शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
4
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
5
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
6
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
7
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
8
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
11
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
13
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
14
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
15
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
16
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
17
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
18
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
19
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
20
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पावसाने फेरले पाणी; सिंधुदुर्गात १२७०.६१ हेक्टर क्षेत्रावरील पीक उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 16:29 IST

कुडाळ, सावंतवाडी, देवगड, मालवणात सर्वाधिक नुकसान

ओरोस : सिंधुदुर्गात गेल्या आठवड्यापासून कोसळणाऱ्या अवेळी पावसाने शेतकऱ्यांच्या कष्टांवर आणि आशांवर अक्षरशः पाणी फेरले आहे. कापणीसाठी तयार असलेले भात आणि नाचणीचे पीक पावसामुळे भिजून वाया गेले आहे. कर्ज, खर्च आणि कष्ट या त्रिसूत्रीमध्ये अडकलेला शेतकरी आता पूर्णपणे हवालदिल झाला आहे. २१ ते ३० ऑक्टोबरदरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे २८१ गावांतील तब्बल ५ हजार ८२७ शेतकऱ्यांचे १२७०.६१ हेक्टर क्षेत्रावरील पीक उद्ध्वस्त झाले आहे.जिल्ह्यात ५४ हजार ८८३ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली होती. भात कापणी सुरू झाल्यानंतर सुरू झालेल्या अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. सतत पडणारा पाऊस आणि ओलाव्यामुळे भात पीक खराब होण्याच्या मार्गावर आहेत. पावसाचे संकट कायम असल्याने नुकसानीचा आकडा आणखी वाढेल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

कुडाळ, सावंतवाडी, देवगड, मालवणात सर्वाधिक नुकसानमे मध्ये पावसाची सुरुवात, जुलैतील ओढाताण आणि ऑक्टोबरअखेर पुन्हा संकट या उलटसुलट हंगामाने शेतकऱ्यांच्या कष्टांची थट्टाच केली आहे. एकीकडे खतांचा, मजुरांचा खर्च आणि दुसरीकडे पावसाचा तडाखा यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार कुडाळ, सावंतवाडी, देवगड आणि मालवण तालुक्यांतील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. पंचनामे सुरू असून नुकसानग्रस्त क्षेत्राचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे.

नुकसानीची माहिती द्यावीदरम्यान, प्रशासनाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, पंचनाम्यासाठी शेतीच्या नुकसानीची माहिती कृषी सहायक, तलाठी किंवा ग्रामसेवक यांना त्वरित द्यावी, जेणेकरून शासन मदतीचा लाभ लवकर मिळू शकेल.

नुकसानीचा प्राथमिक अहवाल (२१ ते ३० ऑक्टोबर)

तालुकाबाधित गावेबाधित शेतकरीबाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)
देवगड१८१७८१३.०३
मालवण५८१६९२३५२.८२
सावंतवाडी६११८६३५१०.६८
दोडामार्ग१०१०७१६.३१
वेंगुर्ला२६१७३७.२७
कणकवली२९१५५३५.००
कुडाळ७११६०४३३२.८५
वैभववाडी५५२.६५
एकूण२८१५८२७११७०.६१
English
हिंदी सारांश
Web Title : Rain Dampens Farmers' Dreams: Crops Destroyed on 1270 Hectares in Sindhudurg

Web Summary : Untimely rains in Sindhudurg have devastated farmers, ruining ready-to-harvest rice and finger millet crops. Around 5,827 farmers across 281 villages have suffered losses on 1270.61 hectares. Kudal, Sawantwadi, Devgad, and Malvan are the worst affected areas. Farmers are urged to report losses for assistance.