शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

जिल्हाधिकाऱ्यांविरोधातील तक्रार मानवी हक्क आयोगाने फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 17:39 IST

Dam Collacator Sindhudurg- अरुणा पाटबंधारे प्रकल्पात आपले घर व जमीन बाधित होऊनही आपल्याला नुकसान भरपाई मिळाली नाही. तसेच पुनर्वसन केले नाही आदी प्रकारची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याविरोधात वैभववाडी येथील तानाजी कांबळे यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे केलेली तक्रार आयोगाने चौकशीअंती फेटाळून लावली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांविरोधातील तक्रार मानवी हक्क आयोगाने फेटाळली अरुणा पाटबंधारे प्रकल्पातील पुनर्वसनावर प्रश्नचिन्ह

ओरोस : अरुणा पाटबंधारे प्रकल्पात आपले घर व जमीन बाधित होऊनही आपल्याला नुकसान भरपाई मिळाली नाही. तसेच पुनर्वसन केले नाही आदी प्रकारची सिंधुदुर्गजिल्हाधिकारी यांच्याविरोधात वैभववाडी येथील तानाजी कांबळे यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे केलेली तक्रार आयोगाने चौकशीअंती फेटाळून लावली आहे.अरुणा पाटबंधारे प्रकल्पात वैभववाडी येथील आखवणे, भोम व नागपवडी ही गावे बाधित झाली होती. मात्र, प्रकल्पात बाधित झालेल्या वैभववाडी तालुक्यातील तानाजी कांबळे यांनी १८ नोव्हेंबर २०१८ रोजी आपले घर या प्रकल्पात बाधित होऊनही आपल्याला नुकसान भरपाई मिळावी नाही, आपले पुनर्वसन करण्यात आले नाही, धरणाचे काम चांगले नाही, घळ भरणी योग्यरित्या करण्यात आली नसल्याचे सांगत सिंधुदुर्गजिल्हाधिकारी यांच्याविरोधात राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.या तक्रारीच्या अनुषंगाने आयोगाने कोकण विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीमधील उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात येत २४, २५ व २६ डिसेंबर २०२० या कालावधीत या प्रकरणाची चौकशी केली होती. यात सर्व प्रकारच्या कागदपत्रांची या समितीने पाहणी केली. यात जिल्हाधिकारी यांच्याविरोधात काही आढळून आले नाही. उलट धरणाची पाहणी केली. यात धरणाचे काम समाधानकारक आढळून आले. तसेच घळ भरणीही पूर्ण झाल्याचे दिसून आले.बुडीत क्षेत्रातील ३ हजार लोकांचे तक्रारदार कांबळे यांना नुकसान भरपाईपोटी १४ लाख रुपये देण्यात आले आहेत. तसेच मांगवली, कुसूर, वेंगसर आणि कुंभारवाडी येथे १०६८ कुटुंबांतील ३ हजार लोकांचे पुनर्वसन करण्यात आले असल्याचे या चौकशीत स्पष्ट झाले होते. दरम्यान, या समितीने प्रत्यक्ष बाधित झालेल्या नागरिकांशी ही संपर्क साधत माहिती घेत तक्रारदार कांबळे यांच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा अहवाल राज्य मानवी हक्क आयोगाकडे सादर केला होता. आरोपांमध्ये तथ्य नसल्याने ही तक्रार आयोगाने फेटाळून लावली आहे.बिनबुडाचे आरोप असल्याचा आयोगाचा शेरासिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारीच्या चौकशीत चौकशी समितीला काही तथ्य आढळून आले नाही. सर्व आरोप खोटे असल्याचे आढळून आले. त्यामुळे तक्रारदार कांबळे यांची तक्रार राज्य मानवी हक्क आयोगाने फेटाळून लावून हे बिनबुडाचे आरोप असल्याचा शेराही चौकशी अहवालावर मारला आहे.

टॅग्स :Damधरणcollectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग