शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

corona virus : जनतेची काळजी घेण्यास लोकप्रतिनिधी अपयशी, परशुराम उपरकर यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 1:53 PM

कुडाळ : सिंधुदुर्गात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लोकांनी निवडून दिलेले आमदार, खासदार, पालकमंत्री जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याची ...

ठळक मुद्दे जनतेची काळजी घेण्यास लोकप्रतिनिधी अपयशी, परशुराम उपरकर यांची टीकासत्ताधारी आमदार, खासदार, पालकमंत्र्यांवर टीका

कुडाळ : सिंधुदुर्गात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लोकांनी निवडून दिलेले आमदार, खासदार, पालकमंत्री जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यास अपयशी ठरले आहेत, असा आरोप मनसे राज्य सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून केला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना साथीच्या सुरुवातीला प्रत्येक तालुक्यात जाऊन कोरोनाबाबत आढावा घेण्यासाठी पालकमंत्री, आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींनी बैठका घेतल्या.

त्यावेळी त्यांच्या बातम्या आणि बैठकांचे फोटो सर्वत्र झळकत होते. परंतु या नियोजन बैठकांचा जनतेला व जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोणताही लाभ झाला नाही. हे सिंधुदुर्गात सध्या वाढणाऱ्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सिद्ध झाले आहे.गेले सहा महिने सरकार म्हणून सत्ताधारी आमदार-खासदारांना कोरोना साथरोगाचे नियंत्रण करण्यासाठी योग्य नियोजन करता न आल्याने रुग्णांची संख्या वाढली व त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ५५ लोक मृत्युमुखी पडले आहेत. याला जनतेने निवडून दिलेले आमदार, खासदार व पालकमंत्री जबाबदार आहेत.सर्वच लोकप्रतिनिधी मोठमोठ्या घोषणा करतात. त्या बातम्या वृत्तपत्रांतून छापून येतात. ते केवळ दिखाऊपणा करतात. आमदार वैभव नाईक यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदार संघात जात १० व्हेंटिलेटर दिल्याची घोषणा केली. परंतु हे व्हेंटिलेटर आल्यानंतर त्यांना अपुरा कर्मचारीवर्ग देण्याची ते घोषणा करू शकले नाहीत. त्यामुळे हे व्हेंटिलेटर धूळखात पडण्याची भीती आहे. कारण १० वर्षांपूर्वी कणकवली व सावंतवाडी येथे ट्रामाकेअर सेंटर सुरू झाले. पण डॉक्टर व कर्मचारी दिले नसल्याने ते धूळखात पडले आहे.

कुडाळ येथे महिलांसाठी उभारण्यात आलेले रुग्णालय चार महिन्यांत सुरू होणार असे सांगून आमदार नाईक यांनी या रुग्णालयाला १ कोटीचा निधी मिळाल्याची घोषणा केली. त्यानंतर मंत्र्यांकडे जाऊन त्यासाठी निधीची मागणी केल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. जर निधी आला असेल तर पुन्हा मागणी करण्याची गरजच काय होती? असा सवालही परशुराम उपरकर यांनी केला आहे.विकास झाल्याचे सांगण्याचा खोटा प्रयत्नपालकमंत्र्यांनी महामार्गबाधितांना दोन दिवसांत पैसे देण्याची घोषणा केली होती. त्याचे काय झाले? आठ दिवसांत महामार्गाचे स्ट्रक्चरल आॅडिट करून देणार होते त्याचे काय झाले ? रुग्णालयात कर्मचारी नेमण्याची घोषणा केली होती. त्याचे काय झाले ? विजयदुर्ग किल्ल्याची डागडुजी व स्मारके उभारण्याची घोषणा पालकमंत्री आणि खासदारांनी केली.परंतु शासनाच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना वेगवेगळया कामांच्या घोषणा करून जनतेची दिशाभूल करुन वृत्तपत्रातून बातम्या व फोटो प्रसिद्ध करीत जनतेला विकास झाल्याचे सांगण्याचा खोटा प्रयत्न का केला जात आहे? असा परखड सवाल उपरकर यांनी केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याParshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्ग