शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील पाण्यावर क्रॉफर्ड उतारा फायद्याचा

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

जलव्यवस्थापनाचा उत्तम नमुना : कापसाळ येथील धरण चिपळूणकरांची तहान भागवू शकेल

राजेश जोष्टे - खेर्डी --चिपळूण शहराला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी क्रॉफर्ड या मुंबईस्थित ब्रिटिश गव्हर्नरने शतकापूर्वी बांधलेले धरण ओसंडून वाहात असून, इतक्या वर्षांपूर्वी इथूनच ग्रॅव्हिटीने पाणी पुरवठा होत होता. या धर्तीवर पूरमुक्ती व जलव्यवस्थापन असा दुहेरी हेतू साध्य होण्यासाठी कोकणात प्रसंगी छोटी पण पक्क्या स्वरुपाची धरणे बांधावीत, असा मतप्रवाह जोर धरत आहे. ब्रिटिश गव्हर्नरने पेण आणि चिपळूण येथे छोटी धरणे बांधून घेतली. चिपळुणात कामथे - कापसाळ येथे शीवनदीवर हे धरण बांधण्याची योजना १८७९मध्ये मंजूर झाली होती. या धरणासाठी मोठ्या जमीनदारांनी देणगी दिल्या. विशेष म्हणजे धरण बांधकामाला खर्च थोडा आला तर शहरभर पाईपलाईन फिरवण्यासाठी त्याकाळी साडेचार लाख रुपये खर्ची पडले. एवढी जुनी नळपाणी योजना राज्यात क्वचितच अन्य ठिकाणी सापडेल. १९१०च्या सुमारास ही योजना सुरु झाली होती. ती अव्याहतपणे १९६७ पर्यंत सुरु होती. कोयनेचे धरण बांधल्यानंतर मात्र चिपळूणला वाशिष्ठी नदीतून पाणी पुरवठा होऊ लागला असून आजही तो कायम आहे.चिपळूण नगर परिषद १३६ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असल्याने त्या काळात दोन सुरक्षारक्षकही जलसाठ्याच्या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. कोळकेवाडी धरणातून वाशिष्ठी नदीपात्रात सोडण्यात येणारे पाणी नगर परिषदेने उचलण्यास सुरुवात केल्यानंतर गेल्या ४८ वर्षे या धरणाकडे दुर्लक्ष झाले. परिणामी, तो गाळाने होरला होता. पाटबंधारे खात्याने त्यातील काही गाळ काढला असला तरी हे काम परिपूर्ण झाले नाही. असे असले तरी आजही हे धरण मजबूत स्थितीत आहे. त्याचे स्थापत्यशास्त्र देखणे असल्याने पर्यटक, प्रवासी पावसाळ्यात त्यांच्या विहंगम परिसराचा आनंद घेतात. देशात सर्वाधिक धरणे महाराष्ट्रात आहेत व राज्यात होणाऱ्या एकूण पर्जन्यवृष्टीपैकी ४६.५ टक्के पाणी एकट्या कोकणात पडते. पण धरणांची मोठी संख्या कोकणवगळता उर्वरित राज्यात आहेत.