शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

corona virus : मातेचे शेवटचे दर्शनही घेता आले नाही, कोरोना विषाणूची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 15:00 IST

सोनु कुबल यांचे मातृछत्र हरपले. मात्र, मातेचे शेवटचे दर्शन घेण्याचे भाग्य त्यांच्या नशिबी लाभले नाही. ते क्वारंंटाईन असल्यामुळेच.

ठळक मुद्देमातेचे शेवटचे दर्शनही घेता आले नाही, कोरोना विषाणूची दहशतभेडशी येथील सोनु कुबल यांची व्यथा; पुणे येथून आल्याने क्वारंटाईन

दोडामार्ग : सध्या कोरोना विषाणूची दहशत इतकी निर्माण झाली आहे की, आपल्या जन्मदात्रीचे अंतिम दर्शन घेणेसुद्धा कठीण झाले आहे. या विषाणूच्या फैलावामुळे क्वारंंटाईन असलेल्या व्यक्तींच्या घरात कोणी मृत झाले तर त्याचे लांबूनही दर्शन घेण्यास दिले जात नाही. असाच प्रसंग कुबल कुटुंबीयांवर ओढवला. सोनु कुबल यांचे मातृछत्र हरपले. मात्र, मातेचे शेवटचे दर्शन घेण्याचे भाग्य त्यांच्या नशिबी लाभले नाही. ते क्वारंंटाईन असल्यामुळेच.कुबल कुटुंबीय हे मूळ पाल गावचे. मात्र, तिलारी प्रकल्प बाधित असल्याने त्यांनी भेडशी येथे घर बांधले. सोनु कुबल कामानिमित्त पुणे येथे आपल्या कुटुंबासह राहतात. तर त्यांची आई व भाऊ भेडशी येथे राहतात. त्यांच्या भावाचे गतवर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यामुळे त्यांच्या वहिनी व पुतण्या आईसह राहत होते. सोनु कूबल यांची आई रुक्मिणी बाबाजी कुबल हिचे वय १०२ एवढे होते. पूर्ण आयुष्यात त्यांनी कोणतेही डॉक्टरी उपचार घेतले नव्हते. तरीही त्यांनी शंभरी पार केली.गेल्या पंधरा दिवसांपासून त्या अंथरुणाला खिळल्या होत्या. एका मुलाला गतवर्षी देवाज्ञा झाली. तर दुसरे दोन मुलगे कामानिमित्त पुणे येथे राहतात. लॉकडाऊनमुळे ते तेथेच अडकले. कदाचित अन्नपाणी न घेता पंधरा दिवस ही माऊली मुलांचीच वाट पाहत होती. परंतु नियतीला ते मंजूर नसावे! पुत्र गावी येऊनही त्यांना मातेचे व मातेला पुत्रांचे शेवटचे दर्शन झालेच नाही.सोनु कुबल यांना आपली आई अंथरुणाला खिळली असल्याचे समजताच त्यांनी गावी येण्याचा निर्णय घेतला. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाने घातलेल्या नियम व अटींचे पूर्ण पालन करून येणे त्यांना ग्राह्य होते. शासकीय निकषानुसार त्यांनी ई-पासद्वारे भेडशी गाव गाठले.मात्र, घरी जाऊन मातेचे शेवटचे दर्शन घेण्यास अडथळा आला तो संस्थात्मक क्वारंंटाईनचा. कोरोनाची झपाट्याने वाढ होत असलेल्या पुणे शहरातून ते दोघे आल्याने ग्रामस्थांनी त्यांना घरी जाण्यास विरोध केला. तो फक्त कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे. कारण या रोगाची भयानकता संपूर्ण जगाला हादरून गेली आहे.शासन नियमानुसार त्यांना घरी जाण्याअगोदर क्वारंंटाईन होणे भाग पडले. क्वारंंटाईन होऊन दोन दिवस झाले आणि जन्मदात्रीने घरी प्राण सोडला. कोण जाणे आपल्या पुत्रांंची शेवटची भेट होईल याची ती माऊली वाट पाहत होती. मात्र, माय-लेकरांची भेट झालीच नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकsindhudurgसिंधुदुर्ग