शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
2
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
3
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
4
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
5
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
6
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
7
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
8
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
9
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
10
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
11
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
12
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
13
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
14
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
15
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
16
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
17
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
18
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
19
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
20
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : मातेचे शेवटचे दर्शनही घेता आले नाही, कोरोना विषाणूची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 15:00 IST

सोनु कुबल यांचे मातृछत्र हरपले. मात्र, मातेचे शेवटचे दर्शन घेण्याचे भाग्य त्यांच्या नशिबी लाभले नाही. ते क्वारंंटाईन असल्यामुळेच.

ठळक मुद्देमातेचे शेवटचे दर्शनही घेता आले नाही, कोरोना विषाणूची दहशतभेडशी येथील सोनु कुबल यांची व्यथा; पुणे येथून आल्याने क्वारंटाईन

दोडामार्ग : सध्या कोरोना विषाणूची दहशत इतकी निर्माण झाली आहे की, आपल्या जन्मदात्रीचे अंतिम दर्शन घेणेसुद्धा कठीण झाले आहे. या विषाणूच्या फैलावामुळे क्वारंंटाईन असलेल्या व्यक्तींच्या घरात कोणी मृत झाले तर त्याचे लांबूनही दर्शन घेण्यास दिले जात नाही. असाच प्रसंग कुबल कुटुंबीयांवर ओढवला. सोनु कुबल यांचे मातृछत्र हरपले. मात्र, मातेचे शेवटचे दर्शन घेण्याचे भाग्य त्यांच्या नशिबी लाभले नाही. ते क्वारंंटाईन असल्यामुळेच.कुबल कुटुंबीय हे मूळ पाल गावचे. मात्र, तिलारी प्रकल्प बाधित असल्याने त्यांनी भेडशी येथे घर बांधले. सोनु कुबल कामानिमित्त पुणे येथे आपल्या कुटुंबासह राहतात. तर त्यांची आई व भाऊ भेडशी येथे राहतात. त्यांच्या भावाचे गतवर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यामुळे त्यांच्या वहिनी व पुतण्या आईसह राहत होते. सोनु कूबल यांची आई रुक्मिणी बाबाजी कुबल हिचे वय १०२ एवढे होते. पूर्ण आयुष्यात त्यांनी कोणतेही डॉक्टरी उपचार घेतले नव्हते. तरीही त्यांनी शंभरी पार केली.गेल्या पंधरा दिवसांपासून त्या अंथरुणाला खिळल्या होत्या. एका मुलाला गतवर्षी देवाज्ञा झाली. तर दुसरे दोन मुलगे कामानिमित्त पुणे येथे राहतात. लॉकडाऊनमुळे ते तेथेच अडकले. कदाचित अन्नपाणी न घेता पंधरा दिवस ही माऊली मुलांचीच वाट पाहत होती. परंतु नियतीला ते मंजूर नसावे! पुत्र गावी येऊनही त्यांना मातेचे व मातेला पुत्रांचे शेवटचे दर्शन झालेच नाही.सोनु कुबल यांना आपली आई अंथरुणाला खिळली असल्याचे समजताच त्यांनी गावी येण्याचा निर्णय घेतला. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाने घातलेल्या नियम व अटींचे पूर्ण पालन करून येणे त्यांना ग्राह्य होते. शासकीय निकषानुसार त्यांनी ई-पासद्वारे भेडशी गाव गाठले.मात्र, घरी जाऊन मातेचे शेवटचे दर्शन घेण्यास अडथळा आला तो संस्थात्मक क्वारंंटाईनचा. कोरोनाची झपाट्याने वाढ होत असलेल्या पुणे शहरातून ते दोघे आल्याने ग्रामस्थांनी त्यांना घरी जाण्यास विरोध केला. तो फक्त कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे. कारण या रोगाची भयानकता संपूर्ण जगाला हादरून गेली आहे.शासन नियमानुसार त्यांना घरी जाण्याअगोदर क्वारंंटाईन होणे भाग पडले. क्वारंंटाईन होऊन दोन दिवस झाले आणि जन्मदात्रीने घरी प्राण सोडला. कोण जाणे आपल्या पुत्रांंची शेवटची भेट होईल याची ती माऊली वाट पाहत होती. मात्र, माय-लेकरांची भेट झालीच नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकsindhudurgसिंधुदुर्ग