शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
4
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
5
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
6
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
7
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
8
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
9
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
10
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
11
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
12
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
13
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
14
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
15
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
16
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
17
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
18
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
19
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
20
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!

CoronaVirus :उपाशीपोटी आम्ही काम कसे करायचे?, बिहारी मजुरांचा प्रशासनाला प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 4:58 PM

अन्न नाही, पैसे नाहीत अशा स्थितीत आम्ही कसे जगायचे? उपाशीपोटी आम्ही काम कसे करायचे? असे प्रश्न उपस्थित करीत बिहारी कामगारांनी सोमवारी कणकवली बसस्थानकात घरी जाण्याचा प्रशासनाकडे हट्ट धरला. त्यामुळे काही काळ तेथील वातावरण तंग बनले होते.

ठळक मुद्देउपाशीपोटी आम्ही काम कसे करायचे?, बिहारी मजुरांचा प्रशासनाला प्रश्नघरी जाण्याचा केला हट्ट, ओरोस येथे जाण्यासाठी एसटीच्या गाड्यांची सोय, बसस्थानकातच वाद

कणकवली : अन्न नाही, पैसे नाहीत अशा स्थितीत आम्ही कसे जगायचे? उपाशीपोटी आम्ही काम कसे करायचे? असे प्रश्न उपस्थित करीत बिहारी कामगारांनी सोमवारी कणकवली बसस्थानकात घरी जाण्याचा प्रशासनाकडे हट्ट धरला. त्यामुळे काही काळ तेथील वातावरण तंग बनले होते.घरी परत जाण्यासाठी या बिहारी कामगारांनी आपले सर्व साहित्य घेऊन कणकवली बसस्थानक गाठले होते. या बसस्थानकातून ओरोस येथे जाण्यासाठी एसटीच्या गाड्यांची सोय करण्यात आली होती. तेथून रेल्वेने हे बिहारी मजूर आपल्या गावी जाणार होते. पण कामाचे पूर्ण पैसे न मिळाल्याने व नियोजित काम अजून शिल्लक असल्याने त्यांचा व महामार्ग चौपदरीकरण कामाचा पोट ठेकेदार यांचा बसस्थानकातच वाद झाला.

अखेर कणकवली तहसीलदार आर. जे. पवार आणि पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी मध्यस्थी करीत मजुरांची समजूत काढून त्यांना महिनाभर कणकवलीत थांबण्यास सांगितले.ओरोसवरून सोमवारी श्रमिक रेल्वे बिहारला निघणार असल्याने त्या गाडीतून आपल्या गावी जाण्यासाठी अनेक मजूर कणकवली बसस्थानकात दाखल झाले होते. महामार्ग चौपदरीकरण कामाचा पोट ठेका घेतलेल्या ठेकेदाराकडे काम करणाऱ्या सुमारे २०० कामगारांना कणकवली बसस्थानकातून सिंधुदुर्ग रोड रेल्वेस्थानकापर्यंत घेऊन जाण्याची प्रक्रिया सुरू होती. यावेळी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी तिथे उपस्थित होते.याचवेळी तिथे दाखल झालेल्या महामार्ग चौपदरीकरण कामाच्या ठेकेदाराने या कामगारांना कणकवलीत काही दिवस थांबण्याचे आवाहन केले. यावरून ठेकेदार व मजूर यांच्यात वाद सुरू झाला. याचवेळी काही मजुरांना एसटी बसमधून त्यांनी खाली उतरविले.अखेर तहसीलदार आर. जे. पवार यांनी हस्तक्षेप करून तत्काळ जेवणाची व्यवस्था करण्याची ताकीद ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली. तसेच ठेकेदाराऐवजी थेट कामगारांना मजुरी द्या, असे त्यांना बजावले. तसेच मजुरांना अर्धवट स्थितीतील पुलाचे काम पूर्ण करून मग तुम्ही निघून जा, असे सांगितले.

१५ जूनला तुम्हांला घरी जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जाईल, असे आश्वासनही त्या मजुरांना दिले. त्यामुळे मजूर काहीसे शांत झाले. मजूर घर गाठण्यासाठी आहेत प्रयत्नशील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊननंतर गरीब कामगार, मजूर आपले घर गाठण्यासाठी प्रयत्नशील आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अनेक परप्रांतीय मजूर रेल्वेतून आपल्या राज्यात परतले आहेत.सध्या कणकवलीत महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी शेकडो परप्रांतातील मजूर तिथे कार्यरत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग