शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जिल्हाधिकाऱ्यांविरोधातील तक्रार मानवी हक्क आयोगाने फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 17:39 IST

Dam Collacator Sindhudurg- अरुणा पाटबंधारे प्रकल्पात आपले घर व जमीन बाधित होऊनही आपल्याला नुकसान भरपाई मिळाली नाही. तसेच पुनर्वसन केले नाही आदी प्रकारची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याविरोधात वैभववाडी येथील तानाजी कांबळे यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे केलेली तक्रार आयोगाने चौकशीअंती फेटाळून लावली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांविरोधातील तक्रार मानवी हक्क आयोगाने फेटाळली अरुणा पाटबंधारे प्रकल्पातील पुनर्वसनावर प्रश्नचिन्ह

ओरोस : अरुणा पाटबंधारे प्रकल्पात आपले घर व जमीन बाधित होऊनही आपल्याला नुकसान भरपाई मिळाली नाही. तसेच पुनर्वसन केले नाही आदी प्रकारची सिंधुदुर्गजिल्हाधिकारी यांच्याविरोधात वैभववाडी येथील तानाजी कांबळे यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे केलेली तक्रार आयोगाने चौकशीअंती फेटाळून लावली आहे.अरुणा पाटबंधारे प्रकल्पात वैभववाडी येथील आखवणे, भोम व नागपवडी ही गावे बाधित झाली होती. मात्र, प्रकल्पात बाधित झालेल्या वैभववाडी तालुक्यातील तानाजी कांबळे यांनी १८ नोव्हेंबर २०१८ रोजी आपले घर या प्रकल्पात बाधित होऊनही आपल्याला नुकसान भरपाई मिळावी नाही, आपले पुनर्वसन करण्यात आले नाही, धरणाचे काम चांगले नाही, घळ भरणी योग्यरित्या करण्यात आली नसल्याचे सांगत सिंधुदुर्गजिल्हाधिकारी यांच्याविरोधात राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.या तक्रारीच्या अनुषंगाने आयोगाने कोकण विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीमधील उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात येत २४, २५ व २६ डिसेंबर २०२० या कालावधीत या प्रकरणाची चौकशी केली होती. यात सर्व प्रकारच्या कागदपत्रांची या समितीने पाहणी केली. यात जिल्हाधिकारी यांच्याविरोधात काही आढळून आले नाही. उलट धरणाची पाहणी केली. यात धरणाचे काम समाधानकारक आढळून आले. तसेच घळ भरणीही पूर्ण झाल्याचे दिसून आले.बुडीत क्षेत्रातील ३ हजार लोकांचे तक्रारदार कांबळे यांना नुकसान भरपाईपोटी १४ लाख रुपये देण्यात आले आहेत. तसेच मांगवली, कुसूर, वेंगसर आणि कुंभारवाडी येथे १०६८ कुटुंबांतील ३ हजार लोकांचे पुनर्वसन करण्यात आले असल्याचे या चौकशीत स्पष्ट झाले होते. दरम्यान, या समितीने प्रत्यक्ष बाधित झालेल्या नागरिकांशी ही संपर्क साधत माहिती घेत तक्रारदार कांबळे यांच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा अहवाल राज्य मानवी हक्क आयोगाकडे सादर केला होता. आरोपांमध्ये तथ्य नसल्याने ही तक्रार आयोगाने फेटाळून लावली आहे.बिनबुडाचे आरोप असल्याचा आयोगाचा शेरासिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारीच्या चौकशीत चौकशी समितीला काही तथ्य आढळून आले नाही. सर्व आरोप खोटे असल्याचे आढळून आले. त्यामुळे तक्रारदार कांबळे यांची तक्रार राज्य मानवी हक्क आयोगाने फेटाळून लावून हे बिनबुडाचे आरोप असल्याचा शेराही चौकशी अहवालावर मारला आहे.

टॅग्स :Damधरणcollectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग