन केल्यामुळे नदीचे पात्र रुंदावल्याने लोकवस्ती, शेतजमिनी, माडबागायतींचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

मालवण-वेंगुर्ला तालुके जोडणाऱ्या देवली येथील कर्ली पुलाची स्थिती गंभीर बनली आहे. राजरोसपणे होणाऱ्या वाळू उपशामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या सागरी महामार्गावरील कर्ली पुलाची सुरक्षितता धोक्यात आली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाळू उत्खननाला शासनाची परवानगी नाही. मात्र, अनधिकृत वाळू उत्खननाला पेव फुटले आहे. मालवण तालुक्यातील कालावल खाडी, मालवण व कुडाळ तालुक्याला लागून असलेली कर्ली खाडी, वेंगुर्ला तालुक्यातील चिपी येथे वाळूचे मोठ्या प्रमाणात उत्खनन होत आहे. या उत्खननाबाबत ग्रामस्थांनी प्रशासनास निवेदन देत आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानुसार महसूल प्रशासनाने अनधिकृत वाळू रॅम्प उद्ध्वस्त करून कारवाईचा बडगा उगारला.५० मीटरवर उत्खननकर्ली पुलापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर वाळू उत्खनन जोरात सुरू असल्याचा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केला होता. देवली-वाघवणे येथे खाडीलगत १८०० मीटरचा खारबंधारा आहे. अवैध वाळू उत्खननामुळे सुमारे ६०० मीटर खारबंधारा खचून गेला आहे. भविष्यात पूरस्थिती निर्माण झाल्यास खारबंधारा फुटून ग्रामस्थ व शेतकऱ्यांची घरे, शेतजमिनी, माडबागायतींचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.१०० डंपरनी वाळू वाहतूकवाळू व्यावसायिकांकडून रात्रंदिवस बेसुमार अवैध वाळू उपसा केला जात आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार दरदिवशी ७० ते ८० होड्यांनी अवैध वाळू उपसा होते. त्यानंतर १०० डंपरनी वाळू वाहतूक जिल्ह्यात तसेच गोव्यात केली जाते. पोलीस, महसूल कर्मचारी, तहसीलदार, प्रांत डोळ्यावर पट्टी बांधून आहेत का ? महसूल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या या वाळू उपशामुळे कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे, असा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला.

जिल्ह्यातील नद्यांच्या पुरांनी दाखविलेला रुद्रावतार हा वाळू उपशाचाच परिमाण आहे. नदी ही जीवनरेषा आहे. गावा-गावांनी नीडरपणे अवैध वाळू उपशाविरुद्ध उभे राहणे आवश्यक आहे. इतर देशांनी अवलंबिलेल्या शाश्वत उपायांचा किंवा प्लास्टिकग्रीड, जिओग्रीड अशा वाळूला असणाऱ्या विकल्पांचा अंगीकार करणे जिकिरीचे आहे. यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत आहे. त्यामुळे यावर कडक निर्बंध घालणे आवश्यक आहे.- प्रा. हसन खान, पर्यावरण अभ्यासक

टॅग्स :sandवाळूMalvan beachमालवण समुद्र किनाराsindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस